उन्हाची तीव्रता : उदगीर तालुक्यातील पहिला बळीवाढवणा (बु.) : उदगीर तालक्यातील डाऊळ येथील शेतकरी आपल्या शेतातील दावणीला बांधलेल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी शनिवारी दुपारी गेला असता, तीव्र उन्हाच्या झळा असह्य झाल्याने त्याचा मृत्यू झाला. उदगीर तालुक्यातील हा पहिला बळी आहे.वाढवणा (बु.) परिसरातील डाऊळ येथील शेतकरी व्यंकट माणिकराव भिसे (३९) हे दुपारी आपल्या शेतातील दावणीला बांधलेल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी दुपारी गेले होते़ दुपारच्या तीव्र उन्हाच्या झळा सहन न झाल्याने त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. जवळच असलेच्या त्यांच्या पत्नीने व्यंकट भिसे यांना उपचारासाठी उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.उष्मघाताचा बळी...शेतकरी व्यंकट भिसे यांना रक्तदाबाचा त्रास होता. कदाचित ते उन्हात गेल्यामुळे हा त्रास अधिक बळावला असेल आणि त्यातच त्यांचा हृदयविकराच्या धक्काने मृत्यू झाल्याचे उदगीर येथील डॉ. नेहा बाहेती यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. उन्हाचा पारा ४३ अंशावर गेल्याने, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे असेही त्या म्हणाल्या.
उष्मघाताने डाऊळच्या शेतकऱ्याचा मृत्यू
By admin | Updated: April 16, 2016 23:44 IST