शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

धूरात सुरक्षा किट नसल्यानेच अग्निशमन जवान कुटुंबापर्यंत पोहोचू शकले नाही

By सुमित डोळे | Updated: April 5, 2024 14:10 IST

धुरात जाण्यासाठी हूड, फेसमास्क का नाहीत?, स्थानिकांना बॅटऱ्या धरून उजेड द्यावा लागला

छत्रपती संभाजीनगर : छावणीतील आगीच्या घटनेने बुधवारी संपूर्ण शहर हळहळले. ऐन रमजानच्या महिन्यात कष्ट करून सुखाने जगणाऱ्या सात जीवलगांचा मृत्यू झाला. मात्र, आपत्कालीन व्यवस्थापनाची जबाबदारी असणाऱ्या अग्निशमन विभागाच्या गंभीर उणिवा या घटनेमुळे समोर आल्या. अग्निशमन जवान केवळ डोक्यात हेल्मेट आणि टीशर्ट परिधान करुन होते. त्यांच्या हातात ना ग्लोव्हज होते, ना धुरामध्ये घुसण्यासाठी हूड, फेसमास्क होते. परिणामी, दुसऱ्या मजल्यावरील शेख कुटुंबापर्यंत जवान वेळेत पोहोचू न शकल्याने मृत्यूंची संख्या वाढत गेल्याचा आरोप आता होत आहे.

३.४१ वाजता पदमपुरा अग्निशमन केंद्राला घटनेचा कॉल प्राप्त झाला. त्यानंतर तिसऱ्या मिनिटाला अग्निशमन अधिकारी व जवान रवाना झाले. रस्त्यामध्ये एका ठिकाणी एका कार्यक्रमाचा मंडप थाटलेला असल्याने त्यात पथकाचा वेळ गेला. ३.५० च्या आसपास पहिला बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, तोही अपुऱ्या सोयीसुविधा अभावीच दाखल झाला.

या प्रश्नांची उत्तरे मनपा देईल का ?-प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वीजपुरवठा बंद झाल्याने अंधारात आग आटोक्यात आणण्यासाठी अपेक्षित व्यवस्थाच अग्निशमन विभागाकडे नव्हती. स्थानिकांना हातात बॅटऱ्या धरून त्यांना मार्ग दाखवावा लागला.-फायरफायटर पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किट जवानांकडे नव्हती. काही जवान साधी निळी पॅण्ट, पांढरा टी शर्टवर होते.-जवानांच्या हातात साधे ग्लोव्हज देखील नव्हते. शिवाय, धुरात प्रवेश करण्यासाठी एकाच्याही तोंडाला हूड व फेसमास्क दिसले नाही. परिणामी, ते आत प्रवेशच करु शकले नाही.-गरम शटर कापण्यासाठी विभागाकडे आवश्यक साहित्य नव्हते. जेसीबी येईपर्यंत बराच वेळ गेला.

कुटुंबाची तक्रारदरम्यान, शेख यांची मुलगी उजमा व नगमा यांनी पोलिस उपायुक्त नितिन बगाटे यांच्याकडे अर्ज करत अस्लम याच्यावर गंभीर कारवाईसह अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना निष्काळजीपणाला कारणीभूत धरत सहआरोपी करण्याची मागणी केली. छावणी पोलिसांनी आमची तक्रार स्वीकारली नाही. दोन दिवसांनी आम्ही तक्रार घेत नसतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा आरोपही मुलींनी केला.

साधे ताब्यातही नाहीघटनेनंतर अस्लम कुटुंबासह पसार झाला. गुरुवारी घराला कुलूप होते. मात्र, सात जणांच्या मृत्यूला जबाबदार अस्लम याला छावणी पाेलिसांनी चोवीस तास उलटूनही साधे ताब्यातही घेतले नव्हते.

पोलिस अटकेचा निर्णय घेऊ शकतातघरमालकाने सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष केले. बाहेर पडण्यास अपुरी जागा, अरुंद जिना, मर्यादेपलीकडे बांधकाम, घरगुती मीटरवर व्यवसायामुळे ही भीषण घटना घडली. १३ जून १९९७ रोजी नवी दिल्लीत उपहार सिनेमा हॉलमध्ये दोषपूर्ण ट्रान्सफॉर्मरमधून आग लागून जीव गेले होते. त्यात हॉटेलमालकाला तत्काळ अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने उपहार सिनेमा हॉलच्या बन्सल ब्रदर्सला सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे अटक करताच येत नाही, असे नाही. घटना गंभीर आहे. त्यामुळे पोलिस अटकेचा निर्णय निश्चित घेऊ शकतात.- ॲड. प्रशांत नागरगोजे, कायदे अभ्यासक.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfireआग