शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

पशुपालकांनो घाबरू नका, काळजी घ्या! ‘लम्पी’चा नवा स्ट्रेन, बाधा फक्त गोवंश जनावरांनाच

By विजय सरवदे | Updated: October 8, 2022 20:00 IST

साथ आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सक्रीय

औरंगाबाद : ‘लम्पी’ हा केवळ गोवंश जनावरांनाच होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा आजार जनावरांपासून माणसाला संक्रमित होत नाही. आतापर्यंत या रोगामुळे जिल्ह्यातील ७७ जनावरे मृत्युमुखी पडली असून ही साथ आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभाग कसोसीने प्रयत्न करीत आहे. हा आजार फक्त गाय, बैल किंवा वासरांनाच होतो. म्हैस, शेळी, मेंढी किंवा अन्य पाळीव जनावरांना होत नाही. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहन जि.प. पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

या आजारात गोवंश जनावरांना अगोदर ताप येतो. त्यांचे खाण्याचे प्रमाण कमी होते. दूध देणाऱ्या जनावरांचे दूध कमी होते. तसेच कष्टाळू म्हणजे बैलासारख्या प्राण्यांना अशक्तपणा येतो. अनेकदा जनावरे लंगडतात. त्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर जनावरांच्या अंगावर मोठ्या गाठी येतात. या गाठी कासेला मानेवरती अशा मऊ ठिकाणी येतात. अनेकदा त्या सर्वांगावरही पसरू शकतात.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी सांगितले की, प्रशासनाने तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तयार केली असून लम्पीग्रस्त जनावरांवर त्वरित उपचार व लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत चार लाख ४६ हजार ९७८ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. या साथीचा संसर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पसरला असून आतापर्यंत १,१४० जनावरे बाधित झाली असून ७७ जनावरे दगावली आहेत. ६६० जनावरे या आजारातून बरी झालेली असली, तरी अजून ४०३ जनावरे या आजाराशी झुंज देत आहेत.

‘लम्पी’चा नवा स्ट्रेनसन २०२० मध्येदेखील या आजाराने डोके वर काढले होते. तेव्हा ‘लॉकडाऊन’चा काळ असल्यामुळे जनावरांचा बाहेर मुक्त वावर कमी होता. तेव्हा युद्धपाळीवर लसीकरण मोहीम राबविल्यामुळे साथ आटोक्यात आली. २५० ते ३०० नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविले होते. ते सर्व निगेटीव्ह आले होते. आता ‘लम्पी’ने स्ट्रेन बदलला आहे. जनावरांचे बाजार बंद केले असले तरी त्यांचा वावर बंद झालेला नाही. त्यामुळे यावेळी जनावरे बाधीत होत्याचे प्रमाण वाढलेला आहे.

फक्त गोवंश पशूच बाधित कसेयासंदर्भात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी सांगितले की, हा आजार फक्त गोवंश संवर्गातील जनावरांनाच होतो. कारण, या संवर्गातील जनावरांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असते. अन्य जनावरांच्या तुलनेत या जनावरांची कातडी हलकी व मऊ असते. त्यामुळे विषाणूंचा शिरकाव या जनावरांमध्ये जलदगतीने होतो. त्यामुळे गोवंश वगळता अन्य जनावरांना हा आजार होत नाही.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद