शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

...अखेर ग्रामस्थांना समान पाण्याचा हक्क

By admin | Updated: May 21, 2015 00:28 IST

तामलवाडी : केवळ ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी तुळजापूर तालुक्यातील सावंतवाडी नं. २ या गावाला नळ योजनेतून होणारा पाणीपुरवठा बंद झाला होता

तामलवाडी : केवळ ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी तुळजापूर तालुक्यातील सावंतवाडी नं. २ या गावाला नळ योजनेतून होणारा पाणीपुरवठा बंद झाला होता. ‘लोकमत’ने ‘माझा गाव-माझा निर्धार’ या मालिकेतून ही बाब समोर आणल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत या गावाला एक दिवसाआड पाणीपुरवठा चालू केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी सुरू असलेली भटकंती थांबली आहे. शेळगाव साठवण तलावाच्या निर्मितीनंतर सावंतवाडी गावाचे दोन ठिकाणी पुनर्वसन झाले. त्या अनुषंगाने पाणी पुरवठा विभागाने दोन गावासाठी संयुक्त पाणी पुरवठा योजनाही तयार केली. परंतु, या योजनेतून सावंतवाडी नं. १ ची तहान भागल्यानंतर सावंतवाडी २ ला पाणी पुरवठा केला जात होता. त्यामुळे दोन्ही गावांना समान पाणी मिळत नव्हते. तसेच जानेवारीपासून सावंतवाडी नं. २ ला होणारा पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे येथील रहिवाशांना घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. याबाबत ‘लोकमत’ने ‘माझा गाव, माझा निर्धार’ या मालिकेच्या माध्यमातून हा प्रश्न समोर आणल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. पाणीपुरवठा योजनेतून गावाला समान पाण्याचा हक्क देवून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्यामुळे येथील रहिवाशांची हेळसांड थांबली असल्याचे सातलिंग बरबडे, रामलिंग बरबडे, सुधाकर साळुंके यांनी सांगितले. (वार्ताहर)