शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

साडेआठ हजार कृषीपंप वीज जोडणीविना

By admin | Updated: June 12, 2017 00:24 IST

जालना :महावितरणच्या उदासीन भूमिकेमुळे जिल्ह्यातील आठ हजार ९५० कृषिपंपांना वर्षभरापासून वीज जोडणी मिळालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप व रबी हंगामात पिकांना पाणी देण्यासाठी विहिरी, कूपनलिकांवर कृषिपंप बसविण्यास शेतकरी प्राधान्य देतात. मात्र, आवश्यक अनामत रक्कम भरूनही शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळत नाही. तांत्रिक अडचणी व महावितरणच्या उदासीन भूमिकेमुळे जिल्ह्यातील आठ हजार ९५० कृषिपंपांना वर्षभरापासून वीज जोडणी मिळालेली नाही.मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. पाणी उपलब्ध असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी विहिरींवर कृषिपंप बसविण्यास प्राधान्य दिले. २०१६-१७ मध्ये तब्बल चौदा हजार ९६० शेतकऱ्यांनी सुरक्षा अनामत रक्कम भरून वीज जोडणीसाठी अर्ज केला. पैकी सहा हजार १० कृषिपंपाना महावितरणकडून वीज जोडणी देण्यात आली, तर आठ हजार ९५० कृषिपंपांना अद्याप वीज जोडणी मिळालेली नाही. वर्ष २०१७-१८ मध्ये विविध योजनेअंतर्गत अधिकाधिक कृषिपंपांना वीज जोडणी देण्यासाठी महावितरणकडून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सुरक्षा अनामत रक्कम भरून तीन हजार कृषिपंपांना वीज जोडणी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कृृषी विशेष पॅकेजमधून ८१०, जिल्हा विकास आराखड्यातून ४५०, इन्फ्रा अंतर्गत २४०० कृषिपंपांना वीज जोडणी देण्याचे नियोजन करण्यात आले असून, याकरिता ६९ कोटी १२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये जून अखेर तीन हजार, जुलै-सप्टेंबरमध्ये तीन हजार, आॅक्टोबर-डिसेंबरमध्ये तीन हजार आणि जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान दोन हजार ९५० कृषिपंपांना वीज जोडणी देण्याचे प्राथमिक नियोजन करण्यात आले आहे.