शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शेतकरी अन्नसुरक्षा योजना संकटात, आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 21:28 IST

मराठवाड्यातील ८ आणि विदर्भातील ६ जिल्ह्यांमध्ये दुष्काळाच्या काळात शेतक-यांसाठी सुरू केलेली अन्न सुरक्षा योजना संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनेबाबत १४ जिल्ह्यांमध्ये आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून टप्प्या-टप्प्याने त्या योजनेतील धान्यवितरण कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

औरंगाबाद: मराठवाड्यातील ८ आणि विदर्भातील ६ जिल्ह्यांमध्ये दुष्काळाच्या काळात शेतक-यांसाठी सुरू केलेली अन्न सुरक्षा योजना संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनेबाबत १४ जिल्ह्यांमध्ये आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून टप्प्या-टप्प्याने त्या योजनेतील धान्यवितरण कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनेतून किती धान्य उचल होते, याचा आढावा घेऊन टप्प्याटप्याने ही योजना बंद करण्याचा विचार अन्न व नागरी पुरवठा विभागाने सुरू केला आहे.मराठवाड्यात ३६ लाख ६ हजार शेतक-यांना २०१५ सालच्या दुष्काळात अन्न सुरक्षा योजना आणली. त्यातून किमान शेतक-यांना दरडोई स्वस्त धान्य दुकानातून रेशनिंगद्वारे धान्य वितरण करण्याचा सरकारचा हेतू होता. आता सरकारला दुष्काळाची तीव्रता कमी झाल्यासारखे वाटू लागले असून योजनेच्या पारदर्शकतेचा आढावा घेण्याचा निर्णय झाला आहे. मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता कमी झाली असली तरी शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. शेतीच्या कारणास्तव ५९४ च्या आसपास आत्महत्या झाल्या असून त्यांना मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. सध्या या योजनेतून ९० टक्क्यांहून अधिक शेतकरी धान्याची उचल करीत असल्याचे विभागीय पुरवठ्याच्या आकड्यातून दिसते. दुष्काळ सपंल्यानंतर ही योजना बंद करण्याबाबत मागील काही महिन्यांपासून शासनाकडे विचार सुरू आहे. ही योजना बंद केली तर सरकारच्या विरोधात काही पडसाद उमटतील काय, याचा अंदाज बांधला जात होता.दरम्यान शिवसेना खा.चंद्रकांत खैरे यांनी शेतकºयांचा धान्यपुरवठा बंद करू नये. दुकानदार काळाबाजार करीत असतील तर त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणालेअन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीश बापट म्हणाले, दुष्काळ नसल्यामुळे आता तीव्रता कमी झाली आहे. या योजनेअंतर्गत धान्य वितरण चालू ठेवावे की नाही, याचा आढावा घेतला जाईल. लगेच धान्यपुरवठा बंद केला जाणार नाही. मात्र पुरवठ्याची गरज आहे की नाही, हे आढावा घेतल्यानंतर समोर येईल. एपीएल, बीपीएलचा मुद्दा संपलेला आहे. शेतकरी, शेतीमालक आणि सातबारा आधारलिंक करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. ग्रामीण भागात ५९ हजार उत्पन्न असणाºयांना प्राधान्य रेशनिंग यादीमध्ये आणले जाणार आहे. यापुर्वी खुप धान्य दिले, परंतु आता उचलीचे प्रमाण कमी झाले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी