शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

अखेर औषध निरीक्षकाच्या भरतीची प्रक्रिया स्थगित, फार्मसी पदवीधारकांमध्ये आनंदाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 17:33 IST

तीन वर्षांचा अनुभव असलेल्या फार्मसी पदवीधारकांनी अर्ज करावा, असा उल्लेख असल्यामुळे नाराजीचा सूर उमटला होता.

औरंगाबाद : औषध निरीक्षक गट- ब या पदासाठी ३ वर्षे अनुभवाची अट रद्द करून या पदाची नव्याने जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी करत फार्मसी विद्यार्थी हक्क समितीने संपूर्ण राज्यात आंदोलनाची हाक दिल्यानंतर अखेर शासनाला दखल घ्यावी लागली. शासनाच्या आदेशानुसार शनिवारी ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या जाहिरातीला स्थगिती दिली. दरम्यान, फार्मसी पदवीधारक विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

लोकसेवा आयोगाने औषध निरीक्षकांच्या ८७ पदांसाठी १७ नोव्हेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात तीन वर्षांचा अनुभव असलेल्या फार्मसी पदवीधारकांनी अर्ज करावा, असा उल्लेख असल्यामुळे नाराजीचा सूर उमटला होता. फार्मसी विद्यार्थी हक्क समितीने ३ वर्षांच्या अटीवर आक्षेप घेत आंदोलन केले होते. दिल्ली, हिमाचलप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, सिक्कीम या राज्यात ३ वर्षे अनुभवाची अट मागे घेतली असून महाराष्ट्रातही ती मागे घ्यावी, असे समितीचे म्हणणे होते.

राज्यात बेरोजगार फार्मसी पदवीधारक तरुणांची संख्या जवळपास दीड लाख एवढी आहे. हे तरुण रोजगाराच्या शोधात असताना ३ वर्षांपासून रोजगार करणाऱ्या आर्थिक सक्षम तरुणांना पुन्हा नोकरीची संधी देऊन लोकसेवा आयोग काय साध्य करू इच्छिते, असा सवालही समितीने उपस्थित केला होता. दुसरीकडे, फार्म- डी या सहा वर्षांच्या अभ्यासक्रमाला सरकारची मान्यता आहे. पण, या विद्यार्थ्यांना अर्ज करता येत नाही. फार्मसी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना या पदासाठी प्राधान्य दिले जाईल, असे जाहिरातीत नमूद केले होते. पदवी घेतल्यानंतर २ वर्षे पदव्युत्तर शिक्षणासाठी आणि पुढे ३ वर्षे नोकरी करून अनुभव घ्यायचा व ही परीक्षा द्यायची, ही बाब अन्यायकारक नाही का. त्यामुळे ही अट वगळावी व नव्याने जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांची होती, असे समितीचे संयोजक ऋषिकेश सपकाळ यांनी सांगितले.

दरवर्षी ३० हजार विद्यार्थी होतात बेरोजगारराज्यात ४०० हून अधिक फार्मसी महाविद्यालये आहेत. दरवर्षी २४ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात. यात फार्म-डी आणि पदव्युतर विद्यार्थी मिळून ३० हजार फार्मसी पदवीधारक रोजगारासाठी भटकंती करतात. देशभरातील औषधी कंपन्यांमध्ये एवढ्या विद्यार्थ्यांना रोजगार देण्याची क्षमता नाही. मग, अनुभवाच्या अटीची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसमोर काय पर्याय आहे, असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी