शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

स्टरलाइट कंपनीकडून १६० कायमस्वरूपी कामगारांना बळजबरी स्वेच्छानिवृत्ती

By बापू सोळुंके | Updated: February 20, 2024 16:28 IST

व्यवस्थापनाने मागील तीन महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने कामगारांकडून राजीनामे लिहून घेत त्यांची कपात चालविली आहे.

छत्रपती संभाजीनगर : ऑप्टिकल फायबरचे उत्पादन करणाऱ्या स्टरलाइट कंपनीने सुमारे १६० कायमस्वरूपी कामगारांना कामावरून अचानक कमी केल्याने कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे. कंपनीची आर्थिक परिस्थिती खराब असल्याचे कारण देत कंपनी व्यवस्थापनाने मागील तीन महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने कामगारांकडून राजीनामे लिहून घेत त्यांची कपात चालविली आहे. याविरोधात कामगारांनी कामगार उपायुक्तांकडे धाव घेतली आहे.

या कंपनीत कायमस्वरुपी सुमारे २०० आणि तेवढेच कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. तीन महिन्यांपूर्वी कंपनीने अचानक दहा कामगारांना कंपनीतून काढून टाकले. यानंतर काही कामगारांना नोटीस बजावून राजीनामे देण्यास सांगितले. सध्या कंपनीचा व्यवसाय मंदावल्यामुळे कामगार कपात करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतल्याचे कारण मानव संसाधन विभागाकडून दिले गेले. राजीनामा देण्यास नकार देणाऱ्या कामगारांना कामावरून बडतर्फ करण्यात येईल. अनुभव प्रमाणपत्र आणि इतर काेणतेही आर्थिक लाभ मिळणार नाहीत, अशा प्रकारे धमकावण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला. यानंतर टप्प्याटप्प्याने तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे १६० कामगारांचे राजीनामे घेण्यात आले. यातील बहुतेक कामगार आंध्र प्रदेश, झारखंड, प. बंगाल, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील आहेत.

काही कामगारांनी औद्योगिक न्यायालयात दाद मागितल्याने सतर्क झालेल्या व्यवस्थापनाने अन्य कामगारांना कंपनीत बोलावून बळजबरीने राजीनामा देण्यास भाग पाडले. कंपनीच्या ‘सिस्टम’मध्ये राजीनामे घेतल्यानंतर बहुतांश कामगारांकडून लेखी स्वरुपातही राजीनामे घेण्यात आल्याचे कामगारांनी सांगितले. यासंदर्भात कंपनीची बाजू जाणून घेण्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापक आशिष जेहूरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. युनिट हेड भालचंद्र पाठक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

उर्वरित सेवेचे वेतन एकरकमी देण्याची कामगारांची मागणीकंपनीचे वाळूज येथे तीन आणि शेंद्रा येथे एक असे एकूण चार प्रकल्प आहेत. एक युनिट तोट्यात चालत असेल तर दुसऱ्या युनिटमध्ये कामगारांची बदली करण्याची मागणी आहे. कंपनी व्यवस्थापनाने १० वर्षे काम करणाऱ्या कामगारांना अर्धे वेतन, त्यांचा पीएफ, ग्रॅच्युइटी व अन्य कायदेशीर देणी देण्याचे आमिष दाखविण्यात आले आहे. कामगारांनी कंपनीत सेवा बजावलेला कार्यकाळ गृहीत न धरता निवृत्तीपर्यंत जेवढी वर्षे शिल्लक असतील तेवढ्या वर्षापर्यंत अर्धे वेतन व एकरकमी रक्कम देण्याची मागणी व्यवस्थापनाकडे केली आहे. व्यवस्थापनाने कामगारांची मागणी धुडकावून लावल्याचे कामगारांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी