शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Video: ‘जय श्रीराम’च्या जयघोषात पं. धीरेंद्र शास्त्री यांचे छत्रपती संभाजीनगरात जंगी स्वागत

By प्रशांत तेलवाडकर | Updated: November 6, 2023 12:57 IST

बागेश्वरधाम सरकार पं. धीरेंद्र शास्त्री यांचे आगमन शहरात झाले आणि सर्वत्र ‘बागेश्वर धाम की जय’चा जयघोष सुरू झाला.

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा विमानतळाबाहेर दीड तासापेक्षा अधिक वेळ उभे राहिलेल्या भाविकांना रात्री ८:४४ वाजता पांढऱ्या कारमध्ये डाव्या बाजूस बसलेले गोरेगोमटे हसतमुख चेहऱ्याचे पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज दिसले आणि त्यांनी कारमधून बसूनच हात वर करीत सर्वांना नमस्कार केला. तेव्हा ‘जय श्रीराम’, बागेश्वर धाम की जय’ असा उत्स्फूर्तपणे जयघोष निनादला.

‘साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ याची प्रचिती रविवारी रात्री बघण्यास मिळाली. बागेश्वरधाम सरकार पं. धीरेंद्र शास्त्री यांचे आगमन शहरात झाले आणि सर्वत्र ‘बागेश्वर धाम की जय’चा जयघोष सुरू झाला. शंखनाद, ढोलताशाचा नाद आणि आतषबाजी सुरू असताना विमानतळाबाहेर कारमधून महाराज बाहेर आले, तेव्हा भाविकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. वाहन रॅलीला सुरुवात झाली तेव्हा सारे हा क्षण आपल्या मोबाइलमध्ये टिपून घेत होते. कारच्या आजूबाजूला १० पेक्षा अधिक बॉडीगार्ड होते; पण भाविकांनी कारला चोहोबाजूंनी वेढा घातला. लोकांना हटविताना या बॉडीगार्ड्सना घाम फुटला होता. पोलिस बंदोबस्त होता, पण त्यांनाही गर्दी आवरली जात नव्हती. काही भाविक या कारच्या मागे धावत होते. संजयनगरात डीजे लावण्यात आला होता. मुकुंदवाडीत गुलाबांची उधळण करीत भाविकांनी जोरदार स्वागत केले. असेच स्वागत वसंतराव नाईक चौकात झाले. येथे तर जेसीबीवरून पृष्पवृष्टी करण्यात येत होती. यामुळे महाराजांची पांढरी कार गुलाब पाकळ्यांनी भरली होती. गाड्यांचा ताफा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या एन ३ येथील निवासस्थानी पोहोचला. तरीही तासभर हजारो भाविक महाराजांची एक झलक पाहण्यासाठी तिथे थांबून होते.

६ कि.मी.च्या अंतरासाठी लागली ३४ मिनिटेचिकलठाणा विमानतळ ते सिडको एन-३ पर्यंत ६ कि.मी. अंतर पार करण्यासाठी पं. धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या ताफ्याला ३४ मिनिटे लागली. एन-३ मध्ये शोभायात्रा पोहोचली तेव्हा वाहन रॅलीतील शेवटचे टोक रामनगर येथे होते.

६ वाजेपासून भाविक विमानतळाबाहेर उभेपं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांचे सायंकाळी ७ वाजता आगमन होणार होते. यामुळे विमानतळाबाहेर रस्त्यावर शेकडो भाविक ६ वाजल्यापासून उभे होते. महाराजांची कार रात्री ८:४४ वाजता विमानतळाबाहेर आली. तेव्हा महाराजांची झलक पाहून सर्वांना आनंद झाला; पण खूप भाविक असे होते की, त्यांना महाराजांचे दर्शन झालेच नाही.

आज कलशयात्रा आणि हनुमान कथाअयोध्यानगरीत सोमवारपासून पं.धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या श्रीराम व हनुमान कथेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी सकाळी १० वाजता क्रांती चौक येथून कलशयात्रा सुरू होणार आहे. पदमपुरा, रेल्वे स्टेशनमार्गे अयोध्यानगरीत कलशयात्रेची सांगता होईल. त्यानंतर, दुपारी ३ ते रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान महाराज हनुमान कथा सांगणार आहेत.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामAurangabadऔरंगाबाद