शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

औरंगाबाद येथे महिन्यातील पाचवा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:16 IST

मृत्यूचा सापळा बनलेल्या बीड बायपासवर अपघाताची मालिका सुरूच असून, भरधाव हायवा ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. अब्दुल अजीम अब्दुल रज्जाक (३२, रा. बाबर कॉलनी, कटकटगेट), असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या आठ महिन्यांतील हा १० वा बळी, तर आॅगस्ट महिन्यातील पाचवा बळी ठरला आहे.

ठळक मुद्देबीड बायपास : भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; सर्व्हिस रोडबाबत जाग येईना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मृत्यूचा सापळा बनलेल्या बीड बायपासवर अपघाताची मालिका सुरूच असून, भरधाव हायवा ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. अब्दुल अजीम अब्दुल रज्जाक (३२, रा. बाबर कॉलनी, कटकटगेट), असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या आठ महिन्यांतील हा १० वा बळी, तर आॅगस्ट महिन्यातील पाचवा बळी ठरला आहे.अब्दुल अजीम हा बायपासवरील एका गॅरेजवर मेकॅनिकचे काम करीत होता. सकाळी बदनापूर येथे एक गाडी बंद पडल्याने तिच्या दुरुस्तीसाठी अजीम गॅरेजवरून साहित्य घेऊन दुचाकी (एमएच-२० पीई १३१३) वर बदनापूरच्या दिशेने निघाला होता. देवळाई चौकापासून काही अंतरावर असताना भरधाव आलेल्या हायवा (एमएच ४४ ६०९) ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात चालक खाली पडून चाकाखाली चिरडला गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. डोक्याचा चेंदामेंदा होऊन रस्त्यावर मांसाचे तुकडेविखुरले होते. अपघाताचे हृदयद्रावक चित्र पाहून नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे तसेच त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक शाखेचे निरीक्षक भारत काकडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने अब्दुल अजीमचा मृतदेह पोलीस व्हॅनमधून घाटी रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला.बायपासवर महानुभाव आश्रम ते देवळाई चौकात किरकोळ अपघाताची नोंद होत नाही. परंतु गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या १२ घटना घडल्या, तर काही किरकोळ; परंतु १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.निष्पाप नागरिकांचे किती जीव घेणारबायपासवर वाहनांची संख्या वाढली असून, वाहतूक शाखेने पोलीस यंत्रणा कामाला लावली असली तरी अपघाताच्या मालिकेत खंड पडलेला नाही. जानेवारी ते आॅगस्टदरम्यान १० जणांना ट्रकने ‘यमसदनी’ पाठविले आहे. याला जबाबदार कोण, असा सवालदेखील परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.आमदार संजय शिरसाट, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी बायपासची पाहणी करून वाहतुकीचा आढावा घेतला. पोलिसांना सुरक्षिततेविषयी सूचना करण्यात आल्या. मनपाचे अधिकारी ए. बी. देशमुख व सी. एम. अभंग यांनाही आयुक्तांनी सर्व्हिस रोडच्या कामाबाबत विचारणा केली.युवक धावले मदतीलाअपघाताचे वृत्त कळताच देवळाई परिसरातील युवक वजीर पटेल, शफिक पटेल हे घटनास्थळी धावले.अजीमच्या शरीराचे रस्त्यावर विखुरलेले तुकडे उचलून घाटी रुग्णालयात पाठविण्यासाठी पोहेकॉ. शेषराव चव्हाण यांना या युवकांनी मदत केली.अपघातामुळे रस्त्यावर अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. रेणुकामाता कमानीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.विरुद्ध दिशेने जाणाºयांवर कडक कारवाईस्थानिक नागरिकांनाच सोबत घेऊन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त हनुमंत भापकर, निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, भारत काकडे यांनी बायपासवरील अतिक्रमण आणि वाहतुकीची प्रत्यक्ष पाहणी केली. जालना रोडवर ज्याप्रमाणे समुपदेशन केले जाते, त्याप्रमाणे देवळाई चौकातही होते, अपघाताची कारणे शोधण्यासाठी विरुद्ध दिशेने जाणाºयांना ८ तास बसवून ठेवून समुपदेशनाची शिक्षा देण्यात येणार आहे.शिष्टमंडळाला दिलेहोते आश्वासनसातारा-देवळाईतील नागरिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन अपघात टाळण्याविषयी म्हणणे मांडले होते. त्यामुळे चिरंजीव प्रसाद स्वत: बायपासवर शुक्रवारी पाहणी करून अपघात टाळण्याविषयीच्या उपाययोजना शोधण्यासाठी आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू