शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

चारा छावण्यातून जिल्ह्याला डावलले

By admin | Updated: August 23, 2015 23:45 IST

ंगंगाराम आढाव , जालना जिल्ह्यात सलग चौथ्या वर्षीही अत्यल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातील खरीपाचे सुमारे ८० टक्के पिके पाण्याअभावी वाया गेलेली आहे

ंगंगाराम आढाव , जालनाजिल्ह्यात सलग चौथ्या वर्षीही अत्यल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातील खरीपाचे सुमारे ८० टक्के पिके पाण्याअभावी वाया गेलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण बनलेला आहे. जिल्ह्यात सप्टेंबर अखेर पर्यंत पुरेल ऐवढाच चारा शिल्लक असल्याचे सांगण्यात येते. असे असतानाही शासनाने दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीनच जिल्ह्यातील टंचाई ग्रस्त भागात जनावरांच्या छावण्या उघडण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. त्यातून जालना जिल्ह्याला डावलण्यात आले आहे.जालना जिल्ह्याची माहे जून ते आॅक्टोेंबर वार्षिक पावसाची सरासरी ६८८.३२ मि. मी आहेत. आता पर्यंत जिल्ह्यात २६३.४२ मि. मी. म्हणजे वार्षिक सरासरीच्या ३८ टक्के एवढाच पाऊस पडलेला आहे. त्यातील १५ टक्के पाऊस हा खरीप पिके हातची गेल्यानंतर मागील १५ दिवसात झालेल्या पावसाची आहे. जिल्ह्यात पावसा अभावी भयावह स्थिती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यतील सात मध्यम आणि ५७ लघु प्रकल्पात एकुण ५ टक्के जलसाठा शिल्लक आहेत. यातील १ मध्यम आणि १२ लघू असे १३ प्रकल्प कोरडेठाक पडलेले आहे. तर २ मध्यम आणि ३३ लघू असे ३५ प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याचा खाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. जिल्ह्यात ५ लाखावर पशुधन आहेत. त्यामुळे जिल्ह्यात चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चारा छावण्या उभारण्यात याव्यात किंवा दावणीला चारा उपलब्ध करण्यात यावा असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत झालाा होता. मात्र याकडेही दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे दिसून येते.जालना जिल्ह्यात ७ मध्यम आणि ५७ लघू प्रकल्प असे ६४ प्रकल्प आहेत. यातील १३ प्रकल्प कोरडे पडलेले आहेत. तर ३५ प्रकल्पांची पातळी जोत्याच्या खाली आहे. यातील ७ लघू प्रकल्पात ६.६२ द.ल. मी जलसाठा म्हणजे १० टक्के तर ५७ लघू प्रकल्पात ४.७७ दलघमी म्हणजे ३ टक्के जलसाठा असा एकुण या प्रकल्पात ५ टक्के साठा आहे.जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने जिल्ह्यात मुबलक चारा उपलब्ध असल्याबाबतचा अहवाल दिला होता. त्यावर स्थायी समितीच्या सभेत जि.प. सदस्य सुभाष टोपे, बाळासाहेब वाकुळणीकर यांनी टीका केली होती. कृषी विभागाने उपलब्ध चाऱ्याच्या अहवालाबाबत दिशाभूल करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला होता.या आरोपाची प्रशासनाने कुठलीही शहानिशा न करता तो अहवाल शासनाकडे पाठविला असल्याचे समजते. तसेच मागील पंधरा दिवसांत पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी फुगली. त्याचा ही फटका जिल्हाला बसला असल्याचे शासनाच्या निर्णयावरून दिसून येते.