शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

सातारा डोंगरावरील वणवा भल्या पहाटे शांत; कारण अद्याप अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 12:10 IST

fire on Satara hills आगीमुळे नक्षत्रवाडी, कांचनवाडी, इटखेडा, सातारा डोंगर पायथ्याच्या वसाहतीमधील नागरिकांची झोप मात्र उडाली होती.

ठळक मुद्दे ही आग एवढी मोठी होती की, शहराच्या विविध कानाकोपऱ्यातून दिसत होती. वारे वाहिले तसे वाळलेल्या गवताने पेट घेतल्याने आग पुढे पुढे सरकत गेली.

-साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : सातारा डोंगरावर बुधवारी सायंकाळी पेटलेला वणवा गुरुवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास आटोक्यात येत शांत झाला आणि मदतकार्य पथकाचा जीव भांड्यात पडला. वनविभाग आणि मनपाच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी पहाटेपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत होते. भारत बटालियन सुधाकर नगरच्या बाजूने असलेल्या डोंगरावरील कुरणे आगीने भस्मसात केली. ही आग एवढी मोठी होती की, शहराच्या विविध कानाकोपऱ्यातून दिसत होती. त्यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागातून नागरिकांचे फोन अग्निशमन विभागाला जात होते.

डोंगरावरील घटनास्थळी गुरुवारी दुपारी लोकमत टीमने प्रत्यक्ष भेट दिली. कांचनवाडी, विटखेडा, सातारा परिसराच्या त्रिकोणी आकारात आग पसरल्याचे दिसत होते. वारे वाहिले तसे वाळलेल्या गवताने पेट घेतल्याने आग पुढे पुढे सरकत गेली. त्यामुळे नक्षत्रवाडी, कांचनवाडी, इटखेडा, सातारा डोंगर पायथ्याच्या वसाहतीमधील नागरिकांची झोप मात्र उडाली होती. सातारा बाजूकडील आग बुधवारी रात्री लवकर विझली. परंतु, कांचनवाडी परिसरातील आग पहाटे ३.३० वाजेपर्यंत धगधगत होती. भारत बटालियनच्या पाठीमागील डोंगरावरील पुरातन खंडोबा मंदिर क्षेत्रापर्यंत ही आग पोहोचली होती.

अग्निशमन विभागाचे पथक डोंगर पायथ्याला येऊन थांबले होते. आगीचा बंब व वाहन वर नेण्यासाठी रस्ता नसल्यामुळे या पथकास पायी चालत जावे लागले. झाडांच्या ओल्या फांद्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न, या पथकाने केले. डोंगरावरील पाऊलवाटामुळे गवताचे सलग रान आगीला मिळू शकले नाही. जेथे-जेथे पाऊलवाट आली तेथे आग आटोक्यात आणणे सोपे झाले.

आगीमध्ये पक्ष्यांची घरटी जळून राख झाली. घरट्यांच्या शोधात पक्षी आकाशात घिरट्या मारत होते. उघडेबोडके झालेले, होरपळून निष्पर्ण झालेले वृक्ष पाहून पक्ष्यांचा होणारा आक्रोश पाहणाऱ्यांचे हृदय हेलावून टाकत होता. सरडे, सरीसृप आदी सरपटणारे प्राणीही दिसत होते. जनावरांसाठीची वैरण या आगीत भस्मसात झाली. त्यामुळे गुराखी व त्यांची जनावरेही आज डोंगरावर दिसत नव्हती.

आग लावली कुणी?आग कोणी लावली की लागली, याविषयी वनविभाग तसेच अग्निशमन विभाग यांच्याकडे कोणतेही उत्तर नाही.

डोंगरावर दरवर्षी आग लागते कशी...?डोंगरमाथ्यावर अनेकांची शेती असून, कुणीतरी शेतातील गवत पेटवून दिले असावे; अथवा उनाडक्या करणाऱ्या लोकांपैकी कुणीतरी गवत पेटविण्याचा प्रयत्न केला असावा, असा तर्कवितर्क परिसरात जनावरे चारणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केला. आमच्या जनावरांची वैरण कुणीतरी हेतुपुरस्सर जाळून टाकली, असाही आरोप गोपालकांतून व्यक्त होताना दिसला.

यांनी जागून काढली रात्र...वन परिक्षेत्र अधिकारी शशिकांत तांबे व त्यांची टीम तसेच परिसरातील स्थानिक नागरिक रंजीत पवार, राजू राठोड, बंटी चव्हाण, शुभम राठोड, प्रवीण चव्हाण, विजय चव्हाण, सुनील राठोड, अतुल चव्हाण, अक्षय राठोड यांच्यासह सिडको अग्निशमन दलाचे विजय राठोड, बापू घरत, श्रीकृष्णा होळंबे, वाहनचालक अब्दुल हमीद आदींनी रात्र जागून काढली. आग पुढे जाऊ नये म्हणून प्रयत्न केले. गुरुवारी पहाटे ३.३० वाजता आग आटोक्यात आल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादforest departmentवनविभागfireआग