शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अखेर औषध निरीक्षकाच्या भरतीची प्रक्रिया स्थगित, फार्मसी पदवीधारकांमध्ये आनंदाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 17:33 IST

तीन वर्षांचा अनुभव असलेल्या फार्मसी पदवीधारकांनी अर्ज करावा, असा उल्लेख असल्यामुळे नाराजीचा सूर उमटला होता.

औरंगाबाद : औषध निरीक्षक गट- ब या पदासाठी ३ वर्षे अनुभवाची अट रद्द करून या पदाची नव्याने जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी करत फार्मसी विद्यार्थी हक्क समितीने संपूर्ण राज्यात आंदोलनाची हाक दिल्यानंतर अखेर शासनाला दखल घ्यावी लागली. शासनाच्या आदेशानुसार शनिवारी ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या जाहिरातीला स्थगिती दिली. दरम्यान, फार्मसी पदवीधारक विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

लोकसेवा आयोगाने औषध निरीक्षकांच्या ८७ पदांसाठी १७ नोव्हेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात तीन वर्षांचा अनुभव असलेल्या फार्मसी पदवीधारकांनी अर्ज करावा, असा उल्लेख असल्यामुळे नाराजीचा सूर उमटला होता. फार्मसी विद्यार्थी हक्क समितीने ३ वर्षांच्या अटीवर आक्षेप घेत आंदोलन केले होते. दिल्ली, हिमाचलप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, सिक्कीम या राज्यात ३ वर्षे अनुभवाची अट मागे घेतली असून महाराष्ट्रातही ती मागे घ्यावी, असे समितीचे म्हणणे होते.

राज्यात बेरोजगार फार्मसी पदवीधारक तरुणांची संख्या जवळपास दीड लाख एवढी आहे. हे तरुण रोजगाराच्या शोधात असताना ३ वर्षांपासून रोजगार करणाऱ्या आर्थिक सक्षम तरुणांना पुन्हा नोकरीची संधी देऊन लोकसेवा आयोग काय साध्य करू इच्छिते, असा सवालही समितीने उपस्थित केला होता. दुसरीकडे, फार्म- डी या सहा वर्षांच्या अभ्यासक्रमाला सरकारची मान्यता आहे. पण, या विद्यार्थ्यांना अर्ज करता येत नाही. फार्मसी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना या पदासाठी प्राधान्य दिले जाईल, असे जाहिरातीत नमूद केले होते. पदवी घेतल्यानंतर २ वर्षे पदव्युत्तर शिक्षणासाठी आणि पुढे ३ वर्षे नोकरी करून अनुभव घ्यायचा व ही परीक्षा द्यायची, ही बाब अन्यायकारक नाही का. त्यामुळे ही अट वगळावी व नव्याने जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांची होती, असे समितीचे संयोजक ऋषिकेश सपकाळ यांनी सांगितले.

दरवर्षी ३० हजार विद्यार्थी होतात बेरोजगारराज्यात ४०० हून अधिक फार्मसी महाविद्यालये आहेत. दरवर्षी २४ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात. यात फार्म-डी आणि पदव्युतर विद्यार्थी मिळून ३० हजार फार्मसी पदवीधारक रोजगारासाठी भटकंती करतात. देशभरातील औषधी कंपन्यांमध्ये एवढ्या विद्यार्थ्यांना रोजगार देण्याची क्षमता नाही. मग, अनुभवाच्या अटीची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसमोर काय पर्याय आहे, असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी