शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

धूरात सुरक्षा किट नसल्यानेच अग्निशमन जवान कुटुंबापर्यंत पोहोचू शकले नाही

By सुमित डोळे | Updated: April 5, 2024 14:10 IST

धुरात जाण्यासाठी हूड, फेसमास्क का नाहीत?, स्थानिकांना बॅटऱ्या धरून उजेड द्यावा लागला

छत्रपती संभाजीनगर : छावणीतील आगीच्या घटनेने बुधवारी संपूर्ण शहर हळहळले. ऐन रमजानच्या महिन्यात कष्ट करून सुखाने जगणाऱ्या सात जीवलगांचा मृत्यू झाला. मात्र, आपत्कालीन व्यवस्थापनाची जबाबदारी असणाऱ्या अग्निशमन विभागाच्या गंभीर उणिवा या घटनेमुळे समोर आल्या. अग्निशमन जवान केवळ डोक्यात हेल्मेट आणि टीशर्ट परिधान करुन होते. त्यांच्या हातात ना ग्लोव्हज होते, ना धुरामध्ये घुसण्यासाठी हूड, फेसमास्क होते. परिणामी, दुसऱ्या मजल्यावरील शेख कुटुंबापर्यंत जवान वेळेत पोहोचू न शकल्याने मृत्यूंची संख्या वाढत गेल्याचा आरोप आता होत आहे.

३.४१ वाजता पदमपुरा अग्निशमन केंद्राला घटनेचा कॉल प्राप्त झाला. त्यानंतर तिसऱ्या मिनिटाला अग्निशमन अधिकारी व जवान रवाना झाले. रस्त्यामध्ये एका ठिकाणी एका कार्यक्रमाचा मंडप थाटलेला असल्याने त्यात पथकाचा वेळ गेला. ३.५० च्या आसपास पहिला बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, तोही अपुऱ्या सोयीसुविधा अभावीच दाखल झाला.

या प्रश्नांची उत्तरे मनपा देईल का ?-प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वीजपुरवठा बंद झाल्याने अंधारात आग आटोक्यात आणण्यासाठी अपेक्षित व्यवस्थाच अग्निशमन विभागाकडे नव्हती. स्थानिकांना हातात बॅटऱ्या धरून त्यांना मार्ग दाखवावा लागला.-फायरफायटर पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किट जवानांकडे नव्हती. काही जवान साधी निळी पॅण्ट, पांढरा टी शर्टवर होते.-जवानांच्या हातात साधे ग्लोव्हज देखील नव्हते. शिवाय, धुरात प्रवेश करण्यासाठी एकाच्याही तोंडाला हूड व फेसमास्क दिसले नाही. परिणामी, ते आत प्रवेशच करु शकले नाही.-गरम शटर कापण्यासाठी विभागाकडे आवश्यक साहित्य नव्हते. जेसीबी येईपर्यंत बराच वेळ गेला.

कुटुंबाची तक्रारदरम्यान, शेख यांची मुलगी उजमा व नगमा यांनी पोलिस उपायुक्त नितिन बगाटे यांच्याकडे अर्ज करत अस्लम याच्यावर गंभीर कारवाईसह अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना निष्काळजीपणाला कारणीभूत धरत सहआरोपी करण्याची मागणी केली. छावणी पोलिसांनी आमची तक्रार स्वीकारली नाही. दोन दिवसांनी आम्ही तक्रार घेत नसतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा आरोपही मुलींनी केला.

साधे ताब्यातही नाहीघटनेनंतर अस्लम कुटुंबासह पसार झाला. गुरुवारी घराला कुलूप होते. मात्र, सात जणांच्या मृत्यूला जबाबदार अस्लम याला छावणी पाेलिसांनी चोवीस तास उलटूनही साधे ताब्यातही घेतले नव्हते.

पोलिस अटकेचा निर्णय घेऊ शकतातघरमालकाने सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष केले. बाहेर पडण्यास अपुरी जागा, अरुंद जिना, मर्यादेपलीकडे बांधकाम, घरगुती मीटरवर व्यवसायामुळे ही भीषण घटना घडली. १३ जून १९९७ रोजी नवी दिल्लीत उपहार सिनेमा हॉलमध्ये दोषपूर्ण ट्रान्सफॉर्मरमधून आग लागून जीव गेले होते. त्यात हॉटेलमालकाला तत्काळ अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने उपहार सिनेमा हॉलच्या बन्सल ब्रदर्सला सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे अटक करताच येत नाही, असे नाही. घटना गंभीर आहे. त्यामुळे पोलिस अटकेचा निर्णय निश्चित घेऊ शकतात.- ॲड. प्रशांत नागरगोजे, कायदे अभ्यासक.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfireआग