शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

अखेर पर्यटनस्थळे अनलॉक; मर्यादित प्रवेश, कोरोना नियमांचे पालन करण्याच्या आदेशासह परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 13:13 IST

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी सकाळी आदेश काढत काही नियमांसह गुरुवारी ( दि. १७ ) सकाळी ६ वाजेपासून जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, ऐतिहासिक वास्तू उघडण्यास परवानगी दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद असणार आहेत. सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात प्रत्येकी १००० पर्यटकांना प्रवेश

औरंगाबाद : ऐतहासिक पर्यटन स्थळे, स्मारके, संग्रहालय सुरु करण्याच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) सोमवारी दिलेल्या आदेशाची जिल्ह्यात गुरुवारपासून ( दि. १७ ) अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबत अंतिम निर्णय घेत सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात मर्यादित प्रवेश संख्या आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या आदेशासह ही परवानगी दिली आहे.  

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या (एएसआय) अंतर्गत असलेली ऐतिहासिक पर्यटन स्थळे, स्मारके, संग्रहालये १६ जूनपासून उघडण्याचे आदेश भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी एएसआयच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याशी पत्रव्यवहार केला. यानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी बुधवारी सकाळी गुरुवारपासून ( दि. १७ ) जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, स्मारके आणि संग्रहालये उघडण्याची परवानगी दिली. यानुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अंतर्गत औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात असलेली जगप्रसिद्ध वेरूळ- अजिंठा लेणी, बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला आणि खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर या ऐतिहासिक वास्तू अनलॉक होणार आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मागील अनेक दिवसांपासून पर्यटन स्थळे बंद आहेत. अनेक बाबी अनलॉक झाल्यानंतर पर्यटनस्थळे खुली करण्यात यावीत अशी मागणी करण्यात येत आहे. यानुसार एएसआयने सोमवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले की, १६ जूनपासून एएसआयच्या अंतर्गत असलेली सर्व स्मारके, पुरातन स्थळे सुरू करण्यात यावीत, ही स्मारके, पुरातन स्थळे सुरू करताना संबंधित राज्य आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनांच्या नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट केले. यानंतर एएसआयच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देत ऐतिहासिक वास्तू उघडण्याविषयी निर्णय घेण्यासाठी चर्चा केली. यानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी बुधवारी सकाळी आदेश काढत काही नियमांसह गुरुवारी ( दि. १७ ) सकाळी ६ वाजेपासून जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, ऐतिहासिक वास्तू उघडण्यास परवानगी दिली. सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात प्रत्येकी १००० पर्यटकांना यावेळी परवानगी देण्यात आली आहे. तसेच मास्क वापर, सामाजिक अंतर अशा कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद असणार आहेत. 

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद