शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

हा लढा धर्माच्या ठेकेदारांविरुद्ध - प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 18:25 IST

सेवेकऱ्यांच्या पदरात काहीच पडू नये, याची काळजी धर्माचे ठेकेदार घेत असतात.

ठळक मुद्देओबीसी हक्क परिषदेला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसादपरिषदेत नऊ ठराव मंजूर 

औरंगाबाद :  सेवेकरी असलेला ओबीसी समाज सत्ताधारी बनला पाहिजे. आलुतेदार- बलुतेदार सत्तेत आला पाहिजे. लहानातल्या लहान ओबीसी समाजाच्या पदरात काही तरी पडले पाहिजे. सेवेकऱ्यांच्या पदरात काहीच पडू नये, याची काळजी धर्माचे ठेकेदार घेत असतात. म्हणून हा लढा धर्माच्या ठेकेदारांविरुद्धचा आहे, असे स्पष्ट प्रतिपादन शुक्रवारी येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते तापडिया नाट्यमंदिरात आयोजित ओबीसी हक्कपरिषदेचे उद्घाटन करताना बोलत होते. २ आॅक्टोबरच्या जबिंदा लॉन्सवरील वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत अर्जुन महाराज पांचाळ यांनी भाषण केले. त्यानंतर त्यांना त्रास दिला, हा धागा पकडून ते बोलत होते.

यावेळी अर्जुन महाराज पांचाळ, हरिभाऊ भदे, सोपानराव डोईफोडे, प्रा. किशन चव्हाण, दादाराव पांचाळ, अंबादास रगडे, अमीन जामगावकर, टी.एस. चव्हाण, राम पेरकर, अ‍ॅड. महादेव आंधळे, ग.ह. राठोड, राजपालसिंग राठोड, प्रा. सुदाम चिंचाणे आदींची भाषणे झाली. अ‍ॅड. आंबेडकर यांच्या आधी अध्यक्षीय समारोपात  अ‍ॅड. शरदश्चंद्र वानखेडे यांनी नऊ ठराव वाचून दाखवले व ते मंजूर झाले. पंडित बोर्डे यांनी सूत्रसंचालन केले, तर विसपुते यांनी आभार मानले.यावेळी अ‍ॅड. बी.एच. गायकवाड यांनी वकिलांच्या एका शिष्टमंडळासह निवेदन सादर केले. अ‍ॅड. आंबेडकर यांचा सत्कार एका मोठ्या पुष्पहारात करण्यात आला. सभास्थानी ते येताच फटाक्यांची आतषबाजी केली. भारत खोगरे, प्रकाश विसपुते, दीपक राऊत, अब्दुल रऊफ, सुभाष वानखेडे, आजीनाथ जाधव, सुरेश चव्हाण आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. मंचावर अमित भुईगळ, प्रा. माणिक कांबळे, रविकांत राठोड, मनोज घोडके, निशांत पवार  आदी उपस्थित होते.

मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीदेवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नसल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, मंडल आयोगाने जो एसईबीसी उभा केला, तो गु्रप १ आणि देवेंद्र फडणवीस यांनी जो एसईबीसी मराठा (कुणबी) उभा केला, तो ग्रुप २, असे वर्गीकरण करून मराठा समाजाला आरक्षण दिले असते, तर ते कदाचित न्यायालयात टिकले असते. मात्र, फडणवीसांनी तसे केले नाही. त्यांची नियत साफ दिसत नाही. ते फसवेगिरी करीत आहेत. मराठा आरक्षणामुळे आपले आरक्षण संपले, अशी भावना आता ओबीसींमध्ये निर्माण  झाली आहे. ओबीसी नेत्यांच्या म्हणण्यात मला तथ्य दिसत आहे, अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरOBCअन्य मागासवर्गीय जातीAurangabadऔरंगाबाद