शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कोल्हा आला रे आला ! सोयगावात कोल्ह्याच्या मुक्तसंचाराने नागरिक भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 19:27 IST

वेताळवाडीच्या जंगलातून भरकटलेल्या कोल्ह्याने पहाटे शहरात मुक्तसंचार सुरु केला.

सोयगाव : शहरात गुरुवारी भल्या पहाटे अचानक एका कोल्ह्याचे आगमन झाले. कोल्ह्याने मुक्तसंचार करत न्यायालयाजवळून भारत संचार कार्यालयाच्या आवारात बस्तान मांडण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांनी त्याला हुसकावून लावले. या घटनेने नागरिक भयभीत झाले असून शहरात खळबळ उडाली आहे.

वेताळवाडीच्या जंगलातून भरकटलेल्या कोल्ह्याने पहाटे शहरात मुक्तसंचार सुरु केला. दारासमोरच कोल्ह्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. त्यानंतर कोल्ह्याने थेट न्यायालयाच्या प्रवेशद्वारातून बीएसएनएल कार्यालयाच्या मनोऱ्याजवळ बस्तान मांडले. याची माहिती बी.एस.एन.एल कर्मचारी शेख सुलेमान यांनी वनविभागाला दिली.

यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी राहुल सपकाळे, वनपाल गणेश सपकाळ, वनरक्षक भिका पाटील, सुनील चंदवडे, निलेश मुलताने, योगेश बोखारे, सुरेश सरोदे, चंद्रकांत इंगळे, कृष्ण पाटील, मधुकर साळवे यांच्या पथकाने न्यायालयाचे आवार, शहराजवळील शेत, गलवाडा रस्ता या तीन ठिकाणी पिंजरा लावला. मात्र, कोल्हा जेरबंद करण्याच्या सात तासांच्या मोहिमेला यश आले नाही. पावसामुळे मोहिमेत अनेकवेळा व्यत्यय आला, कोल्हा शहरातून गलवाडा आणि वेताळवाडीच्या दिशेने पळाल्याचे पथकांने सांगितले. शुक्रवारी औरंगाबादची रेस्कू टीम या मोहिमेत सहभागी होणार असल्याची माहिती आहे. 

घाबरण्याचे कारण नाही सोयगावच्या जंगलात पूर्वीपासून कोल्ह्याचे वास्तव्य आहे. परंतु, शहरात आलेला हा कोल्हा गौताळा अभयारण्यातून आल्याचा अंदाज आहे. तो कोल्हा माणसाळलेला असून नागरिकांनी घाबरून जावू नये.  - राहुल सपकाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी सोयगाव 

टॅग्स :forestजंगलAurangabadऔरंगाबादforest departmentवनविभाग