शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात आगीचे सत्र सुरूच; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:31 IST

फुलंब्री तालुक्यातील निधोना येथे आग लागून ११ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर १० शेळ्यांना गंभीर इजा झाल्याची घटना मंगळवारी (दि.१) रात्री ११ वाजता घडली. काही शेळ्यांना वेळीच बाहेर काढण्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या आगीत संसारोपयोगी साहित्यासह एकूण ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

ठळक मुद्देआग लागून ११ शेळ्या भस्मसात : निधोन्यात आग लागून तब्बल ४ लाखांचे नुकसान; प्रशासनाने आर्थिक मदत देण्याची नागरिकांची मागणी

बाबरा : फुलंब्री तालुक्यातील निधोना येथे आग लागून ११ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर १० शेळ्यांना गंभीर इजा झाल्याची घटना मंगळवारी (दि.१) रात्री ११ वाजता घडली. काही शेळ्यांना वेळीच बाहेर काढण्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या आगीत संसारोपयोगी साहित्यासह एकूण ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.येथील शेतकरी सय्यद सिद्धू सय्यद नियाज अली हे गावाजवळच्या डोंगरावर गट नं. २३६ मधील गायरानात वास्तव्यास आहेत. मंगळवारी रात्री सर्व कुटुंबीय घराबाहेर झोपल्यानंतर कुडाने अचानक पेट घेतला.आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे काही कळण्याच्या आत येथे बांधलेल्या ११ शेळ्यांचा जागीच कोळसा झाला. यावेळी १० शेळ्या आगीत होरपळल्या. इतर १३ शेळ्यांना वेळीच बाहेर काढल्यामुळे त्यांचा जीव वाचला.या आगीत शेळ्यांसह खताच्या १० गोण्या, धान्य, २२ टीन पत्रे, कपडे, दागिने, रोख रक्कम, असे एकूण ४ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. चार लाखांपेक्षाही जास्त रकमेची नुकसान झाले आहे. माहिती मिळताच तलाठी आनंद शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेमुळे सदर कुटुंबीय उघड्यावर पडले असून, कुटुंबातील आई-वडिलांसह पूर्ण सोळा व्यक्तींचा उदरनिर्वाह मजुरी व शेळ्यांच्या उत्पन्नातून चालत होता.दरम्यान, मृत शेळ्यांचे शवविच्छेदन पशुधन पर्यवेक्षक डॉ. संदीप खेसर यांनी केले असून, जखमी शेळ्यांवर पशुधन पर्यवेक्षक डॉ. वैरागी यांनी उपचार केले.शासनाने सदर कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी सेवा सोसायटीचे चेअरमन देवीदास गाडेकर, प्रकाश नरवडे, उपसरपंच सुनील गाडेकर, कडुबा राऊतराय, सांडू राऊतराय, विठ्ठल राऊतराय, सय्यद याकूब गरीब, सय्यद रहीम गरीब, सुनील गाडेकर, सुनील दुलोत, संतोष गाडेकर, शरद गाडेकर आदींनी केली आहे.कनकशीळ येथे ऊस जळून खाकबाजारसावंगी : कनकशीळ येथे विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन लागलेल्या आगीत ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.आसद शहानूर पटेल यांच्या गट नंबर ५९ मधील शेतात उसात असलेल्या विद्युत तारांवर रानपाखरे बसल्यामुळे घर्षण झाले. यामुळे उसात ठिणग्या पडून आग लागली. या आगीत ऊस जळून जवळपास ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले. महावितरणने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.आळंद येथे शॉर्टसर्किटने २ लाखांचे नुकसानआळंद : येथील गट नंबर ७२ मधील घरात शार्टसर्किटमुळे आग लागून जवळपास २ लाख रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.मधुकर खंडू जमधडे या शेतकºयाच्या राहत्या घराशेजारी तारांचे घर्षण होऊन घराला आग लागली. या आगीत घरातील धान्य, दागिने, रोख रक्कम, कपडे व इतर संसारोपयोगी साहित्यासह शेतीची अवजारे, असे एकूण २ लाख रुपयांचे नुकसान झाले.दरम्यान, आग लागली तेव्हा जमधडे यांच्या कुटुंबातील सदस्य लग्नासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे आग लागल्याचे लवकर निदर्शनास न आल्याने घरातील जवळपास सर्वच साहित्य खाक झाले. घटनेची माहिती मिळताच तलाठी छाया सुरडकर, कोतवाल शेख इब्राहिम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.या घटनेमुळे सदर शेतकरी कुटुंब बेघर झाले असून, त्यांना शासनातर्फे तात्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी सरपंच भारती शेळके, कौतिकराव पायगव्हाण, सुनील तायडे, ग्रामपंचायत सदस्य सोमीनाथ भालेराव आदींनी केली आहे.आडूळ येथे चाºयाची गंजी जळालीआडूळ : येथे चाºयाच्या गंजीला आग लागल्याने संपूर्ण चाºयासह पाईप व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजता घडली. विद्युत तारांमध्ये झालेल्या घर्षणामुळे आग लागल्याचे बोलले जात आहे.आडूळ गावालगत भगवान पुंजाराम पठाडे यांचे गट क्र.१७५ मध्ये शेत असून, या शेतात त्यांनी जनावरांसाठी ज्वारीच्या चाºयाची गंजी रचून ठेवली होती. मात्र, मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास या गंजीला विद्युत तारांचे घर्षण होऊन आग लागल्याने एकूण २ हजार ज्वारीच्या चाºयाच्या पेंढ्या जळून खाक झाल्या.आग लागल्याचे निदर्शनास येताच भगवान पठाडे यांनी आरडाओरड केल्याने बाजूच्या शेतात काम करीत असलेले शेतकरी अनिल पिवळ, नंदू पिवळ, सारंगधर पिवळ, दिलीप ढोकळे आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने पाण्याअभावी आग लवकर आटोक्यात आली नाही. त्यामुळे शेती उपयोगी साहित्यासह संपूर्ण चारा जळून खाक झाला.घटनास्थळी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयाने केली आहे. माहिती मिळताच तलाठी राजेंद्र आठवले व कोतवाल शेख अजीम यांनी घटनेचा पंचनामा केला.

टॅग्स :fireआगAurangabadऔरंगाबाद