शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औरंगाबादचे पहिले महापौर शांताराम काळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 18:40 IST

१७ मे १९८८ रोजी शहराचे पहिले महापौर म्हणून डॉ. शांताराम काळे विजयी झाले.

औरंगाबाद : शहराचे पहिले महापौर डॉ. शांताराम यशवंतराव काळे (७३) यांचे  शनिवारी पहाटे (दि. २१ ) अल्पशा आजाराने निधन झाले. दुपारी त्यांच्या पार्थिवावर प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्योतीनगर येथील रहिवासी डॉ. शांताराम काळे यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. याचवेळी त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम सुरू केले. १९८२ मध्ये मनपाची स्थापना झाली. महापालिकेच्या ६० जागांसाठी पहिली निवडणूक १७ एप्रिल १९८८ रोजी घेण्यात आली. या निवडणुकीत क्रांतीचौक वॉर्डातून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून डॉ. शांताराम काळे विजयी झाले होते. 

काँग्रेस, दलित पॅथर, मुस्लिम लीग आणि अपक्षांचे संख्याबळ जास्त असल्यामुळे १७ मे १९८८ रोजी शहराचे पहिले महापौर म्हणून डॉ. शांताराम काळे विजयी झाले. उपमहापौर म्हणून तकी हसन खान विराजमान झाले होते. महापौरांचा वर्षभराचा कार्यकाळ असल्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराला मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी काम केले. ५ जुलै १९८९ रोजी त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. नगरसेवक म्हणून त्यांनी चार वर्षे अत्यंत चांगले काम केले होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात वाहून घेतले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

शनिवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. प्रतापनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महानगरपालिकेच्या वतीने महापौर नंदकुमार घोडेले यांनी काळे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध राजकीय पक्षाचे आजी, माजी नगरसेवक, पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारकीर्द-  १९८२ मध्ये औरंगाबाद महापालिकेची स्थापना- १७ एप्रिल १९८८ रोजी नगरसेवक म्हणून निवडून आले. - १७ मे १९८८ रोजी शहराचे पहिले महापौर म्हणून निवड. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाDeathमृत्यूMayorमहापौर