शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

फ्लॅश बॅक : पहिली निवडणूक,पहिले मतदान अन् जनतेला पहिल्या खासदाराचेही अप्रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 12:41 IST

भारतात २५ आॅक्टोबर १९५१ ते २२ फेब्रुवारी १९५२ या काळात पहिल्या लोकसभेसाठी मतदान झाले.

ठळक मुद्देपहिल्या निवडणुकीत चार महिने व तब्बल ६८ टप्प्यांत मतदान चालले. औरंगाबाद व जालना हा एकच जिल्हा होता. देशभरात आॅक्टोबर १९५१ मध्ये ‘मॉक इलेक्शन’ घेण्यात आले होते. 

- शांतीलाल गायकवाड 

देशातील पहिली निवडणूक, पहिलेच मतदान, पहिला खासदार, मतदान म्हणजे काय, ते कसे करतात आदी अनेक प्रश्न व ९० टक्के निरक्षर समाज, या पार्श्वभूमीवर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १९५२ मध्ये निवडणूक झाली. या पहिल्या निवडणुकीत जनमानसावर काँग्रेसचा प्रचंड पगडा होता व त्याचे प्रत्यंतर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य हे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार एस. के. वैशंपायन यांचा दणदणीत पराभव करून विजयी झाले. 

इंग्रजाच्या दीडशे वर्षांच्या गुलामीतून मुक्त झाल्यानंतर भारतात २५ आॅक्टोबर १९५१ ते २२ फेब्रुवारी १९५२ या काळात पहिल्या लोकसभेसाठी मतदान झाले. चार महिने व तब्बल ६८ टप्प्यांत मतदान चालले. त्यात औरंगाबादेत जानेवारी १९५२ मध्ये मतदान झाले. परंतु तेव्हा देशाची साक्षरता २० टक्क्यांहून तर मराठवाड्याची १० टक्क्यांहून कमी होती. त्यामुळे मतदान प्रक्रियेची माहिती नागरिकांनाच काय तर प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही नव्हती. हैदराबादच्या निजामावर लष्करी कारवाई करून सप्टेंबर १९४८ मध्ये हे संस्थान भारतात विलीन करण्यात आले. तेव्हा मराठवाडा व कर्नाटकातील काही भूभाग मिळून १९४८ मध्ये हैदराबाद हे स्वतंत्र राज्य तयार करण्यात आले. मराठवाड्यात तेव्हा सहा जिल्हे होते. औरंगाबाद व जालना हा एकच जिल्हा होता. निरक्षर देशाला मतदानाविषयी माहिती कळावी म्हणून देशभरात आॅक्टोबर १९५१ मध्ये ‘मॉक इलेक्शन’ही (निवडणुकीचा सराव) घेण्यात आले होते.  

प्रत्येक उमेदवाराची स्वतंत्र मतपेटी भारताचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली. निवडणुकीत अगदीच नवखा असलेला व प्रचंड विस्तारलेल्या देशात लोकसभेचे ४०१ मतदारसंघ व ४८९ जागा होत्या. निरक्षर मतदारांना मतदान करणे सोपे जावे यासाठी प्रत्येक उमेदवाराच्या नावाची स्वतंत्र मतदान पेटी मतदान केंद्रावर ठेवली होती.  या मतपेटीला वेगवेगळा रंग होता. त्यावर उमेदवाराचे नाव व निवडणूक चिन्ह चिकटविण्यात आलेले होते. जेवढे उमेदवार तेवढ्या मतपेट्या ठेवल्या होत्या. मतदार ज्यांना मतदान करायचे त्याच्या पेटीत मतपत्रिका टाकत असत. 

औरंगाबादच्या प्रथम खासदाराचा अल्पपरिचयडॉ. सुरेशचंद्र आर्य यांचा जन्म १८ मे १९१२ रोजी झाला. ते हैदराबाद येथील हिमायतनगरचे मूळ रहिवासी होते. उच्चविद्याविभूषित असलेले डॉ. आर्य यांना विद्यालंकार या उपाधीने गौरविले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण हरिद्वार येथील गुरुकुलातून झाले. पुढे ते पॅरिस (फ्रान्स) मधून डी. लिट. झाले. जर्मनीमधूनही त्यांनी शिक्षण घेतले. सत्याग्रहात सहभागी झाल्याने त्यांना १९३० मध्ये कारागृहात जावे लागले. ते १९३६-३७ या काळात बॉम्बे समाचार पत्रिकेचे संपादक होते. पुढे पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशात वास्तव्याला असताना त्यांचा संबंध क्रांतिकारकांशी आला. १९३७ ते १९४७ या काळात ते आझाद हिंद सेनेच्या आझाद हिंद रेडिओचे प्रमुख होते. बर्लिनमध्ये राहून ते हे काम पाहत होते. व्हिएन्नात १९५४ मध्ये झालेल्या इंटर पार्लमेंटली कॉन्फरन्समध्ये त्यांचा सहभाग होता. 

औरंगाबादेत काँग्रेस व पीडीएफमध्ये लढतऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून तेव्हा एकूण किती उमेदवार निवडणूक रिंगणात होते, याची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. परंतु भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर  निवडणुकीचे निकाल, विजेते व उपविजेत्या उमेदवारांची यादीनुसार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य हे विजयी झाले होते. त्यांना ७१ हजार ९२ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी पीडीएफचे एस.के. वैशंपायन यांना ३५ हजार ८६९ मते मिळाली होती. आर्य यांनी वैशंपायन यांचा तब्बल ३५ हजार २२३ मतांनी दणदणीत पराभव केला होता. हैदराबाद राज्यातील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा क्रमांक तेव्हा ११ होता. तर मतदारसंघ सर्वसाधारण गटात आणि एक उमेदवाराचा होता.

असे होते मतदारसंघ पहिल्या लोकसभेसाठी देशभरात लोकसभेचे ४०१ मतदारसंघ होते, तर ४८९ जागा होत्या. ३१४ मतदारसंघ एक सदस्यीय तर ८६ मतदारसंघ दोन सदस्यीय होते. त्यात एक सदस्य सर्वसाधारण तर दुसरा सदस्य राखीव प्रवर्गातील एससी अथवा एसटीचा होता.१८४९ उमेदवार पहिल्या निवडणुकीत देशभरात उभे होते.  ३६ कोटी लोकसंख्येच्या देशातील २१ वर्षे वय पूर्ण करणारे १७ कोटी ३० लाख मतदार होते.  ४५.७ टक्के मतदान घेऊन काँग्रेसने ३६४ जागांवर विजय मिळविला होता. तेव्हा फक्त दोन पक्षाने विजयी उमेदवारांचा डबल आकडा गाठला होता. त्यात सीपीआयचे १६ व सोशालिस्ट पार्टीचे १२ खासदार विजयी झाले. भारतीय जनसंघाचे ३ खासदार निवडून आले. १७ एप्रिल १९५२ रोजी देशाची पहिली लोकसभा अस्तित्वात येऊन पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान झाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादPoliticsराजकारणcongressकाँग्रेस