शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

सक्तीची रजा संपली; पोलीस आयुक्त रुजू झालेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 16:41 IST

सक्तीच्या रजेचा कालावधी १५ एप्रिल रोजी संपल्यानंतरही शहराचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव हे रुजू झाले नाहीत.

ठळक मुद्देपोलीस आयुक्त १६ मार्चपासून सक्तीच्या रजेवर गेले.. रजेवर जाताना त्यांनी नाराजी व्यक्त करीत पुन्हा या शहरात येण्याची इच्छा नाही, असे विधान केले होते.

औरंगाबाद : सक्तीच्या रजेचा कालावधी १५ एप्रिल रोजी संपल्यानंतरही शहराचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव हे रुजू झाले नाहीत. आयुक्त यादव यांची आता अन्य ठिकाणी बदली होईल आणि शहराला नवे पोलीस आयुक्त प्राप्त होतील, या चर्चेला सध्या सर्वत्र उधाण आले आहे. 

शहरातील कचरा टाकण्यावरून ७ मार्च रोजी मिटमिटा येथे जोरदार दंगल झाली आणि यानंतर पोलिसांनी कायदा हातात घेत सामान्यांना घरात घुसून झोडपून काढले. त्यांच्या वाहनांचे नुकसान केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी पोलीस महासंचालक आणि अतिरिक्त गृह सचिव यांच्या समितीकडून करण्याचे आश्वासन दिले आणि पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवित असल्याची घोषणा केली.

पोलीस आयुक्त १६ मार्चपासून सक्तीच्या रजेवर गेले. रजेवर जाताना त्यांनी नाराजी व्यक्त करीत पुन्हा या शहरात येण्याची इच्छा नाही, असे विधान केले होते. तेव्हापासून औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे पोलीस आयुक्तांचा अतिरिक्त पदभार सांभाळत आहेत. भारंबे यांनी प्रभारी असूनही शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी खुले चर्चासत्र घेतले. यासोबतच वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना मुंबईतील इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्राफिक मॅनेजमेंट येथे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि ५० कर्मचाऱ्यांचा एक गट प्रशिक्षणासाठी पाठविला. पोलीस आयुक्तांची ब्रँच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांची त्यांनी तडकाफडकी बदली केली.

कांबळे यांना आयुक्त यादव यांनी सहा महिन्यांपूर्वीच गुन्हे शाखेत नियुक्त केले होते. सक्तीच्या रजेवर असलेले यादव यांची अन्य ठिकाणी बदली केल्या जाईल आणि भारंबे यांनाच आयुक्तपदी नियुक्त केले जाईल अथवा नवीन पोलीस आयुक्त शहराला प्राप्त होईल, अशी चर्चा महिनाभरापासून शहरात सुरू आहे. विशेष म्हणजे आयुक्तांच्या रजेचा कालावधी दोन दिवसांपूर्वी संपला, तरीदेखील ते रु जू झाले नाहीत. यावरून ही चर्चा खरीच असल्याचे बोलले जात आहे.

गुन्हे शाखा सुस्तावलीपोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांची बदली झाल्यापासून ठाणेदारांकडून घरफोड्यांच्या घटनांची माहिती गुन्हे शाखेला लगेच दिली जात नाही. परिणामी, शहरातील अनेक घरफोड्यांचा तपास अद्याप लागलेला नाही. एटीएम गोळ्या झाडणारा आणि पिस्टल चोरणाराही गायब आहे. परिणामी, गुन्हे शाखा सध्या सुस्तावली असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादTransferबदली