शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

औरंगाबाद येथे महिन्यातील पाचवा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:16 IST

मृत्यूचा सापळा बनलेल्या बीड बायपासवर अपघाताची मालिका सुरूच असून, भरधाव हायवा ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. अब्दुल अजीम अब्दुल रज्जाक (३२, रा. बाबर कॉलनी, कटकटगेट), असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या आठ महिन्यांतील हा १० वा बळी, तर आॅगस्ट महिन्यातील पाचवा बळी ठरला आहे.

ठळक मुद्देबीड बायपास : भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; सर्व्हिस रोडबाबत जाग येईना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मृत्यूचा सापळा बनलेल्या बीड बायपासवर अपघाताची मालिका सुरूच असून, भरधाव हायवा ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. अब्दुल अजीम अब्दुल रज्जाक (३२, रा. बाबर कॉलनी, कटकटगेट), असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या आठ महिन्यांतील हा १० वा बळी, तर आॅगस्ट महिन्यातील पाचवा बळी ठरला आहे.अब्दुल अजीम हा बायपासवरील एका गॅरेजवर मेकॅनिकचे काम करीत होता. सकाळी बदनापूर येथे एक गाडी बंद पडल्याने तिच्या दुरुस्तीसाठी अजीम गॅरेजवरून साहित्य घेऊन दुचाकी (एमएच-२० पीई १३१३) वर बदनापूरच्या दिशेने निघाला होता. देवळाई चौकापासून काही अंतरावर असताना भरधाव आलेल्या हायवा (एमएच ४४ ६०९) ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात चालक खाली पडून चाकाखाली चिरडला गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. डोक्याचा चेंदामेंदा होऊन रस्त्यावर मांसाचे तुकडेविखुरले होते. अपघाताचे हृदयद्रावक चित्र पाहून नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे तसेच त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक शाखेचे निरीक्षक भारत काकडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने अब्दुल अजीमचा मृतदेह पोलीस व्हॅनमधून घाटी रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला.बायपासवर महानुभाव आश्रम ते देवळाई चौकात किरकोळ अपघाताची नोंद होत नाही. परंतु गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या १२ घटना घडल्या, तर काही किरकोळ; परंतु १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.निष्पाप नागरिकांचे किती जीव घेणारबायपासवर वाहनांची संख्या वाढली असून, वाहतूक शाखेने पोलीस यंत्रणा कामाला लावली असली तरी अपघाताच्या मालिकेत खंड पडलेला नाही. जानेवारी ते आॅगस्टदरम्यान १० जणांना ट्रकने ‘यमसदनी’ पाठविले आहे. याला जबाबदार कोण, असा सवालदेखील परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.आमदार संजय शिरसाट, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी बायपासची पाहणी करून वाहतुकीचा आढावा घेतला. पोलिसांना सुरक्षिततेविषयी सूचना करण्यात आल्या. मनपाचे अधिकारी ए. बी. देशमुख व सी. एम. अभंग यांनाही आयुक्तांनी सर्व्हिस रोडच्या कामाबाबत विचारणा केली.युवक धावले मदतीलाअपघाताचे वृत्त कळताच देवळाई परिसरातील युवक वजीर पटेल, शफिक पटेल हे घटनास्थळी धावले.अजीमच्या शरीराचे रस्त्यावर विखुरलेले तुकडे उचलून घाटी रुग्णालयात पाठविण्यासाठी पोहेकॉ. शेषराव चव्हाण यांना या युवकांनी मदत केली.अपघातामुळे रस्त्यावर अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. रेणुकामाता कमानीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.विरुद्ध दिशेने जाणाºयांवर कडक कारवाईस्थानिक नागरिकांनाच सोबत घेऊन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त हनुमंत भापकर, निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, भारत काकडे यांनी बायपासवरील अतिक्रमण आणि वाहतुकीची प्रत्यक्ष पाहणी केली. जालना रोडवर ज्याप्रमाणे समुपदेशन केले जाते, त्याप्रमाणे देवळाई चौकातही होते, अपघाताची कारणे शोधण्यासाठी विरुद्ध दिशेने जाणाºयांना ८ तास बसवून ठेवून समुपदेशनाची शिक्षा देण्यात येणार आहे.शिष्टमंडळाला दिलेहोते आश्वासनसातारा-देवळाईतील नागरिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन अपघात टाळण्याविषयी म्हणणे मांडले होते. त्यामुळे चिरंजीव प्रसाद स्वत: बायपासवर शुक्रवारी पाहणी करून अपघात टाळण्याविषयीच्या उपाययोजना शोधण्यासाठी आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू