शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
2
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
3
बँक, आधार ते GST पर्यंत..., आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर अन् जीवनावर थेट परिणाम होणार!
4
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
5
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
6
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
7
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
8
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
9
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
10
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
11
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
12
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
13
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
14
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
15
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
16
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
17
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
18
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
19
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
20
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम

औरंगाबाद जिल्ह्यात आगीचे सत्र सुरूच; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:31 IST

फुलंब्री तालुक्यातील निधोना येथे आग लागून ११ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर १० शेळ्यांना गंभीर इजा झाल्याची घटना मंगळवारी (दि.१) रात्री ११ वाजता घडली. काही शेळ्यांना वेळीच बाहेर काढण्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या आगीत संसारोपयोगी साहित्यासह एकूण ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

ठळक मुद्देआग लागून ११ शेळ्या भस्मसात : निधोन्यात आग लागून तब्बल ४ लाखांचे नुकसान; प्रशासनाने आर्थिक मदत देण्याची नागरिकांची मागणी

बाबरा : फुलंब्री तालुक्यातील निधोना येथे आग लागून ११ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर १० शेळ्यांना गंभीर इजा झाल्याची घटना मंगळवारी (दि.१) रात्री ११ वाजता घडली. काही शेळ्यांना वेळीच बाहेर काढण्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या आगीत संसारोपयोगी साहित्यासह एकूण ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.येथील शेतकरी सय्यद सिद्धू सय्यद नियाज अली हे गावाजवळच्या डोंगरावर गट नं. २३६ मधील गायरानात वास्तव्यास आहेत. मंगळवारी रात्री सर्व कुटुंबीय घराबाहेर झोपल्यानंतर कुडाने अचानक पेट घेतला.आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे काही कळण्याच्या आत येथे बांधलेल्या ११ शेळ्यांचा जागीच कोळसा झाला. यावेळी १० शेळ्या आगीत होरपळल्या. इतर १३ शेळ्यांना वेळीच बाहेर काढल्यामुळे त्यांचा जीव वाचला.या आगीत शेळ्यांसह खताच्या १० गोण्या, धान्य, २२ टीन पत्रे, कपडे, दागिने, रोख रक्कम, असे एकूण ४ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. चार लाखांपेक्षाही जास्त रकमेची नुकसान झाले आहे. माहिती मिळताच तलाठी आनंद शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेमुळे सदर कुटुंबीय उघड्यावर पडले असून, कुटुंबातील आई-वडिलांसह पूर्ण सोळा व्यक्तींचा उदरनिर्वाह मजुरी व शेळ्यांच्या उत्पन्नातून चालत होता.दरम्यान, मृत शेळ्यांचे शवविच्छेदन पशुधन पर्यवेक्षक डॉ. संदीप खेसर यांनी केले असून, जखमी शेळ्यांवर पशुधन पर्यवेक्षक डॉ. वैरागी यांनी उपचार केले.शासनाने सदर कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी सेवा सोसायटीचे चेअरमन देवीदास गाडेकर, प्रकाश नरवडे, उपसरपंच सुनील गाडेकर, कडुबा राऊतराय, सांडू राऊतराय, विठ्ठल राऊतराय, सय्यद याकूब गरीब, सय्यद रहीम गरीब, सुनील गाडेकर, सुनील दुलोत, संतोष गाडेकर, शरद गाडेकर आदींनी केली आहे.कनकशीळ येथे ऊस जळून खाकबाजारसावंगी : कनकशीळ येथे विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन लागलेल्या आगीत ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.आसद शहानूर पटेल यांच्या गट नंबर ५९ मधील शेतात उसात असलेल्या विद्युत तारांवर रानपाखरे बसल्यामुळे घर्षण झाले. यामुळे उसात ठिणग्या पडून आग लागली. या आगीत ऊस जळून जवळपास ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले. महावितरणने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.आळंद येथे शॉर्टसर्किटने २ लाखांचे नुकसानआळंद : येथील गट नंबर ७२ मधील घरात शार्टसर्किटमुळे आग लागून जवळपास २ लाख रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.मधुकर खंडू जमधडे या शेतकºयाच्या राहत्या घराशेजारी तारांचे घर्षण होऊन घराला आग लागली. या आगीत घरातील धान्य, दागिने, रोख रक्कम, कपडे व इतर संसारोपयोगी साहित्यासह शेतीची अवजारे, असे एकूण २ लाख रुपयांचे नुकसान झाले.दरम्यान, आग लागली तेव्हा जमधडे यांच्या कुटुंबातील सदस्य लग्नासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे आग लागल्याचे लवकर निदर्शनास न आल्याने घरातील जवळपास सर्वच साहित्य खाक झाले. घटनेची माहिती मिळताच तलाठी छाया सुरडकर, कोतवाल शेख इब्राहिम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.या घटनेमुळे सदर शेतकरी कुटुंब बेघर झाले असून, त्यांना शासनातर्फे तात्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी सरपंच भारती शेळके, कौतिकराव पायगव्हाण, सुनील तायडे, ग्रामपंचायत सदस्य सोमीनाथ भालेराव आदींनी केली आहे.आडूळ येथे चाºयाची गंजी जळालीआडूळ : येथे चाºयाच्या गंजीला आग लागल्याने संपूर्ण चाºयासह पाईप व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजता घडली. विद्युत तारांमध्ये झालेल्या घर्षणामुळे आग लागल्याचे बोलले जात आहे.आडूळ गावालगत भगवान पुंजाराम पठाडे यांचे गट क्र.१७५ मध्ये शेत असून, या शेतात त्यांनी जनावरांसाठी ज्वारीच्या चाºयाची गंजी रचून ठेवली होती. मात्र, मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास या गंजीला विद्युत तारांचे घर्षण होऊन आग लागल्याने एकूण २ हजार ज्वारीच्या चाºयाच्या पेंढ्या जळून खाक झाल्या.आग लागल्याचे निदर्शनास येताच भगवान पठाडे यांनी आरडाओरड केल्याने बाजूच्या शेतात काम करीत असलेले शेतकरी अनिल पिवळ, नंदू पिवळ, सारंगधर पिवळ, दिलीप ढोकळे आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने पाण्याअभावी आग लवकर आटोक्यात आली नाही. त्यामुळे शेती उपयोगी साहित्यासह संपूर्ण चारा जळून खाक झाला.घटनास्थळी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयाने केली आहे. माहिती मिळताच तलाठी राजेंद्र आठवले व कोतवाल शेख अजीम यांनी घटनेचा पंचनामा केला.

टॅग्स :fireआगAurangabadऔरंगाबाद