शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

महाराष्ट्रात चार कोटी जनता व्यसनी; दरवर्षी 'एकच प्याला' घेतो ३ लाख जणांचा जीव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 16:37 IST

महाराष्ट्रातील सुमारे चार कोटी जनता व्यसनी असल्याचे व दारूमुळे दरवर्षी ३ लाख ५३ हजार ५८४ मृत्यू होत असल्याची माहिती व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाने दिली आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्रातील सुमारे चार कोटी जनता व्यसनी असल्याचे व दारूमुळे दरवर्षी ३ लाख ५३ हजार ५८४ मृत्यू होत असल्याची माहिती व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाने दिली आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आल्याचे मंचने म्हटले आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रातील गल्लीबोळांत व्यसनासाठी दारू, तंबाखू, गुटखा, तपकीर, खर्रा, सिगारेट, अफू, गांजा, ताडी इ. वैध व अवैध प्रकारात सहज उपलब्ध होत आहेत. यात सुमारे चार कोटी जनता कुठल्या ना कुठल्या व्यसनात अडकली आहे. याप्रमाणे सरासरी प्रत्येक कुटुंबात एक तरी व्यक्ती ही व्यसनाधीन आहेच. दरवर्षी सुमारे ३ लाख ५३ हजार ५८४ पेक्षा जास्त नागरिक दारू प्याल्यामुळे मृत्युमुखी पडत आहेत. म्हणजे ४५ हजार कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. ग्रामीण भागात आता पाऊचमध्ये अवैध दारू उपलब्ध होत आहे. सुमारे १२ ते साडेबारा लाख इतकी दारू विक्रेत्यांची संख्या आहे. हे लोक वैध, अवैध दारू विकतात. 

सुमारे १०० संस्था, संघटनांच्या सहभागाने व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचची स्थापना करण्यात आली आहे. अविनाश पाटील, माधव बावगे, वर्षा विद्या विलास आदींचा यात समावेश आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या संख्येतील २५ टक्केमहिला दारूसारख्या व्यसनाच्या अधीन झालेल्या पतीकडून रोज अमानुष मारहाण, मानसिक त्रास सहन करतात. ६२ टक्के नागरिकांचा आक्षेप आहे की, स्थानिक पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे, हप्तेखोरीमुळे अवैध दारू, गुटखा यासारखी व्यसने बंद होत नाहीत. २० टक्के नागरिकांनी राजकीय नेते, पुढारी व लोकप्रतिनिधी यांना जबाबदार धरले आहे. ६४ टक्केनागरिकांचे म्हणणे आहे की, दारू विक्रेत्यांना पर्यायी कामधंदा उपलब्ध आहे; परंतु श्रम न करता पैसे कमविण्याच्या लालसेपोटी हे काम केले जाते. 

महाराष्ट्रातील सुमारे १० जिल्ह्यांमध्ये दारूबंदी करण्याची मागणी तेथील महिला, युवा आणि सामाजिक- राजकीय संस्था, संघटनांकडून केली जात आहे. ती मान्य करून दारूबंदी केली पाहिजे व वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतील दारूबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे. २०२० हे महाराष्ट्राचे हीरकमहोत्सवी वर्ष आहे. 

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूmedicineऔषधंcancerकर्करोग