शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

हा लढा धर्माच्या ठेकेदारांविरुद्ध - प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 18:25 IST

सेवेकऱ्यांच्या पदरात काहीच पडू नये, याची काळजी धर्माचे ठेकेदार घेत असतात.

ठळक मुद्देओबीसी हक्क परिषदेला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसादपरिषदेत नऊ ठराव मंजूर 

औरंगाबाद :  सेवेकरी असलेला ओबीसी समाज सत्ताधारी बनला पाहिजे. आलुतेदार- बलुतेदार सत्तेत आला पाहिजे. लहानातल्या लहान ओबीसी समाजाच्या पदरात काही तरी पडले पाहिजे. सेवेकऱ्यांच्या पदरात काहीच पडू नये, याची काळजी धर्माचे ठेकेदार घेत असतात. म्हणून हा लढा धर्माच्या ठेकेदारांविरुद्धचा आहे, असे स्पष्ट प्रतिपादन शुक्रवारी येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते तापडिया नाट्यमंदिरात आयोजित ओबीसी हक्कपरिषदेचे उद्घाटन करताना बोलत होते. २ आॅक्टोबरच्या जबिंदा लॉन्सवरील वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत अर्जुन महाराज पांचाळ यांनी भाषण केले. त्यानंतर त्यांना त्रास दिला, हा धागा पकडून ते बोलत होते.

यावेळी अर्जुन महाराज पांचाळ, हरिभाऊ भदे, सोपानराव डोईफोडे, प्रा. किशन चव्हाण, दादाराव पांचाळ, अंबादास रगडे, अमीन जामगावकर, टी.एस. चव्हाण, राम पेरकर, अ‍ॅड. महादेव आंधळे, ग.ह. राठोड, राजपालसिंग राठोड, प्रा. सुदाम चिंचाणे आदींची भाषणे झाली. अ‍ॅड. आंबेडकर यांच्या आधी अध्यक्षीय समारोपात  अ‍ॅड. शरदश्चंद्र वानखेडे यांनी नऊ ठराव वाचून दाखवले व ते मंजूर झाले. पंडित बोर्डे यांनी सूत्रसंचालन केले, तर विसपुते यांनी आभार मानले.यावेळी अ‍ॅड. बी.एच. गायकवाड यांनी वकिलांच्या एका शिष्टमंडळासह निवेदन सादर केले. अ‍ॅड. आंबेडकर यांचा सत्कार एका मोठ्या पुष्पहारात करण्यात आला. सभास्थानी ते येताच फटाक्यांची आतषबाजी केली. भारत खोगरे, प्रकाश विसपुते, दीपक राऊत, अब्दुल रऊफ, सुभाष वानखेडे, आजीनाथ जाधव, सुरेश चव्हाण आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. मंचावर अमित भुईगळ, प्रा. माणिक कांबळे, रविकांत राठोड, मनोज घोडके, निशांत पवार  आदी उपस्थित होते.

मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीदेवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नसल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, मंडल आयोगाने जो एसईबीसी उभा केला, तो गु्रप १ आणि देवेंद्र फडणवीस यांनी जो एसईबीसी मराठा (कुणबी) उभा केला, तो ग्रुप २, असे वर्गीकरण करून मराठा समाजाला आरक्षण दिले असते, तर ते कदाचित न्यायालयात टिकले असते. मात्र, फडणवीसांनी तसे केले नाही. त्यांची नियत साफ दिसत नाही. ते फसवेगिरी करीत आहेत. मराठा आरक्षणामुळे आपले आरक्षण संपले, अशी भावना आता ओबीसींमध्ये निर्माण  झाली आहे. ओबीसी नेत्यांच्या म्हणण्यात मला तथ्य दिसत आहे, अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरOBCअन्य मागासवर्गीय जातीAurangabadऔरंगाबाद