शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

फारोळ्यात मध्यरात्री पाणीपुरवठ्याचे पाच पंप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 23:26 IST

शहराची तहान भागविणाऱ्या १४०० मि.मी. जलवाहिनीवर फारोळ्यात शनिवारी मध्यरात्री १.३० वाजता अचानक बिघाड निर्माण झाला.

औरंगाबाद : शहराची तहान भागविणाऱ्या १४०० मि.मी. जलवाहिनीवर फारोळ्यात शनिवारी मध्यरात्री १.३० वाजता अचानक बिघाड निर्माण झाला. पॅनल बोर्डची अर्थिंग निकामी झाल्याने सर्व पाच पंप बंद पडले. तातडीने महापालिका अधिकाऱ्यांनी तज्ज्ञांना बोलावून दुरुस्ती केली. त्यामुळे रविवारी शहरातील अनेक वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागला.

जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने मनपाला फ्लोटिंग पंप लावून अक्षरश: गाळातून पाणी ओढावे लागत आहे. धरणात लवकरात लवकर पाणी न आल्यास शहरात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. जायकवाडी धरण क्षेत्रातही मागील एक महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. मनपा प्रशासन मोठी तारेवरची कसरत करीत शहरातील नागरिकांची तहान भागवत आहे.

शुक्रवारी दिवसभर पाणीपुरवठा विभागाने शटडाऊन घेऊन दुरुस्तीची तब्बल ४९ कामे केली. शनिवारी पहाटे ४ वाजेपासून शहरात पाणी आणण्याची प्रक्रिया सुरू होती. रात्री १.३० वाजता अचानक फारोळ्यात अर्थिंगमध्ये बिघाड निर्माण झाला. शहराला पाणीपुरवठा करणारी १४०० मि.मी. व्यासावरील सर्व पाच पंप बंद पडले. घटनेची माहिती मिळताच मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, यांत्रिकी विभागाचे बाबूराव घुले आदी घटनास्थळी दाखल झाले.

तज्ज्ञ इलेक्ट्रिशियन बोलावून दुरुस्तीचे काम सुरू केले. यामध्ये दोन ते तीन तासांचा वेळ लागला. पहाटे साडेचार वाजता पंप सुरू करण्यात आले. शहरात पाणी आणण्यास आणखी विलंब निर्माण झाला. फारोळ्यातील बिघाडामुळे रविवारी ज्या वसाहतींना पाणी देण्यात येणार होते, त्यांना पाणी देता आले नाही. आता सोमवारी मनपा या वसाहतींना पाणी देणार आहे.

निवृत्तीच्या रात्रीही दिली सेवामनपाच्या यांत्रिकी विभागातील इलेक्ट्रिशियन दिलीप सोमवंशी ३० जून रोजी निवृत्त होत आहेत. मनपाच्या पाणीपुरवठा विभागात विजेचा कुठेही बिघाड असल्यास अवघ्या काही मिनिटांमध्ये तो शोधून त्यावर त्वरित उपाययोजना करण्यात सोमवंशी यांचा विशेष हातखंडा आहे. शनिवारी मध्यरात्री फारोळ्यात बिघाड झाल्याचे कळताच सोमवंशी त्वरित पोहोचले. त्यांनी बिघाड शोधून त्वरित दुरुस्तीही करून दिली. निवृत्तीच्या उंबरठ्यावरही त्यांनी दिलेल्या सेवेचे मनपा अधिकाºयांनी कौतुक केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपात