शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

चार कोटींच्या विटांचा झाला चिखल; अवकाळी पावसाच्या तडाख्याने वीटभट्टी उद्योग कोलमडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 19:35 IST

विटांना बांधकामासाठी मोठी मागणी असल्याने शेकडो वर्षापासून पैठण परिसरास वीटांचा उद्योग सुरू आहे.

ठळक मुद्देगोदाकाठच्या उत्कृष्ट मातीमुळे निर्माण होणारी पैठणची वीट लोकप्रिय आहे.पावसाच्या तडाख्यात भाजण्यासाठी तयार असलेल्या लाखो विटांचा चिखल

पैठण :  बुधवारी सायंकाळी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे पैठण परिसरातील जवळपास ८० लाख कच्च्या विटांचा चिखल झाला आहे. लॉकडाऊन सारख्या प्रतिकूल परिस्थितीत सुरू असलेल्या विट निर्मिती उद्योगाला अवकाळी पावसाने जबर तडाखा दिला असून  विट उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अवकाळी पावसाने ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची ही पहिलीच वेळ असून या अगोदर अवकाळीचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर  फटका बसला नसल्याचे बोलले जात आहे. 

गोदाकाठच्या उत्कृष्ट मातीमुळे निर्माण होणारी पैठणची वीट लोकप्रिय आहे. या विटांना बांधकामासाठी मोठी मागणी असल्याने शेकडो वर्षापासून पैठण परिसरास वीटांचा उद्योग सुरू आहे. अलिकडच्या दहा वर्षात अनेक सुशिक्षित बेरोजगार या व्यवसायात उतरल्याने स्पर्धेतून दर्जेदार विटांची निर्मिती पैठण परिसरात होत आहे. पैठण शहरातील गोदाकाठ परिसरासह सिध्देश्वर मंदीर, पाटेगाव, शहागड रोड परिसरात पाच ते सात किलोमीटर पर्यंत विटभट्यांचे जाळे उभे राहिले आहे. तोक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. या पार्श्वभूमीवर दोन दिवस नुसते वादळ वारे घोंघावल्याने वीटभट्टी चालकांचा जीव भांड्यात पडला होता. बुधवारी सायंकाळी मात्र पैठण परिसरास जोरदार पावसाने झोडपून काढले. पावसाच्या तडाख्यात भाजण्यासाठी तयार असलेल्या लाखो विटांचा चिखल झाला.  

चार कोटींचे नुकसान.....परिसरातील वीटभट्ट्यावर साधारणपणे ८० ते ९० लाख कच्च्या वीटांचा माल तयार होता या विटाभिजल्या असून त्यांचे चिखलात रूपांतर होणार आहे. या विटांंचा चिखल झाल्याने एकंदरीत तीन ते चार कोटी रूपयांचे नुकसान झाले असे वीटभट्टी मालक संतोष धापटे यांनी सांगितले. 

शेवटचा माल आमचा नफा असतोसध्या वीटभट्टी हंगामाचा शेवट सुरू आहे.  पावसाने जो माल भिजला तो शेवटचा माल होता. परराज्यातील मजूर वीटा थापून परत गेले आहेत. चिखलाच्या परत विटा थापण्यासाठी आता मजूर उपलब्ध नाहीत. विटभट्टी मालकासाठी शेवटच्या भट्ट्या हाच नफा असतो. मात्र, दुर्दैवाने अवकाळी पावसाने संपूर्ण माल भिजल्याने वीटभट्टी मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी वीटभट्टी मालक पवन शिसोदे यांनी केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस