शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
4
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
5
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
6
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
7
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
8
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
9
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
10
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
11
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
12
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
13
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
14
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
15
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
16
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
17
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
18
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
19
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
20
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

वडिलांची शेवटची इच्छा केली पूर्ण; शेतकरी कुटुंबातील तरुण बनला न्यायाधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 2:42 PM

नीलेश पाटील हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन २०१९ मध्ये घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेत ११६ व्या रँकमध्ये उत्तीर्ण झाले होते.

ठळक मुद्देपरिस्थितीमुळे वकिलीसह शेती केलीधुळे जिल्हा न्यायालयात करणार न्यायदानगावातील सुपुत्र न्यायाधीश बनल्याने ग्रामस्थ आनंदी

कायगाव ( औरंगाबाद ) : हलाखीच्या परिस्थितीत आयुष्यातील ध्येय निश्चित करून गळनिंब येथील शेतकरी कुटुंबातील तरुणाने परिसरातील पहिला न्यायाधीश बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ॲड. नीलेश लक्ष्मणराव दहातोंडे पाटील यांनी यश संपादन करून दिवाणी न्यायाधीशपद मिळविले. त्यांची धुळे जिल्हा न्यायालयात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. ३१ जुलैला त्यांनी आपला परिविक्षाधीन पदभार स्वीकारला.

नीलेश पाटील हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन २०१९ मध्ये घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेत ११६ व्या रँकमध्ये उत्तीर्ण झाले होते. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पाटील यांची जिल्हा न्यायालय, धुळे येथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून, त्यांनी त्याच दिवशी आपल्या परिविक्षाधीन पदाची सुरुवात केली.

नीलेश पाटील यांचे वडील लक्ष्मणराव दहातोंडे पाटील हे जायकवाडी पाटबंधारे विभागात नोकरीला होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जालना जिल्ह्यातील तीर्थपुरीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी परभणीत घेतले, तर बी.ए.ची पदवी गंगापूर येथील मुक्तानंद महाविद्यालयात मिळविली. वकिलीच्या शिक्षणासाठी त्यांनी औरंगाबाद गाठले. येथील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात वकिलीचे शिक्षण २००९ मध्ये पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी औरंगाबादच्या जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर परिश्रम घेत त्यांनी परीक्षा उत्तीर्ण करून न्यायाधीशपद मिळविले. गावातील सुपुत्र न्यायाधीश बनल्याने ग्रामस्थ आनंदी असून, कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर ग्रामस्थ नीलेश दहातोंडे पाटील यांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करणार असल्याचे गळनिंबचे शिक्षक राजेश हिवाळे, बलराम नवथर, अप्पासाहेब पाचपुते, नानासाहेब दहातोंडे, डॉ. भगवान सटाले, कल्याण गायकवाड, राहुल सटाले, तुकाराम सटाले, कानिफनाथ उगले, भागीनाथ गोरे, आदींनी सांगितले.

वडिलांच्या निधनानंतर सांभाळली कुटुंबाची जबाबदारी२०११ मध्ये नीलेश पाटील यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यामुळे त्यांना कुटुंबात परतावे लागले. घरची जबाबदारी घेत त्यांनी गंगापूरच्या न्यायालयात व्यवसाय सुरू केला. पर्यायाने घरची शेतीही करावी लागली; मात्र वडिलांची इच्छा होती, आपल्या मुलाने न्यायाधीश बनावे. त्यासाठी नीलेश यांचे प्रयत्न सुरूच होते. अखेर कठोर परिश्रम आणि कोणत्याही क्लासेसच्या मदतीशिवाय त्यांनी यश मिळविले.

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी