शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

साडेआठ हजार कृषीपंप वीज जोडणीविना

By admin | Updated: June 12, 2017 00:24 IST

जालना :महावितरणच्या उदासीन भूमिकेमुळे जिल्ह्यातील आठ हजार ९५० कृषिपंपांना वर्षभरापासून वीज जोडणी मिळालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप व रबी हंगामात पिकांना पाणी देण्यासाठी विहिरी, कूपनलिकांवर कृषिपंप बसविण्यास शेतकरी प्राधान्य देतात. मात्र, आवश्यक अनामत रक्कम भरूनही शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळत नाही. तांत्रिक अडचणी व महावितरणच्या उदासीन भूमिकेमुळे जिल्ह्यातील आठ हजार ९५० कृषिपंपांना वर्षभरापासून वीज जोडणी मिळालेली नाही.मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. पाणी उपलब्ध असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी विहिरींवर कृषिपंप बसविण्यास प्राधान्य दिले. २०१६-१७ मध्ये तब्बल चौदा हजार ९६० शेतकऱ्यांनी सुरक्षा अनामत रक्कम भरून वीज जोडणीसाठी अर्ज केला. पैकी सहा हजार १० कृषिपंपाना महावितरणकडून वीज जोडणी देण्यात आली, तर आठ हजार ९५० कृषिपंपांना अद्याप वीज जोडणी मिळालेली नाही. वर्ष २०१७-१८ मध्ये विविध योजनेअंतर्गत अधिकाधिक कृषिपंपांना वीज जोडणी देण्यासाठी महावितरणकडून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सुरक्षा अनामत रक्कम भरून तीन हजार कृषिपंपांना वीज जोडणी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कृृषी विशेष पॅकेजमधून ८१०, जिल्हा विकास आराखड्यातून ४५०, इन्फ्रा अंतर्गत २४०० कृषिपंपांना वीज जोडणी देण्याचे नियोजन करण्यात आले असून, याकरिता ६९ कोटी १२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये जून अखेर तीन हजार, जुलै-सप्टेंबरमध्ये तीन हजार, आॅक्टोबर-डिसेंबरमध्ये तीन हजार आणि जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान दोन हजार ९५० कृषिपंपांना वीज जोडणी देण्याचे प्राथमिक नियोजन करण्यात आले आहे.