शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
3
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
4
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
5
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
6
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
7
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
8
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
9
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
10
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
11
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
12
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
13
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
14
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
15
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
16
इथिओपियातून दिल्लीत आली ज्वालामुखीची राख; तब्बल १२ वर्षांनंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक 
17
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
18
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
19
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
20
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
Daily Top 2Weekly Top 5

"फॅसीझमच्या विरोधात पक्षभेद विसरून एकत्र या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 04:26 IST

कोणत्याही देशात हुकूमशाही येण्याअगोदर मजबूत संस्था उद्ध्वस्त केल्या जातात.

औरंगाबाद : कोणत्याही देशात हुकूमशाही येण्याअगोदर मजबूत संस्था उद्ध्वस्त केल्या जातात. हीच प्रक्रिया देशात सुरू आहे. या विरोधात समविचारी लोकांनी पक्षभेद विसरून एकत्र आले पाहिजे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी युवकांना केले.युथ फॉर डेमोक्रॅसी आणि निर्धार सोशल फाऊंडेशनतर्फे ‘सोच से सोच की लढाई’ हा संवादात्मक कार्यक्रम बुधवारी (दि.२३) तिरुमला मंगल कार्यालय, गारखेडा येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेसचे सहसचिव कृष्णा अल्लावरू, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, पत्रकार अमेय तिरोडकर, उद्योजक तथा लेखक शरद तांदळे आणि राष्ट्रीय समन्वयक मनीष शर्मा यांची उपस्थिती होती.आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, मागील साडेचार वर्षांत मोदी-शहा जोडीने सीबीआय, आरबीआय, न्यायव्यवस्था, यूजीसी, केंद्रीय विद्यापीठे, बँकिंग व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. लोकशाहीच्या स्तंभांवर नियंत्रण मिळवले आहे. हुकूमशाही येण्याची हीच लक्षणे आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना हाताशी धरून राफेल घोटाळा दाबण्यात येत आहे. हा न्यायालयाचा अवमान वाटत असेल, पण दिलेल्या निर्णयाचे अवलोकन करणे हे माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. संघ विचाराचे लोक भारतीय ऐतिहासिक अनुसंधान परिषद ताब्यात घेत ५ हजार वर्षांचा इतिहास बदलण्याचा अजेंडा राबवीत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांनी गांधी हत्येनंतर संघावर बंदी घातलेली मूळ अभिलेखे गायब केली आहेत. उलट त्याच पटेल यांना स्वत:चा बाप बनवून घेत असल्याची टीकाही डॉ. आव्हाड यांनी केली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड