शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

चार महिन्यांत दुष्काळी भागात सरकारने काहीच केले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 23:32 IST

महाराष्टÑ शासनाने आॅक्टोबर महिन्यात काही जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर केले. मागील चार महिन्यांत दुष्काळग्रस्त भागात ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या, त्या अजिबात केलेल्या नाहीत. ग्रामीण भागात तर पाणी नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक प्राणी पाण्याअभावी तडफडून मरत आहेत.

ठळक मुद्देएच. एम. देसरडा : पाण्याअभावी जनावरांचाही तडफडून मृत्यू

औैरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने आॅक्टोबर महिन्यात काही जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर केले. मागील चार महिन्यांत दुष्काळग्रस्त भागात ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या, त्या अजिबात केलेल्या नाहीत. ग्रामीण भागात तर पाणी नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक प्राणी पाण्याअभावी तडफडून मरत आहेत. मराठवाड्यात तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी काहीच केले नाही. चार महिने निव्वळ स्वत:चा उदोउदो करण्यात घालवले, असा आरोप महाराष्टÑ राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष एच. एम. देसरडा यांनी आज केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यमान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना वेगवेगळे पत्र मंडळातर्फे देण्यात आल्याचे देसरडा यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. १९७२ मध्ये दुष्काळ असताना राज्यात १५ लाख नागरिक कामावर होते. आज त्यापेक्षाही भयावह परिस्थिती असताना रोहयो कामावर फक्त ९० हजार मजूर आहेत. जेसीबीने अनेक रोहयोची कामे सुरू आहेत. दहा लाख नागरिकांना आज कामाची गरज आहे. ग्रामीण भागात नागरिकांना काम नाही, उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनतोय. दररोज दोन ते तीन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. राज्यातील युतीचे सरकार शेतकरी, जनविरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक जिल्ह्यांमध्ये आजही उसाला पाणी दिले जात आहे. मद्यार्क कंपन्यांना पाणी दिले जात आहे. मोठ-मोठ्या उत्सवांसाठी पाणी देणे सुरू आहे. मराठवाड्यात ६० टक्केच जलसाठे आहेत. या जलसाठ्यांमधील पाणी सांभाळून वापरले पाहिजे. दुष्काळी भागातील अनेक तरुण शिक्षणासाठी विद्यापीठात आलेले आहेत. कमवा शिका योजना राबवून त्यांना आर्थिक हातभार दिला गेला पाहिजे. शेतकऱ्यांना ५०० रुपये निर्वाह भत्ता दररोज द्यावा. किसान सन्मान योजना धूळफेक असल्याचा आरोपही त्यांनी केला. दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी तलाठी ते जिल्हाधिकाºयांपर्यंत सर्व यंत्रणेने ठोस पाऊल उचलले पाहिजे. अन्नसुरक्षा कायद्यानुसार गरजू कटुंबाला अन्नधान्य द्यावे, आदी मागण्या देसरडा यांनी केल्या.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळ