शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

औरंगाबाद जिल्ह्यात ३ अपघातात ४ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:45 IST

मृतात दाम्पत्य, युवक, पादचाऱ्याचा समावेश : पैठण, लिंबेजळगाव, दौलताबादनजीक वेगवेगळ्या दुर्घटना

पैठण/दौलताबाद/लिंबेजळगाव : औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात तीन वेगवेगळ्या रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. मृतात पती-पत्नी, युवक व एका पादचाºयाचा समावेश आहे.पैठणनजीक कारने पती-पत्नीला उडविलेपैठण-शहागड रस्त्यावर गोपेवाडी फाटा परिसरात समोरून येणाºया कारने धडक दिल्याने मोटारसायकलजवळ उभे असलेले पती-पत्नी ठार झाले. हा अपघात शनिवारी सकाळी १० वाजता घडला. आत्माराम बाबूराव गवांदे (५५) व मंगलाबाई आत्माराम गवांदे (५०, रा. माळवाडी- गुरुधानोरा ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), अशी मृतांची नावे आहेत. अपघात झाल्यावर गंभीर जखमी झालेल्या या दाम्पत्याला तातडीने औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान सायंकाळी दोघांचाही मृत्यू झाला. पैठण-नवगाव रस्त्यावर नायगाव फाट्याच्या पुढे चंदू निवारे यांच्या शेताजवळ भरधाव कारने (क्र. एमएच २०-७२७३) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटारसायकलला (क्र. एमएच २० डीक्यू -३२२१) जोराची धडक दिली. यावेळी हे दाम्पत्य मोटारसायकलसमोरच उभे होते. त्यांनाही कारने उडविले. गंभीर जखमी अवस्थेत दोघांनाही पैठण येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात हलविले. या अपघाताची नोंद पैठण पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून, कारचालक घटना घडल्यानंतर फरार झाला आहे. पुढील तपास जमादार किरण शिंदे करीत आहेत.चौकट...अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घालादरम्यान, हे शेतकरी दाम्पत्य नवगाव-तुळजापूर (ता. पैठण) येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी चालले होते, त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या दाम्पत्याच्या अकाली मृत्यूमुळे गुरुधानोरा परिसरावर शोककळा पसरली आहे, असे आमच्या सावखेडा व लिंबेजळगावच्या वार्ताहरांनी कळविले आहे.लिंबेजळगानजीक पादचाºयास चिरडलेलिंबेजळगाव बसस्थानकाजवळ एका बाजूला दुचाकी उभी करून रस्ता दुसºया बाजूने जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक पादचारी ठार झाल्याची घटना घडली. विनोद उत्तम परदेशी (३५, रा. सावखेडा, ता. पाचोरा, जि. जळगाव), असे अपघातातील मृताचे नाव आहे. सदर इसम गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला असताना नागरिकांनी सदर इसमाला पोलिसांच्या मदतीने घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, येथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दौलताबादनजीक ट्रकने घेतला दुचाकीस्वाराचा बळीदौलताबादनजीक भरधाव ट्रकच्या धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद-नाशिक मार्गावरील एका शाळेसमोर शनिवारी दुपारी ४ वाजेदरम्यान घडली. संदीप कचरू पवार (रा. माळीवाडा) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, दुपारी ४ वाजेच्या सुमारास संदीप दुचाकीवरून औरंगाबाद-नाशिक महामार्गावरून जात असताना येथे जैन इंटरनॅशनल स्कूलसमोर ट्रकने (क्र. एचआर-६९ ए-५५०५) दुचाकीला (क्र.एम.एच-२० ईडी-८४९२) जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दौलताबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी आर. बी. राठोड, के. के. खिलारे, थोरात यांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी संदीपला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास दौलताबाद पोलीस करीत आहेत.९ महिन्यांपूर्वीच झाले होते लग्नमयत संदीपच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. तो एका मोबाईल कंपनीच्या टॉवरचे काम करीत होता. विशेष म्हणजे ९ महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस