शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पाच दिवस उलटले; औरंगाबाद महानगरपालिकेला आयुक्त नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 16:55 IST

दैनंदिन कामकाजावर याचा चांगलाच परिणाम होत आहे.

ठळक मुद्देमागील पाच दिवसांपासून औरंगाबाद महापालिकेला प्रभारी आयुक्तही लाभलेले नाहीत. थेट राज्यपालांनाच आयुक्त द्यावा अशी मागणी करण्यात आली.

औरंगाबाद : मागील पाच दिवसांपासून औरंगाबाद महापालिकेला प्रभारी आयुक्तही लाभलेले नाहीत. दैनंदिन कामकाजावर याचा चांगलाच परिणाम होत आहे. कंटाळलेल्या मनपातील सत्ताधाऱ्यांनी शुक्रवारी थेट मंत्रालयात नगरविकास विभाग, प्रधान सचिव यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीच सत्ताधाऱ्यांना प्रतिसाद द्यायला तयार नाही. थेट राज्यपालांनाच आयुक्त द्यावा अशी मागणी करण्यात आली. त्याचीही दखल घेण्यात आली नाही.

मागील पाच दिवसांपासून औरंगाबाद महापालिका आयुक्ताविना सुरू आहे. नियमित आयुक्त डॉ. निपुण विनायक दीर्घ सुटीवर आहेत. त्यांचा अतिरिक्त कार्यभार मंत्रालयाने कोणाकडेही सोपविलेला नाही. त्यामुळे पालिकेचा आयुक्त कोण? असा प्रश्न महापौरांनाही पडला आहे. महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे प्रलंबित विकासकामांच्या संचिका आणि रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवकांचा आटापिटा सुरू आहे. यातच आयुक्त नसल्याने नगरसेवकांची कोंडी झाली आहे. मनपाचा कारभार पूर्णपणे ढेपाळला आहे. नवीन नियमित आयुक्त द्यावा, अशी मागणी महापौर घोडेले यांनी चार दिवसांपूर्वीच राज्यपालांकडे केली आहे. शुक्रवारी राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता, नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. त्यामुळेच मंत्रालयातील अधिकाऱ्यांनीही   प्रशासकीय कामातून अंग काढून घेतले आहे. 

अनेक कामे ठप्पमनपा निवडणूक तोंडावर आहे, विकासकामे ठप्प आहेत. मनपातील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळालेला नाही. दीड महिन्यापासून थकीत बिलांसाठी कंत्राटदारांचे मनपासमोर साखळी उपोषण सुरू आहे. कचरा उचलणाऱ्या रेड्डी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते, अशा गंभीर परिस्थितीत प्रशासन प्रमुख म्हणून प्रत्येक प्रश्नाला तोंड देण्यासाठी आयुक्त नको का? असा प्रश्न महापौर नंदकुमार घोडेले यांनी उपस्थित केला.

प्रभाग रचनेची सर्वांना चिंतावॉर्डातील चार विकास कामे झाली नाहीत तरी चालतील, पण प्रभाग रचना सोयीची झाली पाहिजे असे विद्यमान नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. महापालिकेत आयुक्तच नसल्याने प्रशासनाकडून वॉर्ड रचना अत्यंत नियमांवर बोट ठेवून होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. असे झाल्यास किमान १० विद्यमान दिग्गज मंडळींना घरी बसण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सोयीची प्रभाग रचना कशी होईल, यासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMayorमहापौरMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादAurangabadऔरंगाबाद