शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

वडिलांची शेवटची इच्छा केली पूर्ण; शेतकरी कुटुंबातील तरुण बनला न्यायाधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 14:48 IST

नीलेश पाटील हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन २०१९ मध्ये घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेत ११६ व्या रँकमध्ये उत्तीर्ण झाले होते.

ठळक मुद्देपरिस्थितीमुळे वकिलीसह शेती केलीधुळे जिल्हा न्यायालयात करणार न्यायदानगावातील सुपुत्र न्यायाधीश बनल्याने ग्रामस्थ आनंदी

कायगाव ( औरंगाबाद ) : हलाखीच्या परिस्थितीत आयुष्यातील ध्येय निश्चित करून गळनिंब येथील शेतकरी कुटुंबातील तरुणाने परिसरातील पहिला न्यायाधीश बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ॲड. नीलेश लक्ष्मणराव दहातोंडे पाटील यांनी यश संपादन करून दिवाणी न्यायाधीशपद मिळविले. त्यांची धुळे जिल्हा न्यायालयात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. ३१ जुलैला त्यांनी आपला परिविक्षाधीन पदभार स्वीकारला.

नीलेश पाटील हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन २०१९ मध्ये घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेत ११६ व्या रँकमध्ये उत्तीर्ण झाले होते. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पाटील यांची जिल्हा न्यायालय, धुळे येथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून, त्यांनी त्याच दिवशी आपल्या परिविक्षाधीन पदाची सुरुवात केली.

नीलेश पाटील यांचे वडील लक्ष्मणराव दहातोंडे पाटील हे जायकवाडी पाटबंधारे विभागात नोकरीला होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जालना जिल्ह्यातील तीर्थपुरीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी परभणीत घेतले, तर बी.ए.ची पदवी गंगापूर येथील मुक्तानंद महाविद्यालयात मिळविली. वकिलीच्या शिक्षणासाठी त्यांनी औरंगाबाद गाठले. येथील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात वकिलीचे शिक्षण २००९ मध्ये पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी औरंगाबादच्या जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर परिश्रम घेत त्यांनी परीक्षा उत्तीर्ण करून न्यायाधीशपद मिळविले. गावातील सुपुत्र न्यायाधीश बनल्याने ग्रामस्थ आनंदी असून, कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर ग्रामस्थ नीलेश दहातोंडे पाटील यांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करणार असल्याचे गळनिंबचे शिक्षक राजेश हिवाळे, बलराम नवथर, अप्पासाहेब पाचपुते, नानासाहेब दहातोंडे, डॉ. भगवान सटाले, कल्याण गायकवाड, राहुल सटाले, तुकाराम सटाले, कानिफनाथ उगले, भागीनाथ गोरे, आदींनी सांगितले.

वडिलांच्या निधनानंतर सांभाळली कुटुंबाची जबाबदारी२०११ मध्ये नीलेश पाटील यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यामुळे त्यांना कुटुंबात परतावे लागले. घरची जबाबदारी घेत त्यांनी गंगापूरच्या न्यायालयात व्यवसाय सुरू केला. पर्यायाने घरची शेतीही करावी लागली; मात्र वडिलांची इच्छा होती, आपल्या मुलाने न्यायाधीश बनावे. त्यासाठी नीलेश यांचे प्रयत्न सुरूच होते. अखेर कठोर परिश्रम आणि कोणत्याही क्लासेसच्या मदतीशिवाय त्यांनी यश मिळविले.

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी