शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

सक्तीची रजा संपली; पोलीस आयुक्त रुजू झालेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 16:41 IST

सक्तीच्या रजेचा कालावधी १५ एप्रिल रोजी संपल्यानंतरही शहराचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव हे रुजू झाले नाहीत.

ठळक मुद्देपोलीस आयुक्त १६ मार्चपासून सक्तीच्या रजेवर गेले.. रजेवर जाताना त्यांनी नाराजी व्यक्त करीत पुन्हा या शहरात येण्याची इच्छा नाही, असे विधान केले होते.

औरंगाबाद : सक्तीच्या रजेचा कालावधी १५ एप्रिल रोजी संपल्यानंतरही शहराचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव हे रुजू झाले नाहीत. आयुक्त यादव यांची आता अन्य ठिकाणी बदली होईल आणि शहराला नवे पोलीस आयुक्त प्राप्त होतील, या चर्चेला सध्या सर्वत्र उधाण आले आहे. 

शहरातील कचरा टाकण्यावरून ७ मार्च रोजी मिटमिटा येथे जोरदार दंगल झाली आणि यानंतर पोलिसांनी कायदा हातात घेत सामान्यांना घरात घुसून झोडपून काढले. त्यांच्या वाहनांचे नुकसान केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी पोलीस महासंचालक आणि अतिरिक्त गृह सचिव यांच्या समितीकडून करण्याचे आश्वासन दिले आणि पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवित असल्याची घोषणा केली.

पोलीस आयुक्त १६ मार्चपासून सक्तीच्या रजेवर गेले. रजेवर जाताना त्यांनी नाराजी व्यक्त करीत पुन्हा या शहरात येण्याची इच्छा नाही, असे विधान केले होते. तेव्हापासून औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे पोलीस आयुक्तांचा अतिरिक्त पदभार सांभाळत आहेत. भारंबे यांनी प्रभारी असूनही शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी खुले चर्चासत्र घेतले. यासोबतच वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना मुंबईतील इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्राफिक मॅनेजमेंट येथे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि ५० कर्मचाऱ्यांचा एक गट प्रशिक्षणासाठी पाठविला. पोलीस आयुक्तांची ब्रँच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांची त्यांनी तडकाफडकी बदली केली.

कांबळे यांना आयुक्त यादव यांनी सहा महिन्यांपूर्वीच गुन्हे शाखेत नियुक्त केले होते. सक्तीच्या रजेवर असलेले यादव यांची अन्य ठिकाणी बदली केल्या जाईल आणि भारंबे यांनाच आयुक्तपदी नियुक्त केले जाईल अथवा नवीन पोलीस आयुक्त शहराला प्राप्त होईल, अशी चर्चा महिनाभरापासून शहरात सुरू आहे. विशेष म्हणजे आयुक्तांच्या रजेचा कालावधी दोन दिवसांपूर्वी संपला, तरीदेखील ते रु जू झाले नाहीत. यावरून ही चर्चा खरीच असल्याचे बोलले जात आहे.

गुन्हे शाखा सुस्तावलीपोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांची बदली झाल्यापासून ठाणेदारांकडून घरफोड्यांच्या घटनांची माहिती गुन्हे शाखेला लगेच दिली जात नाही. परिणामी, शहरातील अनेक घरफोड्यांचा तपास अद्याप लागलेला नाही. एटीएम गोळ्या झाडणारा आणि पिस्टल चोरणाराही गायब आहे. परिणामी, गुन्हे शाखा सध्या सुस्तावली असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादTransferबदली