शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा ‘पाणावल्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:21 IST

रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना : ६५ कोटींच्या कर्जमाफीसाठी हालचाली सुरु

वैजापूर : दहेगाव येथील मागील पंधरा वर्षांपासून बंद असलेल्या रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेचे ६५ कोटी रुपयांचे कर्ज माफ करुन ही योजना कायमस्वरुपी सुरु केल्यास तालुक्यातील दोन हजारांहून अधिक शेतकरी कर्जमुक्त होतील व या भागातील दुष्काळ कमी होईल, असे गोदावरी उपसा जलसिंचन योजना संघर्ष समितीचे अध्यक्ष जे. के. जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले. दरम्यान, या कर्जमाफीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी तालुक्यातील दहेगाव येथील बंद असलेली रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यासाठी हिरवा कंदिल दाखविला. यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाच कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या पार्श्वभूमीवर जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन योजनेबाबत सविस्तर माहिती देत कर्ज माफ करण्याची मागणी केली.ते म्हणाले, ही योजना पंधरा वर्षांपासून बंद असल्याने तालुक्यातील २११७ शेतकºयांवर लाखो रुपयांचे कर्ज असून दुसºया बँका या शेतकºयांना कर्ज देत नाहीत. अशा परिस्थितीत हे शेतकरी कर्जमुक्त होणे काळाची गरज आहे. यासाठी २०१२ मध्ये आम्ही रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन संघर्ष समितीची स्थापना केली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. ही योजना एमआयडीसी किंवा रिलायन्स कंपनीने ताब्यात घेण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांना सर्वेक्षण करण्यासाठी या भागात आणले होते. तसेच योजना सुरु न झाल्यास शेतकºयांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. पण या प्रयत्नांना यश आले नाही.२०१५ मध्ये भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर या योजनेला खºया अर्थाने गती मिळाली. या योजनेसाठी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री बबनराव लोणीकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना वारंवार भेटले. त्यामुळे या योजनेसाठी निधी मंजूर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्य बैठकीत घेण्यात आला.कर्जमाफीसाठी वरिष्ठ नेते, मुख्यमंत्र्यांना भेटणारयावेळी जाधव यांनी तापी खोरे महामंडळांतर्गत असलेल्या नाशिक विभागातील धुळे, नंदूरबार व जळगाव येथील ६४ उपसा जलसिंचन योजनेच्या कर्जमाफीबद्दल शासनाने घेतलेल्या निर्णयाची प्रत वितरित केली. या निर्णयामुळे उपसा योजनेचे भूविकास, राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सुमारे १४२ कोटी रुपयांचे कर्ज शासनाने माफ केले आहे. याच धर्तीवर रामकृष्ण योजनेचे कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांचे शिष्टमंडळ लवकरच वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालणार आहे, असे जाधव यांनी सांगितले. यावेळी मंगेश भागवत, प्राचार्य सुनील कोतकर, दादासाहेब मुंढे, शेख अयुब, महेंद्र काटकर, राम उचित आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :water transportजलवाहतूकWaterपाणी