शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

आठशे प्रकरणांमध्ये फसवणूक

By admin | Updated: May 7, 2014 00:11 IST

औरंगाबाद शेतीच्या खरेदी- विक्रीचे व्यवहार करताना जलसंपदा विभागाचे बोगस प्रमाणपत्र जोडून शासनाचा लाखो रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडविला गेल्याचे तपासाअंती उघडकीस आले आहे.

सुनील कच्छवे

औरंगाबाद शेतीच्या खरेदी- विक्रीचे व्यवहार करताना जलसंपदा विभागाचे बोगस प्रमाणपत्र जोडून शासनाचा लाखो रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडविला गेल्याचे तपासाअंती उघडकीस आले आहे. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक खात्याने अशा तब्बल ८०० व्यवहारांतील व्यक्तींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश स्थानिक कार्यालयास दिले आहेत. त्यानंतर जिल्हा मुद्रांक कार्यालयाने या कारवाईचा प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी तो जिल्हाधिकार्‍यांकडे नुकताच पाठविला आहे. फसवणुकीची ही सर्व प्रकरणे एकट्या वैजापूर तालुक्यातील आहेत. २००६ ते २०११ या काळात हे व्यवहार झालेले असून त्यातून शासनाचा सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडाला आहे. आपल्या शेतजमिनीला सिंचन प्रकल्पांचा लाभ मिळत नसल्याचे बोगस प्रमाणपत्र जोडून हे सर्व व्यवहार करण्यात आले आहेत. सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणार्‍या जमिनीला बागायती समजले जाते. त्यामुळे त्यांचा शासकीय दर (रेडीरेकनर) जास्त असतो. परिणामी खरेदी-विक्रीचा व्यवहार करताना त्याच तुलनेत मुद्रांक शुल्क भरावे लागते; मात्र अनेक वेळा लाभक्षेत्रात असूनही काही जमिनींना कॅनॉलअभावी किंवा इतर कारणांनी पाणी मिळत नाही. तेव्हा अशा जमिनींना मागणी केल्यास पाटबंधारे विभागाकडून लाभ मिळत नसल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र जोडल्यास संबंधित शेती जिरायती गृहीत धरली जाते. तसे झाल्यास तिची शासकीय किंमत कमी धरून मुद्रांक शुल्कही कमी भरावे लागते. नेमकी हीच बाब हेरून वैजापूर तालुक्यात अनेकांनी स्वत:च असे बोगस प्रमाणपत्र बनवून त्याआधारे जमिनींचे व्यवहार केले.