शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद येथे महिन्यातील पाचवा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:16 IST

मृत्यूचा सापळा बनलेल्या बीड बायपासवर अपघाताची मालिका सुरूच असून, भरधाव हायवा ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. अब्दुल अजीम अब्दुल रज्जाक (३२, रा. बाबर कॉलनी, कटकटगेट), असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या आठ महिन्यांतील हा १० वा बळी, तर आॅगस्ट महिन्यातील पाचवा बळी ठरला आहे.

ठळक मुद्देबीड बायपास : भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; सर्व्हिस रोडबाबत जाग येईना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मृत्यूचा सापळा बनलेल्या बीड बायपासवर अपघाताची मालिका सुरूच असून, भरधाव हायवा ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. अब्दुल अजीम अब्दुल रज्जाक (३२, रा. बाबर कॉलनी, कटकटगेट), असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या आठ महिन्यांतील हा १० वा बळी, तर आॅगस्ट महिन्यातील पाचवा बळी ठरला आहे.अब्दुल अजीम हा बायपासवरील एका गॅरेजवर मेकॅनिकचे काम करीत होता. सकाळी बदनापूर येथे एक गाडी बंद पडल्याने तिच्या दुरुस्तीसाठी अजीम गॅरेजवरून साहित्य घेऊन दुचाकी (एमएच-२० पीई १३१३) वर बदनापूरच्या दिशेने निघाला होता. देवळाई चौकापासून काही अंतरावर असताना भरधाव आलेल्या हायवा (एमएच ४४ ६०९) ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात चालक खाली पडून चाकाखाली चिरडला गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. डोक्याचा चेंदामेंदा होऊन रस्त्यावर मांसाचे तुकडेविखुरले होते. अपघाताचे हृदयद्रावक चित्र पाहून नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे तसेच त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक शाखेचे निरीक्षक भारत काकडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने अब्दुल अजीमचा मृतदेह पोलीस व्हॅनमधून घाटी रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला.बायपासवर महानुभाव आश्रम ते देवळाई चौकात किरकोळ अपघाताची नोंद होत नाही. परंतु गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या १२ घटना घडल्या, तर काही किरकोळ; परंतु १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.निष्पाप नागरिकांचे किती जीव घेणारबायपासवर वाहनांची संख्या वाढली असून, वाहतूक शाखेने पोलीस यंत्रणा कामाला लावली असली तरी अपघाताच्या मालिकेत खंड पडलेला नाही. जानेवारी ते आॅगस्टदरम्यान १० जणांना ट्रकने ‘यमसदनी’ पाठविले आहे. याला जबाबदार कोण, असा सवालदेखील परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.आमदार संजय शिरसाट, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी बायपासची पाहणी करून वाहतुकीचा आढावा घेतला. पोलिसांना सुरक्षिततेविषयी सूचना करण्यात आल्या. मनपाचे अधिकारी ए. बी. देशमुख व सी. एम. अभंग यांनाही आयुक्तांनी सर्व्हिस रोडच्या कामाबाबत विचारणा केली.युवक धावले मदतीलाअपघाताचे वृत्त कळताच देवळाई परिसरातील युवक वजीर पटेल, शफिक पटेल हे घटनास्थळी धावले.अजीमच्या शरीराचे रस्त्यावर विखुरलेले तुकडे उचलून घाटी रुग्णालयात पाठविण्यासाठी पोहेकॉ. शेषराव चव्हाण यांना या युवकांनी मदत केली.अपघातामुळे रस्त्यावर अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. रेणुकामाता कमानीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.विरुद्ध दिशेने जाणाºयांवर कडक कारवाईस्थानिक नागरिकांनाच सोबत घेऊन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त हनुमंत भापकर, निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, भारत काकडे यांनी बायपासवरील अतिक्रमण आणि वाहतुकीची प्रत्यक्ष पाहणी केली. जालना रोडवर ज्याप्रमाणे समुपदेशन केले जाते, त्याप्रमाणे देवळाई चौकातही होते, अपघाताची कारणे शोधण्यासाठी विरुद्ध दिशेने जाणाºयांना ८ तास बसवून ठेवून समुपदेशनाची शिक्षा देण्यात येणार आहे.शिष्टमंडळाला दिलेहोते आश्वासनसातारा-देवळाईतील नागरिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन अपघात टाळण्याविषयी म्हणणे मांडले होते. त्यामुळे चिरंजीव प्रसाद स्वत: बायपासवर शुक्रवारी पाहणी करून अपघात टाळण्याविषयीच्या उपाययोजना शोधण्यासाठी आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू