शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

चार महिन्यांत दुष्काळी भागात सरकारने काहीच केले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 23:32 IST

महाराष्टÑ शासनाने आॅक्टोबर महिन्यात काही जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर केले. मागील चार महिन्यांत दुष्काळग्रस्त भागात ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या, त्या अजिबात केलेल्या नाहीत. ग्रामीण भागात तर पाणी नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक प्राणी पाण्याअभावी तडफडून मरत आहेत.

ठळक मुद्देएच. एम. देसरडा : पाण्याअभावी जनावरांचाही तडफडून मृत्यू

औैरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने आॅक्टोबर महिन्यात काही जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर केले. मागील चार महिन्यांत दुष्काळग्रस्त भागात ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या, त्या अजिबात केलेल्या नाहीत. ग्रामीण भागात तर पाणी नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक प्राणी पाण्याअभावी तडफडून मरत आहेत. मराठवाड्यात तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी काहीच केले नाही. चार महिने निव्वळ स्वत:चा उदोउदो करण्यात घालवले, असा आरोप महाराष्टÑ राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष एच. एम. देसरडा यांनी आज केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यमान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना वेगवेगळे पत्र मंडळातर्फे देण्यात आल्याचे देसरडा यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. १९७२ मध्ये दुष्काळ असताना राज्यात १५ लाख नागरिक कामावर होते. आज त्यापेक्षाही भयावह परिस्थिती असताना रोहयो कामावर फक्त ९० हजार मजूर आहेत. जेसीबीने अनेक रोहयोची कामे सुरू आहेत. दहा लाख नागरिकांना आज कामाची गरज आहे. ग्रामीण भागात नागरिकांना काम नाही, उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनतोय. दररोज दोन ते तीन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. राज्यातील युतीचे सरकार शेतकरी, जनविरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक जिल्ह्यांमध्ये आजही उसाला पाणी दिले जात आहे. मद्यार्क कंपन्यांना पाणी दिले जात आहे. मोठ-मोठ्या उत्सवांसाठी पाणी देणे सुरू आहे. मराठवाड्यात ६० टक्केच जलसाठे आहेत. या जलसाठ्यांमधील पाणी सांभाळून वापरले पाहिजे. दुष्काळी भागातील अनेक तरुण शिक्षणासाठी विद्यापीठात आलेले आहेत. कमवा शिका योजना राबवून त्यांना आर्थिक हातभार दिला गेला पाहिजे. शेतकऱ्यांना ५०० रुपये निर्वाह भत्ता दररोज द्यावा. किसान सन्मान योजना धूळफेक असल्याचा आरोपही त्यांनी केला. दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी तलाठी ते जिल्हाधिकाºयांपर्यंत सर्व यंत्रणेने ठोस पाऊल उचलले पाहिजे. अन्नसुरक्षा कायद्यानुसार गरजू कटुंबाला अन्नधान्य द्यावे, आदी मागण्या देसरडा यांनी केल्या.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळ