शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

शेतकरी अन्नसुरक्षा योजना संकटात, आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 21:28 IST

मराठवाड्यातील ८ आणि विदर्भातील ६ जिल्ह्यांमध्ये दुष्काळाच्या काळात शेतक-यांसाठी सुरू केलेली अन्न सुरक्षा योजना संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनेबाबत १४ जिल्ह्यांमध्ये आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून टप्प्या-टप्प्याने त्या योजनेतील धान्यवितरण कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

औरंगाबाद: मराठवाड्यातील ८ आणि विदर्भातील ६ जिल्ह्यांमध्ये दुष्काळाच्या काळात शेतक-यांसाठी सुरू केलेली अन्न सुरक्षा योजना संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनेबाबत १४ जिल्ह्यांमध्ये आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून टप्प्या-टप्प्याने त्या योजनेतील धान्यवितरण कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनेतून किती धान्य उचल होते, याचा आढावा घेऊन टप्प्याटप्याने ही योजना बंद करण्याचा विचार अन्न व नागरी पुरवठा विभागाने सुरू केला आहे.मराठवाड्यात ३६ लाख ६ हजार शेतक-यांना २०१५ सालच्या दुष्काळात अन्न सुरक्षा योजना आणली. त्यातून किमान शेतक-यांना दरडोई स्वस्त धान्य दुकानातून रेशनिंगद्वारे धान्य वितरण करण्याचा सरकारचा हेतू होता. आता सरकारला दुष्काळाची तीव्रता कमी झाल्यासारखे वाटू लागले असून योजनेच्या पारदर्शकतेचा आढावा घेण्याचा निर्णय झाला आहे. मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता कमी झाली असली तरी शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. शेतीच्या कारणास्तव ५९४ च्या आसपास आत्महत्या झाल्या असून त्यांना मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. सध्या या योजनेतून ९० टक्क्यांहून अधिक शेतकरी धान्याची उचल करीत असल्याचे विभागीय पुरवठ्याच्या आकड्यातून दिसते. दुष्काळ सपंल्यानंतर ही योजना बंद करण्याबाबत मागील काही महिन्यांपासून शासनाकडे विचार सुरू आहे. ही योजना बंद केली तर सरकारच्या विरोधात काही पडसाद उमटतील काय, याचा अंदाज बांधला जात होता.दरम्यान शिवसेना खा.चंद्रकांत खैरे यांनी शेतकºयांचा धान्यपुरवठा बंद करू नये. दुकानदार काळाबाजार करीत असतील तर त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणालेअन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीश बापट म्हणाले, दुष्काळ नसल्यामुळे आता तीव्रता कमी झाली आहे. या योजनेअंतर्गत धान्य वितरण चालू ठेवावे की नाही, याचा आढावा घेतला जाईल. लगेच धान्यपुरवठा बंद केला जाणार नाही. मात्र पुरवठ्याची गरज आहे की नाही, हे आढावा घेतल्यानंतर समोर येईल. एपीएल, बीपीएलचा मुद्दा संपलेला आहे. शेतकरी, शेतीमालक आणि सातबारा आधारलिंक करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. ग्रामीण भागात ५९ हजार उत्पन्न असणाºयांना प्राधान्य रेशनिंग यादीमध्ये आणले जाणार आहे. यापुर्वी खुप धान्य दिले, परंतु आता उचलीचे प्रमाण कमी झाले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी