शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

समांतर जलवाहिनीच्या अंतिम मसुद्याचे काम युद्धपातळीवर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 15:45 IST

प्रकल्पाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी महापालिकेतील पाच अधिकाऱ्यांची समितीही यावेळी गठित करण्यात आली.

ठळक मुद्दे समांतर जलवाहिनी कंपनीला पुन्हा काम देण्यासाठी महापालिकेत पहिली बैठक घेण्यात आली. २ नोव्हेंबर रोजी मनपा आयुक्तांसमोर समांतरचा मसुदा ठेवण्यात येईल.

औरंगाबाद :  समांतर जलवाहिनी कंपनीला पुन्हा काम देण्यासाठी शुक्रवारी महापालिकेत पहिली बैठक घेण्यात आली. बैठकीत कंपनीने आपले भागीदार बदलण्याची मुभा द्यावी यावर सर्वाधिक भर दिला. प्रकल्प उभारण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाप्रमाणे कर्ज उभारण्यावर एकमत झाले. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सर्वप्रथम युद्धपातळीवर करण्याचेही बैठकीत निश्चित झाले. प्रकल्पाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी महापालिकेतील पाच अधिकाऱ्यांची समितीही यावेळी गठित करण्यात आली. २ नोव्हेंबर रोजी मनपा आयुक्तांसमोर समांतरचा मसुदा ठेवण्यात येईल.

समांतर जलवाहिनीसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्या. कंपनीसोबत महापालिकेने बसून छोट्या-मोठ्या त्रुटी दूर कराव्यात, अशी सूचना पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत केली होती. त्यानुसार मनपा पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी आज एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, सभापती राजू वैद्य, सभागृहनेते विकास जैन, शहर विकास आघाडीचे गटनेते गजानन बारवाल, मनपाचे अधिकारी, समांतरच्या कंपनीचे अधिकारी विजय गुप्ता, जीवन सोनवणे उपस्थित होते. 

बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी मनपावर लादलेल्या अटी-शर्र्तींचा पाढा वाचणे सुरू केले. एसपीएमएल कंपनीसोबत असलेल्या इतर भागीदार कंपन्यांपैकी काहींना बदलण्याची मुभा द्यावी, या मुद्यावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सर्वाधिक भर दिला. मनपातर्फे सांगण्यात आले की, यासाठी राज्याच्या विधि व न्याय विभाग, तसेच सरकारी अभियोक्ता यांचे अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यांनी होकार दिल्यास मनपाकडूनही हिरवा कंदिल राहील. योजनेतील संपूर्ण वाढीव खर्च राज्य शासन देणार आहे. त्यामुळे मूळ करारानुसारच भविष्यात काम होईल.

कंपनीला थकबाकीपोटी २० कोटी रुपये त्वरित द्यावेत. मुख्य जलवाहिनीचे काम सुरू झाल्यावर, योजनेचा आढावा घेऊन रक्कम देण्यात येईल. कर्ज रोखे उभे करण्यासाठी मनपाने मदत करावी. एसपीएमएल कंपनी डबघाईस आली आहे. बाजारात कोणीच कर्ज देणार नाही, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले. यावरही मनपा कोणतीही मालमत्ता अजिबात गहाण ठेवणार नाही. राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने कोणती पद्धत अवलंबली त्यानुसार कंपनीने कर्ज घ्यावे, असे बजावले.

मनपा अधिकाऱ्यांची समिती समांतरची योजना राबविण्यासाठी वन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे, पुढील मसुदा तयार करणे, कंपनीच्या अटी-शर्ती तपासणे यासाठी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त डॉ. दीपक कुलकर्णी, मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज, मुख्य लेधाधिकारी सुरेश केंद्रे, विधि सल्लागार अपर्णा थेटे यांची समिती गठित केली. तर समांतरच्या कंपनीने मनपाला बँक गॅरंटी द्यायची आहे, ती राष्ट्रीयीकृत बँकेचीच असावी, अशी अट महापालिकेने घातलेली आहे.

योजनेचा आर्थिक डोलाराकेंद्राचा निधी- १४३ कोटी ८६ लाखराज्याचा निधी- १७ कोटी २० लाखएकूण- १६१ कोटी २० लाखमनपाने खर्च केलेली रक्कम- २१ कोटी १४ लाखशिल्लक रक्कम- १४४ कोटी ६६ लाखयोजनेच्या निधीवर व्याज- १२७ कोटी ९ लाखएकूण- २६७ कोटी २५ लाखसुरक्षा ठेव- ९४ कोटी ५० लाखसुरक्षा ठेवीवरील व्याज- ११ कोटीउपलब्ध रक्कम- ३७३ कोटी २६ लाख 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका