शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

औरंगाबाद येथे महिन्यातील पाचवा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:16 IST

मृत्यूचा सापळा बनलेल्या बीड बायपासवर अपघाताची मालिका सुरूच असून, भरधाव हायवा ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. अब्दुल अजीम अब्दुल रज्जाक (३२, रा. बाबर कॉलनी, कटकटगेट), असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या आठ महिन्यांतील हा १० वा बळी, तर आॅगस्ट महिन्यातील पाचवा बळी ठरला आहे.

ठळक मुद्देबीड बायपास : भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; सर्व्हिस रोडबाबत जाग येईना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मृत्यूचा सापळा बनलेल्या बीड बायपासवर अपघाताची मालिका सुरूच असून, भरधाव हायवा ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. अब्दुल अजीम अब्दुल रज्जाक (३२, रा. बाबर कॉलनी, कटकटगेट), असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या आठ महिन्यांतील हा १० वा बळी, तर आॅगस्ट महिन्यातील पाचवा बळी ठरला आहे.अब्दुल अजीम हा बायपासवरील एका गॅरेजवर मेकॅनिकचे काम करीत होता. सकाळी बदनापूर येथे एक गाडी बंद पडल्याने तिच्या दुरुस्तीसाठी अजीम गॅरेजवरून साहित्य घेऊन दुचाकी (एमएच-२० पीई १३१३) वर बदनापूरच्या दिशेने निघाला होता. देवळाई चौकापासून काही अंतरावर असताना भरधाव आलेल्या हायवा (एमएच ४४ ६०९) ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात चालक खाली पडून चाकाखाली चिरडला गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. डोक्याचा चेंदामेंदा होऊन रस्त्यावर मांसाचे तुकडेविखुरले होते. अपघाताचे हृदयद्रावक चित्र पाहून नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे तसेच त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक शाखेचे निरीक्षक भारत काकडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने अब्दुल अजीमचा मृतदेह पोलीस व्हॅनमधून घाटी रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला.बायपासवर महानुभाव आश्रम ते देवळाई चौकात किरकोळ अपघाताची नोंद होत नाही. परंतु गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या १२ घटना घडल्या, तर काही किरकोळ; परंतु १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.निष्पाप नागरिकांचे किती जीव घेणारबायपासवर वाहनांची संख्या वाढली असून, वाहतूक शाखेने पोलीस यंत्रणा कामाला लावली असली तरी अपघाताच्या मालिकेत खंड पडलेला नाही. जानेवारी ते आॅगस्टदरम्यान १० जणांना ट्रकने ‘यमसदनी’ पाठविले आहे. याला जबाबदार कोण, असा सवालदेखील परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.आमदार संजय शिरसाट, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी बायपासची पाहणी करून वाहतुकीचा आढावा घेतला. पोलिसांना सुरक्षिततेविषयी सूचना करण्यात आल्या. मनपाचे अधिकारी ए. बी. देशमुख व सी. एम. अभंग यांनाही आयुक्तांनी सर्व्हिस रोडच्या कामाबाबत विचारणा केली.युवक धावले मदतीलाअपघाताचे वृत्त कळताच देवळाई परिसरातील युवक वजीर पटेल, शफिक पटेल हे घटनास्थळी धावले.अजीमच्या शरीराचे रस्त्यावर विखुरलेले तुकडे उचलून घाटी रुग्णालयात पाठविण्यासाठी पोहेकॉ. शेषराव चव्हाण यांना या युवकांनी मदत केली.अपघातामुळे रस्त्यावर अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. रेणुकामाता कमानीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.विरुद्ध दिशेने जाणाºयांवर कडक कारवाईस्थानिक नागरिकांनाच सोबत घेऊन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त हनुमंत भापकर, निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, भारत काकडे यांनी बायपासवरील अतिक्रमण आणि वाहतुकीची प्रत्यक्ष पाहणी केली. जालना रोडवर ज्याप्रमाणे समुपदेशन केले जाते, त्याप्रमाणे देवळाई चौकातही होते, अपघाताची कारणे शोधण्यासाठी विरुद्ध दिशेने जाणाºयांना ८ तास बसवून ठेवून समुपदेशनाची शिक्षा देण्यात येणार आहे.शिष्टमंडळाला दिलेहोते आश्वासनसातारा-देवळाईतील नागरिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन अपघात टाळण्याविषयी म्हणणे मांडले होते. त्यामुळे चिरंजीव प्रसाद स्वत: बायपासवर शुक्रवारी पाहणी करून अपघात टाळण्याविषयीच्या उपाययोजना शोधण्यासाठी आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू