शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

औरंगाबाद जिल्ह्यात ३ अपघातात ४ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:45 IST

मृतात दाम्पत्य, युवक, पादचाऱ्याचा समावेश : पैठण, लिंबेजळगाव, दौलताबादनजीक वेगवेगळ्या दुर्घटना

पैठण/दौलताबाद/लिंबेजळगाव : औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात तीन वेगवेगळ्या रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. मृतात पती-पत्नी, युवक व एका पादचाºयाचा समावेश आहे.पैठणनजीक कारने पती-पत्नीला उडविलेपैठण-शहागड रस्त्यावर गोपेवाडी फाटा परिसरात समोरून येणाºया कारने धडक दिल्याने मोटारसायकलजवळ उभे असलेले पती-पत्नी ठार झाले. हा अपघात शनिवारी सकाळी १० वाजता घडला. आत्माराम बाबूराव गवांदे (५५) व मंगलाबाई आत्माराम गवांदे (५०, रा. माळवाडी- गुरुधानोरा ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), अशी मृतांची नावे आहेत. अपघात झाल्यावर गंभीर जखमी झालेल्या या दाम्पत्याला तातडीने औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान सायंकाळी दोघांचाही मृत्यू झाला. पैठण-नवगाव रस्त्यावर नायगाव फाट्याच्या पुढे चंदू निवारे यांच्या शेताजवळ भरधाव कारने (क्र. एमएच २०-७२७३) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटारसायकलला (क्र. एमएच २० डीक्यू -३२२१) जोराची धडक दिली. यावेळी हे दाम्पत्य मोटारसायकलसमोरच उभे होते. त्यांनाही कारने उडविले. गंभीर जखमी अवस्थेत दोघांनाही पैठण येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात हलविले. या अपघाताची नोंद पैठण पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून, कारचालक घटना घडल्यानंतर फरार झाला आहे. पुढील तपास जमादार किरण शिंदे करीत आहेत.चौकट...अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घालादरम्यान, हे शेतकरी दाम्पत्य नवगाव-तुळजापूर (ता. पैठण) येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी चालले होते, त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या दाम्पत्याच्या अकाली मृत्यूमुळे गुरुधानोरा परिसरावर शोककळा पसरली आहे, असे आमच्या सावखेडा व लिंबेजळगावच्या वार्ताहरांनी कळविले आहे.लिंबेजळगानजीक पादचाºयास चिरडलेलिंबेजळगाव बसस्थानकाजवळ एका बाजूला दुचाकी उभी करून रस्ता दुसºया बाजूने जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक पादचारी ठार झाल्याची घटना घडली. विनोद उत्तम परदेशी (३५, रा. सावखेडा, ता. पाचोरा, जि. जळगाव), असे अपघातातील मृताचे नाव आहे. सदर इसम गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला असताना नागरिकांनी सदर इसमाला पोलिसांच्या मदतीने घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, येथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दौलताबादनजीक ट्रकने घेतला दुचाकीस्वाराचा बळीदौलताबादनजीक भरधाव ट्रकच्या धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद-नाशिक मार्गावरील एका शाळेसमोर शनिवारी दुपारी ४ वाजेदरम्यान घडली. संदीप कचरू पवार (रा. माळीवाडा) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, दुपारी ४ वाजेच्या सुमारास संदीप दुचाकीवरून औरंगाबाद-नाशिक महामार्गावरून जात असताना येथे जैन इंटरनॅशनल स्कूलसमोर ट्रकने (क्र. एचआर-६९ ए-५५०५) दुचाकीला (क्र.एम.एच-२० ईडी-८४९२) जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दौलताबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी आर. बी. राठोड, के. के. खिलारे, थोरात यांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी संदीपला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास दौलताबाद पोलीस करीत आहेत.९ महिन्यांपूर्वीच झाले होते लग्नमयत संदीपच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. तो एका मोबाईल कंपनीच्या टॉवरचे काम करीत होता. विशेष म्हणजे ९ महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस