शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीनंतरही वाळूज एमआयडीसीमध्ये फायर ऑडिट होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 18:55 IST

वाळूज एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये फायर  ऑडिट होत नसल्याचे अनेक घटनांवरून दिसून येत आहे.

ठळक मुद्देचालू वर्षात पहिल्या ५ महिन्यांतच एमआयडीसीत आगीच्या २४  घटना घडल्या आहेत.यात एका वयोवृद्ध इसमाचा मृत्यू झाला असून,कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : वाळूज एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये फायर  ऑडिट होत नसल्याचे अनेक घटनांवरून दिसून येत आहे. गत पाच महिन्यांत आगीच्या २४ घटना घडल्या आहेत. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, एकाचा बळी गेला आहे. अग्निशमन सुरक्षेविषयी एमआयडीसी उदासीन असल्याने कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाळूज एमआयडीसीतील कारखान्यात आगीच्या घटना थांबविण्यासाठी  कोणतीच ठोस उपाययोजना केली जात नसल्याने आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कारखान्यांमध्ये अग्निशमन नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. वारंवार आगीच्या घटना घडूनही एमआयडीसी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. एमआयडीसीत ४ हजारांवर कारखाने असून, यामध्ये हजारो कामगार काम करतात. 

बहुतांश कारखान्यांत स्वत:ची अग्निशमन यंत्रणा नसल्याचे उघडकीस आले आहे, तर काही कारखान्यांत अग्निशामक यंत्रणा बसविण्यात आलेली आहे; परंतु ती कार्यान्वित नाही. एमआयडीसी अग्निशमन कार्यालयाकडून फायर आॅडिटच झाले नसल्याचे वाढत्या आगीच्या घटनांवरून दिसून येते, तर अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित आहे अथवा नाही हे तपासणीचे अधिकार एमआयडीसी अग्निशामक दलाला नाहीत. त्यामुळे आगीच्या घटना वाढत आहे. 

एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रवींद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही, तर वाळूज एमआयडीसी अग्निशमन अधिकारी के.ए.डोंगरे यांनी वाळूज कार्यालयातून कोणतीच परवानगी दिली जात नाही. ती शेंद्रा कार्यालयातून दिली जाते, असे लोकमतशी बोलताना सांगितले.  

भंगार गोदामाला आग लाखोंचे नुकसानचालू वर्षात पहिल्या ५ महिन्यांतच एमआयडीसीत आगीच्या २४  घटना घडल्या आहेत. यात एका वयोवृद्ध इसमाचा मृत्यू झाला असून, अनेक कुटुंब बचावली आहेत, तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. १२ जानेवारीला अभिजित पाटणी यांच्या प्लॉट क्रमांक सी-२८२ वरील भंगार गोदामाला भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले. 

२४ जानेवारीला धनराज चव्हाण व इंद्रजित राऊत यांच्या प्रिंटिंग प्रेसला आग लागली. १५ फेब्रुवारी रोजी प्रकाश विजयवर्गीय यांच्या प्लास्टिक कंपनीला आग लागून  वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला, तर लाखो रुपयांचे नुकसान झाले. १६ फेब्रुवारीला बी-७६/२ वरील अभय एजन्सीच्या आॅईल टँकला आग लागली. ११ एप्रिलला सय्यद सलमान सय्यद रहेमान यांच्या भंगार गोदामाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. १६ मे ला बनकरवाडी गट नंबर ४१ वरील केदारनाथ पॅकिंग कंपनीला आग लागून लाखो रुपयांची यंत्र सामुग्री व पक्का आणि कच्चा माल जळून खाक झाला. 

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीfireआग