शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

स्वातंत्र्यसैनिकांच्या नोकरदार बोगस पाल्यांविरुद्ध कार्यवाही करून खंडपीठात अहवाल सादर करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:59 IST

स्वातंत्र्यसैनिकांच्या नोकरदार बोगस पाल्यांना संरक्षण देणारा माजी मुख्यमंत्र्यांनी कक्ष अधिकाऱ्यांमार्फत दिलेला ३ सप्टेंबर २०१४ चा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी.व्ही. नलावडे आणि न्या. एस.के. कोतवाल यांनी सोमवारी (दि.२५) रद्द केला. आदेश निघाल्यापासून (दि. २५ फेब्रुवारी २०१९) एक महिन्यात संबंधित बोगस पाल्यांविरुद्ध पुढील योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचा आदेश खंडपीठाने औरंगाबाद आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

ठळक मुद्देखंडपीठ: बोगस पाल्यांना संरक्षण देणारा माजी मुख्यमंत्र्यांच्या कक्ष अधिकाऱ्यांमार्फत दिलेला आदेश रद्द

औरंगाबाद : स्वातंत्र्यसैनिकांच्या नोकरदार बोगस पाल्यांना संरक्षण देणारा माजी मुख्यमंत्र्यांनी कक्ष अधिकाऱ्यांमार्फत दिलेला ३ सप्टेंबर २०१४ चा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी.व्ही. नलावडे आणि न्या. एस.के. कोतवाल यांनी सोमवारी (दि.२५) रद्द केला.आदेश निघाल्यापासून (दि. २५ फेब्रुवारी २०१९) एक महिन्यात संबंधित बोगस पाल्यांविरुद्ध पुढील योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचा आदेश खंडपीठाने औरंगाबाद आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील ५७० बोगस पाल्यांची चौकशी चालू आहे. त्यांच्यापैकी ४८ जणांना चौकशी समितीने दोषी धरले आहे.स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य असल्याच्या प्रमाणपत्राआधारे शासकीय नोकरी मिळविलेल्या बोगस पाल्यांविरुद्ध पांडुरंग मोने यांनी जनहित याचिका दाखल केली होती. खंडपीठाने औरंगाबाद आणि जालन्याच्या जिल्हाधिकाºयांना संबंधितांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध योग्य त्या कार्यवाहीचे आदेश दिले होते.याचिकेतील आदेशाप्रमाणे १४ जून २०१४ रोजी स्थापन केलेल्या सहा प्रशासकीय अधिकाºयांच्या चौकशी समितीने ४८ स्वातंत्र्यसैनिकांच्या बोगस पाल्यांचे नामनिर्देशनपत्र रद्द केले होते. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद आणि जालन्याच्या जिल्हाधिकाºयांनी संबंधित पाल्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कार्यवाही सुरूकेली असता संबंधित बोगस पाल्यांनी खंडपीठात दिवाणी याचिका दाखल केल्या होत्या. खंडपीठाने सुरुवातीस त्यांना तात्पुरते संरक्षण दिले. मात्र, कायमस्वरूपी संरक्षण देण्यास नकार दिला.त्यामुळे संबंधित पाल्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कैफियत मांडली. मुख्यमंत्र्यांनी ३ सप्टेंबर २०१४ रोजी कक्ष अधिकाºयांमार्फत तात्काळ आदेश पारित करून औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड, पुणे, बुलडाणा, नाशिक आणि परभणीच्या जिल्हाधिकाºयांना स्वातंत्र्यसैनिकांच्या वरील पाल्यांना सेवेतून बडतर्फ करण्यास मनाई केली होती.३ सप्टेंबर २०१४ चा हा आदेश रद्द करावा आणि बोगस पाल्यांना बडतर्फ करावे, अशी विनंती करणारी याचिका मोने यांनी अ‍ॅड. अंगद कानडे यांच्यामार्फत खंडपीठात दाखल केली होती.आज याचिकेच्या अंतिम सुनावणीवेळी अ‍ॅड. कानडे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, सदरील बोगस नोकरदार पाल्यांचे नामनिर्देशनपत्र खंडपीठाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आले आहे. चौकशीअंती ते सर्व बोगस पाल्य असल्याचे आढळले आहे. त्यांना बडतर्फ करणे योग्य आहे. संबंधितांविरुद्ध बडतर्फीची कार्यवाही सुरूअसताना मंत्री आदेश पारित करून त्यांना संरक्षण देऊ शकत नाहीत. सुनावणीअंती खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

टॅग्स :Courtन्यायालयMarathwadaमराठवाडा