शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

फारोळ्यात मध्यरात्री पाणीपुरवठ्याचे पाच पंप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 23:26 IST

शहराची तहान भागविणाऱ्या १४०० मि.मी. जलवाहिनीवर फारोळ्यात शनिवारी मध्यरात्री १.३० वाजता अचानक बिघाड निर्माण झाला.

औरंगाबाद : शहराची तहान भागविणाऱ्या १४०० मि.मी. जलवाहिनीवर फारोळ्यात शनिवारी मध्यरात्री १.३० वाजता अचानक बिघाड निर्माण झाला. पॅनल बोर्डची अर्थिंग निकामी झाल्याने सर्व पाच पंप बंद पडले. तातडीने महापालिका अधिकाऱ्यांनी तज्ज्ञांना बोलावून दुरुस्ती केली. त्यामुळे रविवारी शहरातील अनेक वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागला.

जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने मनपाला फ्लोटिंग पंप लावून अक्षरश: गाळातून पाणी ओढावे लागत आहे. धरणात लवकरात लवकर पाणी न आल्यास शहरात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. जायकवाडी धरण क्षेत्रातही मागील एक महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. मनपा प्रशासन मोठी तारेवरची कसरत करीत शहरातील नागरिकांची तहान भागवत आहे.

शुक्रवारी दिवसभर पाणीपुरवठा विभागाने शटडाऊन घेऊन दुरुस्तीची तब्बल ४९ कामे केली. शनिवारी पहाटे ४ वाजेपासून शहरात पाणी आणण्याची प्रक्रिया सुरू होती. रात्री १.३० वाजता अचानक फारोळ्यात अर्थिंगमध्ये बिघाड निर्माण झाला. शहराला पाणीपुरवठा करणारी १४०० मि.मी. व्यासावरील सर्व पाच पंप बंद पडले. घटनेची माहिती मिळताच मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, यांत्रिकी विभागाचे बाबूराव घुले आदी घटनास्थळी दाखल झाले.

तज्ज्ञ इलेक्ट्रिशियन बोलावून दुरुस्तीचे काम सुरू केले. यामध्ये दोन ते तीन तासांचा वेळ लागला. पहाटे साडेचार वाजता पंप सुरू करण्यात आले. शहरात पाणी आणण्यास आणखी विलंब निर्माण झाला. फारोळ्यातील बिघाडामुळे रविवारी ज्या वसाहतींना पाणी देण्यात येणार होते, त्यांना पाणी देता आले नाही. आता सोमवारी मनपा या वसाहतींना पाणी देणार आहे.

निवृत्तीच्या रात्रीही दिली सेवामनपाच्या यांत्रिकी विभागातील इलेक्ट्रिशियन दिलीप सोमवंशी ३० जून रोजी निवृत्त होत आहेत. मनपाच्या पाणीपुरवठा विभागात विजेचा कुठेही बिघाड असल्यास अवघ्या काही मिनिटांमध्ये तो शोधून त्यावर त्वरित उपाययोजना करण्यात सोमवंशी यांचा विशेष हातखंडा आहे. शनिवारी मध्यरात्री फारोळ्यात बिघाड झाल्याचे कळताच सोमवंशी त्वरित पोहोचले. त्यांनी बिघाड शोधून त्वरित दुरुस्तीही करून दिली. निवृत्तीच्या उंबरठ्यावरही त्यांनी दिलेल्या सेवेचे मनपा अधिकाºयांनी कौतुक केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपात