शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर औषध निरीक्षकाच्या भरतीची प्रक्रिया स्थगित, फार्मसी पदवीधारकांमध्ये आनंदाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 17:33 IST

तीन वर्षांचा अनुभव असलेल्या फार्मसी पदवीधारकांनी अर्ज करावा, असा उल्लेख असल्यामुळे नाराजीचा सूर उमटला होता.

औरंगाबाद : औषध निरीक्षक गट- ब या पदासाठी ३ वर्षे अनुभवाची अट रद्द करून या पदाची नव्याने जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी करत फार्मसी विद्यार्थी हक्क समितीने संपूर्ण राज्यात आंदोलनाची हाक दिल्यानंतर अखेर शासनाला दखल घ्यावी लागली. शासनाच्या आदेशानुसार शनिवारी ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या जाहिरातीला स्थगिती दिली. दरम्यान, फार्मसी पदवीधारक विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

लोकसेवा आयोगाने औषध निरीक्षकांच्या ८७ पदांसाठी १७ नोव्हेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात तीन वर्षांचा अनुभव असलेल्या फार्मसी पदवीधारकांनी अर्ज करावा, असा उल्लेख असल्यामुळे नाराजीचा सूर उमटला होता. फार्मसी विद्यार्थी हक्क समितीने ३ वर्षांच्या अटीवर आक्षेप घेत आंदोलन केले होते. दिल्ली, हिमाचलप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, सिक्कीम या राज्यात ३ वर्षे अनुभवाची अट मागे घेतली असून महाराष्ट्रातही ती मागे घ्यावी, असे समितीचे म्हणणे होते.

राज्यात बेरोजगार फार्मसी पदवीधारक तरुणांची संख्या जवळपास दीड लाख एवढी आहे. हे तरुण रोजगाराच्या शोधात असताना ३ वर्षांपासून रोजगार करणाऱ्या आर्थिक सक्षम तरुणांना पुन्हा नोकरीची संधी देऊन लोकसेवा आयोग काय साध्य करू इच्छिते, असा सवालही समितीने उपस्थित केला होता. दुसरीकडे, फार्म- डी या सहा वर्षांच्या अभ्यासक्रमाला सरकारची मान्यता आहे. पण, या विद्यार्थ्यांना अर्ज करता येत नाही. फार्मसी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना या पदासाठी प्राधान्य दिले जाईल, असे जाहिरातीत नमूद केले होते. पदवी घेतल्यानंतर २ वर्षे पदव्युत्तर शिक्षणासाठी आणि पुढे ३ वर्षे नोकरी करून अनुभव घ्यायचा व ही परीक्षा द्यायची, ही बाब अन्यायकारक नाही का. त्यामुळे ही अट वगळावी व नव्याने जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांची होती, असे समितीचे संयोजक ऋषिकेश सपकाळ यांनी सांगितले.

दरवर्षी ३० हजार विद्यार्थी होतात बेरोजगारराज्यात ४०० हून अधिक फार्मसी महाविद्यालये आहेत. दरवर्षी २४ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात. यात फार्म-डी आणि पदव्युतर विद्यार्थी मिळून ३० हजार फार्मसी पदवीधारक रोजगारासाठी भटकंती करतात. देशभरातील औषधी कंपन्यांमध्ये एवढ्या विद्यार्थ्यांना रोजगार देण्याची क्षमता नाही. मग, अनुभवाच्या अटीची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसमोर काय पर्याय आहे, असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी