शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

Flash Back : इंदिरा लाटेने विरोधक चारीमुंड्या चीत; औरंगाबादकरांचे पालोदकरांना छप्पर फाडके मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 15:50 IST

लोकसभेची पाचच्या निवडणूकीत गरिबी हटावची घोषणा 

- शांतीलाल गायकवाड 

औरंगाबाद : चौथ्या लोकसभेत दोलायमान झालेल्या काँग्रेस पक्षाने पाचव्या निवडणुकीत ताकदीने पुनरागमन केले. इंदिरा गांधी यांच्या ‘गरिबी हटाव’या लोकप्रिय घोषणेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मतदारांनी काँग्रेसचे उमेदवार माणिकदादा पालोदकर यांना १ लाख ९४ हजार ९२६ एवढे छप्पर फाडके मतदान केले. भारतीय जनसंघाचे रामभाऊ एकनाथ गावंडे यांच्यासह मिळून सर्व ५ उमेदवारांना ७२ हजार ३१४ मते पडली व ४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.

१९६९ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी व पक्षश्रेष्ठी मोरारजी देसाई यांच्यात श्रेष्ठत्वावरून जुंपली व त्याचे पर्यवसान मोरारजींनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाच काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात झाले. काँग्रेसचे दोन गट प्रतिस्पर्धी होऊन १९७१ च्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील गटाने जनसंघासह अन्य विरोधी पक्षांना सोबत घेतले होते. औरंगाबादेत जनसंघाने रामभाऊ एकनाथ गावंडे यांना उमेदवारी दिली होती. ६ रिंगणात; चौघांचे डिपॉझिट जप्त

५ लाख ३० हजार ९२६ एकूण मतदारसंख्या असलेल्या लोकसभा मतदारसंघातून १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील चौघांनी परत घेतले. त्यामुळे माणिकराव पालोदकर (काँग्रेस आय), रामभाऊ गावंडे (भारतीय जनसंघ), बाळासाहेब  शिवराम मोरे (रिपब्लिकन पार्टी - खोब्रागडे गट), मोहंमद जफर खान बाहाबर खान, कान्हीराम रुदयलाल बठोड आणि सय्यद कासीम सय्यद सजन हे तिघे अपक्ष रिंगणात होते. च्२ लाख ७९ हजार ३९० एवढे (५२.६२ टक्के) मतदान झाले. त्यातील पालोदकर यांनी १ लाख ९४ हजार ९२६ (७२.९४ टक्के) मतदान प्राप्त केले. गावंडे यांना ४७ हजार १५ (१७.५९ टक्के), मोरे -११ हजार ३९८ (४.२७ टक्के), खान -१० हजार ६३८, बठोड- २ हजार १४६ आणि सय्यद कासीम यांना १,११७ एवढे मते पडली. गावंडे वगळता सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. 

मराठवाड्यासह महाराष्ट्रात लाटमहाराष्ट्रातील ४५ जागांपैकी ४२ जागा काँग्रेस (आय)ने हस्तगत केल्या होत्या. मराठवाड्यातील सर्व सात जागांचा त्यात समावेश आहे. देशात काँग्रेसने पुन्हा ३५२ जागा पटकावताना ४३.६८ टक्के मतदानही घेतले. 

माणिकराव पालोदकर यांचा अल्प परिचयमाणिकराव सांडू (पाटील) पालोदरकर यांचा जन्म पालोद (ता. सिल्लोड) मध्ये झाला. कृषी व सहकारमध्ये ते अग्रणी होते. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, तालुका सहकारी देखरेख संघाचे संचालक, जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्थेचे संचालक, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, सिल्लोडचे चेअरमन, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदी पदे त्यांनी भूषविली. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा दीर्घकाळ वावर व छाप होती. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादcongressकाँग्रेसMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019