शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

वडिलांची शेवटची इच्छा केली पूर्ण; शेतकरी कुटुंबातील तरुण बनला न्यायाधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 14:48 IST

नीलेश पाटील हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन २०१९ मध्ये घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेत ११६ व्या रँकमध्ये उत्तीर्ण झाले होते.

ठळक मुद्देपरिस्थितीमुळे वकिलीसह शेती केलीधुळे जिल्हा न्यायालयात करणार न्यायदानगावातील सुपुत्र न्यायाधीश बनल्याने ग्रामस्थ आनंदी

कायगाव ( औरंगाबाद ) : हलाखीच्या परिस्थितीत आयुष्यातील ध्येय निश्चित करून गळनिंब येथील शेतकरी कुटुंबातील तरुणाने परिसरातील पहिला न्यायाधीश बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ॲड. नीलेश लक्ष्मणराव दहातोंडे पाटील यांनी यश संपादन करून दिवाणी न्यायाधीशपद मिळविले. त्यांची धुळे जिल्हा न्यायालयात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. ३१ जुलैला त्यांनी आपला परिविक्षाधीन पदभार स्वीकारला.

नीलेश पाटील हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन २०१९ मध्ये घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेत ११६ व्या रँकमध्ये उत्तीर्ण झाले होते. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पाटील यांची जिल्हा न्यायालय, धुळे येथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून, त्यांनी त्याच दिवशी आपल्या परिविक्षाधीन पदाची सुरुवात केली.

नीलेश पाटील यांचे वडील लक्ष्मणराव दहातोंडे पाटील हे जायकवाडी पाटबंधारे विभागात नोकरीला होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जालना जिल्ह्यातील तीर्थपुरीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी परभणीत घेतले, तर बी.ए.ची पदवी गंगापूर येथील मुक्तानंद महाविद्यालयात मिळविली. वकिलीच्या शिक्षणासाठी त्यांनी औरंगाबाद गाठले. येथील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात वकिलीचे शिक्षण २००९ मध्ये पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी औरंगाबादच्या जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर परिश्रम घेत त्यांनी परीक्षा उत्तीर्ण करून न्यायाधीशपद मिळविले. गावातील सुपुत्र न्यायाधीश बनल्याने ग्रामस्थ आनंदी असून, कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर ग्रामस्थ नीलेश दहातोंडे पाटील यांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करणार असल्याचे गळनिंबचे शिक्षक राजेश हिवाळे, बलराम नवथर, अप्पासाहेब पाचपुते, नानासाहेब दहातोंडे, डॉ. भगवान सटाले, कल्याण गायकवाड, राहुल सटाले, तुकाराम सटाले, कानिफनाथ उगले, भागीनाथ गोरे, आदींनी सांगितले.

वडिलांच्या निधनानंतर सांभाळली कुटुंबाची जबाबदारी२०११ मध्ये नीलेश पाटील यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यामुळे त्यांना कुटुंबात परतावे लागले. घरची जबाबदारी घेत त्यांनी गंगापूरच्या न्यायालयात व्यवसाय सुरू केला. पर्यायाने घरची शेतीही करावी लागली; मात्र वडिलांची इच्छा होती, आपल्या मुलाने न्यायाधीश बनावे. त्यासाठी नीलेश यांचे प्रयत्न सुरूच होते. अखेर कठोर परिश्रम आणि कोणत्याही क्लासेसच्या मदतीशिवाय त्यांनी यश मिळविले.

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी