शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

शेतात पाणी घुसल्यावरून तुंबळ हाणामारी; सात जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 18:36 IST

Crime News in Aurangabad : कापसाच्या शेतात पाणी शिरल्याने झाला वाद

वैजापूर ( औरंगाबाद ) : शेतात पाणी घुसल्याचे कारण विचारल्याचा राग आल्याने एका कुटुंबावर हल्ला केल्याची घटना तालुक्यातील आलापुरवाडी येथे रविवारी घडली. या घटनेत सात जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

आलापूरवाडी येथील रहिवासी भैय्यासाहेब पोपट पगारे यांची १६२४ गट नंबर मध्ये शेती आहे. त्यांनी त्यांच्या शेतात कपाशीची लागवड केली आहे. त्यांच्या शेतात बाबासाहेब ताराचंद पगारे यांच्या गट नंबर १५८२ मधील शेतातील पाणी आले. हे पाणी कसे आले ? याचे कारण भैय्यासाहेब पगारे यांनी विचारले असता बाबासाहेब पगारे यांच्या कुटुंबीयांनी भैय्यासाहेब यांच्या कुटुंबीयांवर काठी, कुऱ्हाड व गजाने जोरदार हल्ला केला.

या हल्ल्यात भैय्यासाहेब पगारे यांच्या सह अशोक पगारे, आप्पासाहेब पोपट पगारे, देविदास संभालाल पगारे, संदीप अशोक पगारे, सचिन अशोक पगारे, आजीनाथ देविदास पगारे हे सात जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी अशोक पोपट पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून बाबासाहेब ताराचंद पगारे, विशाल बाबासाहेब पगारे, सागर बाबासाहेब पगारे, करण बाबासाहेब पगारे, अर्जून बाबासाहेब पगारे या पाच जणांविरुद्ध शिवूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार ए.जी. नागटिळक हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद