शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

रेल्वे मालधक्क्यावर भिजली खताची शेकडो पोती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:59 IST

शुल्क वाचविण्यासाठी थेट उघड्यावर माल उरविण्याचा प्रकार होतो

ठळक मुद्देरेल्वेस्टेशनवरील मालधक्क्यावर प्रत्येकी ४२ डब्यांच्या दोन मालगाड्यांतून आले खत

औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवरील मालधक्क्यावर रेल्वेने आलेली खताची शेकडो पोती रविवारी पडलेल्या पावसात भिजली. उघड्यावर पडलेली खताची पोती वाचविण्यासाठी ताडपत्री टाकण्यात आली. मात्र, तोपर्यंत अनेक पोती भिजण्यापासून वाचू शकली नाहीत. 

रेल्वेस्टेशनवरील मालधक्क्यावर प्रत्येकी ४२ डब्यांच्या दोन मालगाड्यांतून अडीच हजार टन पोटॅश आणि युरिया खताची पोती दाखल झाली होती. मालगाडीतील ही खताची पोती उघड्यावर उतरविण्यात आली होती. रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक पावासाने हजेरी लावली. पावसाला सुरुवात होताच ही पोती वाचविण्यासाठी ताडपत्री टाकण्यासाठी एकच धावपळ करण्यात आली; परंतु तोपर्यंत अनेक पोती पावसाच्या पाण्यात भिजून गेली. पाऊस थांबल्यानंतरही या ठिकाणी साचलेल्या पाण्यातच पोती पडून असलेले चित्र पाहायला मिळाले. 

दुष्काळामुळे शेतकरी आधीच संकटात सापडलेला आहे. किमान यंदातरी चांगला पाऊस पडेल आणि संकट दूर होईल, अशी आशा शेतकरी लावून बसले आहेत. पेरणीची तयारी केली जात आहे. मात्र, पेरणीपूर्वीच पहिल्याच जोरदार पावसात खत भिजण्याचा प्रकार झाला. मालगाडीतील माल वेळीच उतरविला नाही तर प्रत्येक पोत्यापोटी रेल्वेला शुल्क मोजावे लागते. हे शुल्क वाचविण्यासाठी थेट उघड्यावर माल उरविण्याचा प्रकार होतो आणि त्यातून खताची पोती भिजण्याचा प्रकार होतो. 

दरवर्षी होतो प्रकारपावसात खत भिजण्याचा प्रकार हा पहिल्यांदाच झालेला नाही. प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला हा प्रकार होत आहे. मात्र, त्यानंतरही रेल्वे प्रशासन आणि मालवाहतूकदार खबरदारीचे पाऊल उचलण्यास तयार नाहीत. मालधक्क्यावर सध्या ११ मालडब्यांच्या क्षमतेचे शेड आहे. हे शेड वाढविण्याची मागणी होत आहे. मात्र, त्याकडे सतत दुर्लक्ष होत आहे.

रेल्वेचे हात वरखताची पोती भिजण्याविषयी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, यासंदर्भात रेल्वेची जबाबदारी नसते. माल मागविणाऱ्याकडून खबरदारी घेतली पाहिजे, असे म्हणत त्यांनी हात वर केले. खताची पोती भिजली तरी काहीही परिणाम होत नसल्याचा दावा मालवाहतूकदारांकडून करण्यात आला.

टॅग्स :RainपाऊसAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनAgriculture Sectorशेती क्षेत्र