शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चार कोटींच्या विटांचा झाला चिखल; अवकाळी पावसाच्या तडाख्याने वीटभट्टी उद्योग कोलमडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 19:35 IST

विटांना बांधकामासाठी मोठी मागणी असल्याने शेकडो वर्षापासून पैठण परिसरास वीटांचा उद्योग सुरू आहे.

ठळक मुद्देगोदाकाठच्या उत्कृष्ट मातीमुळे निर्माण होणारी पैठणची वीट लोकप्रिय आहे.पावसाच्या तडाख्यात भाजण्यासाठी तयार असलेल्या लाखो विटांचा चिखल

पैठण :  बुधवारी सायंकाळी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे पैठण परिसरातील जवळपास ८० लाख कच्च्या विटांचा चिखल झाला आहे. लॉकडाऊन सारख्या प्रतिकूल परिस्थितीत सुरू असलेल्या विट निर्मिती उद्योगाला अवकाळी पावसाने जबर तडाखा दिला असून  विट उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अवकाळी पावसाने ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची ही पहिलीच वेळ असून या अगोदर अवकाळीचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर  फटका बसला नसल्याचे बोलले जात आहे. 

गोदाकाठच्या उत्कृष्ट मातीमुळे निर्माण होणारी पैठणची वीट लोकप्रिय आहे. या विटांना बांधकामासाठी मोठी मागणी असल्याने शेकडो वर्षापासून पैठण परिसरास वीटांचा उद्योग सुरू आहे. अलिकडच्या दहा वर्षात अनेक सुशिक्षित बेरोजगार या व्यवसायात उतरल्याने स्पर्धेतून दर्जेदार विटांची निर्मिती पैठण परिसरात होत आहे. पैठण शहरातील गोदाकाठ परिसरासह सिध्देश्वर मंदीर, पाटेगाव, शहागड रोड परिसरात पाच ते सात किलोमीटर पर्यंत विटभट्यांचे जाळे उभे राहिले आहे. तोक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. या पार्श्वभूमीवर दोन दिवस नुसते वादळ वारे घोंघावल्याने वीटभट्टी चालकांचा जीव भांड्यात पडला होता. बुधवारी सायंकाळी मात्र पैठण परिसरास जोरदार पावसाने झोडपून काढले. पावसाच्या तडाख्यात भाजण्यासाठी तयार असलेल्या लाखो विटांचा चिखल झाला.  

चार कोटींचे नुकसान.....परिसरातील वीटभट्ट्यावर साधारणपणे ८० ते ९० लाख कच्च्या वीटांचा माल तयार होता या विटाभिजल्या असून त्यांचे चिखलात रूपांतर होणार आहे. या विटांंचा चिखल झाल्याने एकंदरीत तीन ते चार कोटी रूपयांचे नुकसान झाले असे वीटभट्टी मालक संतोष धापटे यांनी सांगितले. 

शेवटचा माल आमचा नफा असतोसध्या वीटभट्टी हंगामाचा शेवट सुरू आहे.  पावसाने जो माल भिजला तो शेवटचा माल होता. परराज्यातील मजूर वीटा थापून परत गेले आहेत. चिखलाच्या परत विटा थापण्यासाठी आता मजूर उपलब्ध नाहीत. विटभट्टी मालकासाठी शेवटच्या भट्ट्या हाच नफा असतो. मात्र, दुर्दैवाने अवकाळी पावसाने संपूर्ण माल भिजल्याने वीटभट्टी मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी वीटभट्टी मालक पवन शिसोदे यांनी केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस