शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

स्टरलाइट कंपनीकडून १६० कायमस्वरूपी कामगारांना बळजबरी स्वेच्छानिवृत्ती

By बापू सोळुंके | Updated: February 20, 2024 16:28 IST

व्यवस्थापनाने मागील तीन महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने कामगारांकडून राजीनामे लिहून घेत त्यांची कपात चालविली आहे.

छत्रपती संभाजीनगर : ऑप्टिकल फायबरचे उत्पादन करणाऱ्या स्टरलाइट कंपनीने सुमारे १६० कायमस्वरूपी कामगारांना कामावरून अचानक कमी केल्याने कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे. कंपनीची आर्थिक परिस्थिती खराब असल्याचे कारण देत कंपनी व्यवस्थापनाने मागील तीन महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने कामगारांकडून राजीनामे लिहून घेत त्यांची कपात चालविली आहे. याविरोधात कामगारांनी कामगार उपायुक्तांकडे धाव घेतली आहे.

या कंपनीत कायमस्वरुपी सुमारे २०० आणि तेवढेच कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. तीन महिन्यांपूर्वी कंपनीने अचानक दहा कामगारांना कंपनीतून काढून टाकले. यानंतर काही कामगारांना नोटीस बजावून राजीनामे देण्यास सांगितले. सध्या कंपनीचा व्यवसाय मंदावल्यामुळे कामगार कपात करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतल्याचे कारण मानव संसाधन विभागाकडून दिले गेले. राजीनामा देण्यास नकार देणाऱ्या कामगारांना कामावरून बडतर्फ करण्यात येईल. अनुभव प्रमाणपत्र आणि इतर काेणतेही आर्थिक लाभ मिळणार नाहीत, अशा प्रकारे धमकावण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला. यानंतर टप्प्याटप्प्याने तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे १६० कामगारांचे राजीनामे घेण्यात आले. यातील बहुतेक कामगार आंध्र प्रदेश, झारखंड, प. बंगाल, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील आहेत.

काही कामगारांनी औद्योगिक न्यायालयात दाद मागितल्याने सतर्क झालेल्या व्यवस्थापनाने अन्य कामगारांना कंपनीत बोलावून बळजबरीने राजीनामा देण्यास भाग पाडले. कंपनीच्या ‘सिस्टम’मध्ये राजीनामे घेतल्यानंतर बहुतांश कामगारांकडून लेखी स्वरुपातही राजीनामे घेण्यात आल्याचे कामगारांनी सांगितले. यासंदर्भात कंपनीची बाजू जाणून घेण्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापक आशिष जेहूरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. युनिट हेड भालचंद्र पाठक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

उर्वरित सेवेचे वेतन एकरकमी देण्याची कामगारांची मागणीकंपनीचे वाळूज येथे तीन आणि शेंद्रा येथे एक असे एकूण चार प्रकल्प आहेत. एक युनिट तोट्यात चालत असेल तर दुसऱ्या युनिटमध्ये कामगारांची बदली करण्याची मागणी आहे. कंपनी व्यवस्थापनाने १० वर्षे काम करणाऱ्या कामगारांना अर्धे वेतन, त्यांचा पीएफ, ग्रॅच्युइटी व अन्य कायदेशीर देणी देण्याचे आमिष दाखविण्यात आले आहे. कामगारांनी कंपनीत सेवा बजावलेला कार्यकाळ गृहीत न धरता निवृत्तीपर्यंत जेवढी वर्षे शिल्लक असतील तेवढ्या वर्षापर्यंत अर्धे वेतन व एकरकमी रक्कम देण्याची मागणी व्यवस्थापनाकडे केली आहे. व्यवस्थापनाने कामगारांची मागणी धुडकावून लावल्याचे कामगारांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी