शहरं
Join us  
Trending Stories
1
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
2
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
3
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
4
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
5
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या
6
Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
7
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
8
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
9
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
10
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
11
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
12
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
13
टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!
14
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
15
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग
16
Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
17
पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 
18
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
19
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
20
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!

नाथषष्ठी सोहळ्यास औपचारिक प्रारंभ; विधिवत पूजनानंतर रांजण भरण्याची प्रक्रिया सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 18:26 IST

ज्या दिवशी भरतो त्या दिवशी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण  नाथषष्ठी सोहळ्यास उपस्थित होतात अशी शेकडो वर्षापासून वारकऱ्यांची धारणा आहे.

ठळक मुद्देतुकाराम बीजेच्या मुहूर्तावर नाथवंशजांनी या पवित्र रांजणाची विधिवत पूजारांजण भरण्यास भगवंत येतात

- संजय जाधव

पैठण : 

आवडीने कावडीने वाहीले पाणी।एकचि काय वदावे पडिल्या कार्यात वाहिले पाणी।।

नाथमहाराजांच्या वाड्यातील ( गावातील नाथमंदीर) ज्या रांजणात प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण यांनी गोदावरीतून कावडीने पाणी आणून भरल्याची आख्यायिका आहे, अशा पवित्र रांजणाची विधीवत पूजा करुन त्यात पाणी भरण्यास सुरवात झाली. रांजण भरण्यास सुरवात होताच नाथषष्ठीस औपचारिक प्रारंभ होतो. भाविक गोदावरीतून पाणी आणून या रांजणात ओततात हा रांजण ज्या दिवशी भरतो त्या दिवशी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण  नाथषष्ठी सोहळ्यास उपस्थित होतात अशी शेकडो वर्षापासून वारकऱ्यांची धारणा आहे. यंदा किती दिवसांनी रांजण भरेल याकडे वारकरी भाविकांचे लक्ष लागले आहे.

तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर नाथवंशजांनी या पवित्र रांजणाची विधिवत पूजा केल्यानंतर  भाविकांनी रांजण भरण्यास प्रारंभ केला. भगवान श्रीकृष्णाने श्रीखंड्याच्या रूपात  पैठण नगरीत वास्तव्य करून सलग १२ वर्ष नाथ महाराजांच्या वाड्यातील या पवित्र रांजणात गोदावरीतून कावडीने पाणी आणून भरल्याची आख्यायिका आहे. रांजण भरण्यास प्रारंभ झाला म्हणजे नाथषष्ठी सोहळ्यास औपचारिकपणे प्रारंभ झाला असे मानले जाते.

अशी आहे आख्यायिकाजगाच्या पाठीवर श्रीसंत एकनाथ महाराज असे संत होते की, भगवान श्रीकृष्णांना देखील नाथ महाराजांच्या घरी राहून सेवा करण्याची ऊत्कट ईच्छा निर्माण झाली.  भगवंत 'श्रीखंड्या' हे रूप धारण करून नाथांच्या घरी प्रकट झाले. नाथ महाराजांची भेट घेऊन त्यांनी  सेवा करण्याचा मनोदय व्यक्त केला, सांगाल ते पडेल ते काम करीन मला सेवा करू द्या अशी विनंती करून नाथ महाराजांची परवानगी मिळविली. नाथ महाराजांच्या घरी राहून भगवंत सर्व कामे करू लागले,  सडा ,भांडी, स्वयंपाक,  ऊष्टावळी,  गंध ऊगळणे, स्नानाचे पाणी काढून देणे , गिरिजा आईस स्वयंपाकास मदत करणे, नाथ महाराज किर्तन करत असताना धृपद म्हणणे,  किर्तनात नाचणे असे नानाविध कामे करत भगवंत नाथ महाराजां सोबत सावली सारखे वावरत होते. भगवंताचे पैठण नगरीत पाणी भरण्याचे कार्य सुरू असताना द्वारकेत एका भक्ताने श्रीकृष्ण दर्शनासाठी खडतर तपश्चर्या सुरू केली होती, अखेर या भक्तास दृष्टांत झाला की, भगवान श्रीकृष्ण हे नाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपात आहेत, त्या भक्ताने पैठणला येऊन नाथ महाराजांना या बाबत कल्पना दिली हे समजताच प्रत्यक्ष भगवंताकडून सेवा करून घेतली याचे नाथ महाराजांना फार वाईट वाटले. लगेच श्रीखंड्याच्या रूपातील भगवंताचा पैठण नगरित शोध सूरू झाला परंतु भगवंत कोठेच सापडेना शेवटी नाथ महाराजांनी भगवंताचा धावा करताना माझ्या हातून काय अपराध घडला म्हणून भगवंत आपण माझ्यावर रागावलात अशा शब्दात भगवंताची विनवणी केली, तेव्हा भगवान श्रीकृष्ण तेथे प्रकट झाले. नाथ महाराज व द्वारकेच्या भक्तास भगवंतानी दर्शन दिले. नाथ महाराजांनी आपण पैठण सोडून जाऊ नये अशी विनंती भगवंतांना केली, तेव्हा मी दरवर्षी येथे येईल असे सांगत भगवान श्रीकृष्णांनी पैठण नगरीतून प्रस्थान केले. 

रांजण भरण्यास भगवंत येतातभगवंताने मी दरवर्षी पैठण येथे येईल असे सांगितले होते तेव्हा पासून नाथषष्ठी सोहळ्यास भगवान श्रीकृष्ण कुणाच्याही रूपात उपस्थित राहतात असे मानले जाते, ज्याच्या हातून पवित्र रांजण भरला जातो त्यास भगवान श्रीकृष्ण माणून नाथवंशजांच्या वतीने मान देण्यात येतो. संत एकनाथ षष्ठी उत्सवास आज तुकाराम बीज पासून रांजनाच्या पुजेने प्रारंभ झाला. रघुनाथ महाराज पांडव ( पालखीवाले) यांच्या हस्ते विधीवत मंत्रघोषात पूजा करण्यात आली. या प्रसंगी नगराध्यक्ष सुरज लोळगे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, आदी मान्यवरासह मोठ्यासंख्येने भाविक भक्त नाथमंदिरात उपस्थित होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAdhyatmikआध्यात्मिकtourismपर्यटन