शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा ‘पाणावल्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:21 IST

रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना : ६५ कोटींच्या कर्जमाफीसाठी हालचाली सुरु

वैजापूर : दहेगाव येथील मागील पंधरा वर्षांपासून बंद असलेल्या रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेचे ६५ कोटी रुपयांचे कर्ज माफ करुन ही योजना कायमस्वरुपी सुरु केल्यास तालुक्यातील दोन हजारांहून अधिक शेतकरी कर्जमुक्त होतील व या भागातील दुष्काळ कमी होईल, असे गोदावरी उपसा जलसिंचन योजना संघर्ष समितीचे अध्यक्ष जे. के. जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले. दरम्यान, या कर्जमाफीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी तालुक्यातील दहेगाव येथील बंद असलेली रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यासाठी हिरवा कंदिल दाखविला. यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाच कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या पार्श्वभूमीवर जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन योजनेबाबत सविस्तर माहिती देत कर्ज माफ करण्याची मागणी केली.ते म्हणाले, ही योजना पंधरा वर्षांपासून बंद असल्याने तालुक्यातील २११७ शेतकºयांवर लाखो रुपयांचे कर्ज असून दुसºया बँका या शेतकºयांना कर्ज देत नाहीत. अशा परिस्थितीत हे शेतकरी कर्जमुक्त होणे काळाची गरज आहे. यासाठी २०१२ मध्ये आम्ही रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन संघर्ष समितीची स्थापना केली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. ही योजना एमआयडीसी किंवा रिलायन्स कंपनीने ताब्यात घेण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांना सर्वेक्षण करण्यासाठी या भागात आणले होते. तसेच योजना सुरु न झाल्यास शेतकºयांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. पण या प्रयत्नांना यश आले नाही.२०१५ मध्ये भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर या योजनेला खºया अर्थाने गती मिळाली. या योजनेसाठी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री बबनराव लोणीकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना वारंवार भेटले. त्यामुळे या योजनेसाठी निधी मंजूर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्य बैठकीत घेण्यात आला.कर्जमाफीसाठी वरिष्ठ नेते, मुख्यमंत्र्यांना भेटणारयावेळी जाधव यांनी तापी खोरे महामंडळांतर्गत असलेल्या नाशिक विभागातील धुळे, नंदूरबार व जळगाव येथील ६४ उपसा जलसिंचन योजनेच्या कर्जमाफीबद्दल शासनाने घेतलेल्या निर्णयाची प्रत वितरित केली. या निर्णयामुळे उपसा योजनेचे भूविकास, राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सुमारे १४२ कोटी रुपयांचे कर्ज शासनाने माफ केले आहे. याच धर्तीवर रामकृष्ण योजनेचे कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांचे शिष्टमंडळ लवकरच वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालणार आहे, असे जाधव यांनी सांगितले. यावेळी मंगेश भागवत, प्राचार्य सुनील कोतकर, दादासाहेब मुंढे, शेख अयुब, महेंद्र काटकर, राम उचित आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :water transportजलवाहतूकWaterपाणी