शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

मराठा विद्यार्थ्यांसाठी पहिले वसतिगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:01 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची सुरुवात ज्या जिल्ह्यातून झाली. त्या औरंगाबाद जिल्ह्यात मराठा समाजाच्या गरजू मुला-मुलींसाठी पहिले शासकीय वसतिगृह १ सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी शक्यता आहे

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची सुरुवात ज्या जिल्ह्यातून झाली. त्या औरंगाबाद जिल्ह्यात मराठा समाजाच्या गरजू मुला-मुलींसाठी पहिले शासकीय वसतिगृह १ सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी शक्यता आहे. वसतिगृहासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने छावणी परिसरातील निजाम बंगला येथील ३२ क्वॉर्टर उपलब्ध करून दिले आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण व अन्य अधिकाऱ्यांनी त्या क्वॉर्टरची पाहणी केली आहे. इतर सुविधांसाठी निविदा काढल्या आहेत. १ सप्टेंबरपर्यंत समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू होईल, या दिशेने जिल्हा प्रशासन आणि बांधकाम विभागाची यंत्रणा काम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मराठा समाजातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वसतिगृह असावे, अशी आरक्षणासह विविध मागण्यांपैकी एक असलेली मागणी मराठा क्रांती मोर्चाने प्रत्येक मोर्चामध्ये लावून धरली आहे. ९ आॅगस्टच्या महाराष्ट्र बंदच्या आंदोलनातदेखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वसतिगृहाच्या मागणीचा उल्लेख करण्यात आला. समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पहिले वसतिगृह कोल्हापूर येथे सुरू झाले आहे. दुसरे वसतिगृह औरंगाबादेत सुरू होत आहे. हळूहळू राज्यभर वसतिगृह सुरू होतील, असा दावा सूत्रांनी केला.सूत्रांनी सांगितले, वसतिगृहाची जागा निश्चित केली आहे. निजाम बंगला परिसरात बांधकाम विभागाचे क्वॉर्टर आहेत. छावणी पोस्ट आॅफिसच्या बाजूला क्वॉर्टर आहेत. मागील काही वर्षांपासून ते क्वॉर्टर विभागाने कुणालाही राहण्यासाठी दिलेले नाहीत. त्यांची डागडुजी, रंगरंगोटी करण्यात आली आहे. ३२ क्वॉर्टर दुरुस्त केले असून, ते मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. १५ तारखेपर्यंत जिल्हाधिकाºयांनी विविध स्वयंसेवी संस्थांकडून वसतिगृह व्यवस्थापनासाठी निविदा मागविल्या आहेत. ३० मुली आणि ७० मुलांची त्या वसतिगृहात आवास-निवासाची व्यवस्था करण्यात येईल.

टॅग्स :marathaमराठाStudentविद्यार्थी