शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद विभागात एकाच कन्येला मिळाली वनसमृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 17:24 IST

कन्यारत्नाचे स्वागत व पर्यावरण संवर्धन या उद्देशाने वन विभागातर्फे जुलै महिन्यात कन्या वनसमृद्धीची घोषणा करण्यात आली.

- रुचिका पालोदकरऔरंगाबाद : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद विभागात 'कन्या वनसमृद्धी' या योजनेचा शुभारंभ केला जाईल, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार दि.१५ आॅगस्ट रोजी कन्नड तालुक्यातील हतनूर या गावी एका कन्येच्या पालकांना दहा रोपटी देण्यात आली. यामध्ये आंब्याची पाच, जांभळाची तीन आणि बदामाची दोन रोपटी आहेत. 

वनक्षेत्राव्यतिरिक्त जास्तीत जास्त क्षेत्र वनाखाली आणणे, पर्यावरण, वृक्षसंवर्धन, वृक्ष लागवड, संगोपन आणि संवर्धन जैवविविधता आदींबाबत सध्याच्या आणि भावी पिढीमध्ये आवड निर्माण करणे, तसेच मुलींच्या घटत्या संख्येवर नियंत्रण आणणे, हे प्रयत्न या योजनेतून केले जाणार आहेत. या योजनेकरिता राज्यासाठी प्रथम वर्षात किमान दोन लाख रोपे उपलब्ध होणार असून, त्यानंतर प्रतिवर्षी १० टक्क्यांनी या संख्येत वाढ करण्यात येईल.

ही योजना मुळातच उशिरा सुरू झाली आहे. तसेच कामाचा इतर व्याप आणि मर्यादित कर्मचारी यामुळे या योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे दि.१५ आॅगस्ट रोजी एका मुलीच्या पालकांना रोपटी वाटप करून योजनेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. संबंधित ग्रामपंचायतींना योजनेविषयी माहिती देण्यात आली असून, त्यांच्याकडून लाभार्थी होऊ शकणाऱ्यांची नावे मागविण्यात आली आहेत, अशी माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. 

अजूनही पाटी कोरीचयोजनेचा शुभारंभ झाला असला तरी अजूनही लाभार्थ्यांच्या यादीची पाटी कोरीच असल्याचे लक्षात येते. ग्रामीण भागातील खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळण्यासाठी या योजनेचा प्रचार होणे आवश्यक आहे. लागवड केलेल्या झाडांपासून मिळणारे सर्व उत्पन्न मुलीच्या कौशल्य विकास, उच्चशिक्षण आणि रोजगार मिळविणे तसेच मुलीच्या भविष्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार उपयोगात आणता येईल. ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात दोन मुली जन्माला येतील व त्यानंतर कुटुंबातील अपत्यांची संख्या नियंत्रित केली जाईल, अशांनाच केवळ या योजनेचा लाभ मिळविता येईल.एक मुलगा व एक मुलगी असणाऱ्या कुटुंबातील मुलीलाही या योजनेचा लाभ मिळू शकेल. योजनेचा लाभ मिळण्यासाठी मुलीच्या जन्मानंतर पालकांनी ग्रामपंचायतीमध्ये नावनोंदणी करावी.नावनोंदणी केल्यानंतर मुलीच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या पावसाळ्यात दि. १ ते ७ जुलै या काळात पालकांना वृक्षारोपणासाठी मोफत रोपटी दिली जातील.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाforest departmentवनविभाग