शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे रुपयांत कोरोनाचा विसर; आरटीपीसीआर, लसीकरण नसले तरीही राज्यसीमेतून येजा करण्यास मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 11:58 IST

Corona Virus : राज्याच्या सीमा भागांत आरटीपीसीआर, लसीकरण प्रमाणपत्र नसलेल्यांकडून सर्रास वसुली

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाच्या ( Corona Virus In Maharashtra ) नव्या म्युटंट (उत्परिवर्तित प्रकाराचे) आणि तिसऱ्या लाटेचे संकट उभे आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील तरच प्रवासाची मुभा दिली जात आहे (allowed to cross the state border without RTPCR, vaccination by giving money) . हीच संधी साधून राज्याच्या सीमा भागांत आरटीपीसीआर, लसीकरण प्रमाणपत्र नसलेल्यांकडून सर्रास दोनशे, पाचशे रुपयांची वसुली करून ये-जा करण्याची मुभा दिली जात आहे. हा प्रकार कोरोना वाढीला हातभार लावणारा ठरण्याची भीती नाकारता येत नाही.

कोरोनाच्या नवीन म्युटंट ‘ओमिक्राॅन’च्या धास्तीने राज्य सरकारने सावधगिरीचा उपाय म्हणून कोरोनासंदर्भातील नवीन नियमावली शनिवारी जारी करीत निर्बंध कडक केले. कोरोनाचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस झालेल्यांनाच रिक्षा, टॅक्सी, बस, कॅब अशा सर्व सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे. कर्नाटकातील बंगळुरुमध्ये दक्षिण आफ्रिकेहून आलेल्यांपैकी दोन प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे शनिवारी समोर आले. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर प्रवाशांकडे आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल विचारला जातो. त्याबरोबरच लसीचे दोन्ही डोस घेतलेले प्रमाणपत्रही विचारले जाते. ज्यांच्याकडे यापैकी काहीही नाही, त्यांना एक तर परत पाठविणे अथवा जागेवर अँटिजन तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र, असे काहीही होत नाही. प्रतिप्रवासी दोनशे ते पाचशे रुपये उकळले जातात. सोलापूर- भैरूनगी - इंडी (कर्नाटक), अक्कलकोट-गाणगापूर (कर्नाटक) रस्त्यावर हा अनुभव अनेक प्रवाशांना येत आहे. लसीकरण, आरटीपीसीआर प्रमाणपत्राची विचारणा करणारे अगदी साध्या गणवेशात, पायात चप्पल घातलेले लोक पाहायला मिळतात. एखादा कर्मचारी खाकीतील असतो.

काय आहे धोका ?लस न घेतलेले नागरिक, आरटीपीसीआर तपासणी प्रमाणपत्र नसलेले नागरिक अगदी सहजपणे ये-जा करीत आहेत. म्हणजे राज्यासह इतर राज्यांतही नागरिक लसीचा एकही डोस न घेता जात असल्याचा प्रकार होत आहे. राज्यात कडक निर्बंध लावले जात आहेत; परंतु पैशांच्या जोरावर सीमा भागांत होणारा बिनधास्त वावर कोरोनावाढीच्या दृष्टीने महाग ठरण्याची भीती नाकारता येत नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकAurangabadऔरंगाबाद