शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

"फॅसीझमच्या विरोधात पक्षभेद विसरून एकत्र या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 04:26 IST

कोणत्याही देशात हुकूमशाही येण्याअगोदर मजबूत संस्था उद्ध्वस्त केल्या जातात.

औरंगाबाद : कोणत्याही देशात हुकूमशाही येण्याअगोदर मजबूत संस्था उद्ध्वस्त केल्या जातात. हीच प्रक्रिया देशात सुरू आहे. या विरोधात समविचारी लोकांनी पक्षभेद विसरून एकत्र आले पाहिजे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी युवकांना केले.युथ फॉर डेमोक्रॅसी आणि निर्धार सोशल फाऊंडेशनतर्फे ‘सोच से सोच की लढाई’ हा संवादात्मक कार्यक्रम बुधवारी (दि.२३) तिरुमला मंगल कार्यालय, गारखेडा येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेसचे सहसचिव कृष्णा अल्लावरू, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, पत्रकार अमेय तिरोडकर, उद्योजक तथा लेखक शरद तांदळे आणि राष्ट्रीय समन्वयक मनीष शर्मा यांची उपस्थिती होती.आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, मागील साडेचार वर्षांत मोदी-शहा जोडीने सीबीआय, आरबीआय, न्यायव्यवस्था, यूजीसी, केंद्रीय विद्यापीठे, बँकिंग व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. लोकशाहीच्या स्तंभांवर नियंत्रण मिळवले आहे. हुकूमशाही येण्याची हीच लक्षणे आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना हाताशी धरून राफेल घोटाळा दाबण्यात येत आहे. हा न्यायालयाचा अवमान वाटत असेल, पण दिलेल्या निर्णयाचे अवलोकन करणे हे माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. संघ विचाराचे लोक भारतीय ऐतिहासिक अनुसंधान परिषद ताब्यात घेत ५ हजार वर्षांचा इतिहास बदलण्याचा अजेंडा राबवीत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांनी गांधी हत्येनंतर संघावर बंदी घातलेली मूळ अभिलेखे गायब केली आहेत. उलट त्याच पटेल यांना स्वत:चा बाप बनवून घेत असल्याची टीकाही डॉ. आव्हाड यांनी केली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड