शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

तुकडाबंदीमुळे शेतकरी सावकारी पाशात; अत्यावश्यक वेळीही विकता येईना जमीन

By विकास राऊत | Updated: November 9, 2022 19:38 IST

१५ महिन्यांपासून अर्धा एकरपेक्षा कमी जागा विक्री होत नसल्याने अल्पभूधारकांची कोंडी होत आहे.

- विकास राऊतऔरंगाबाद : राज्य मुद्रांक विभागाने १२ जुलै २०२१ पासून तुकडाबंदी नियमाचे परिपत्रक काढल्यामुळे शेतकरी १५ महिन्यांपासून पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी सावकारी पाशात अडकत चालला आहे. जमीन विकताना तुकडाबंदीचे नियम आडवे येत आहेत. त्यामुळे शिक्षण, वैद्यकीय उपचार खर्च, मुलांच्या विवाहासाठी शेतकऱ्यांना जमीन विकणे अवघड झाले आहे. खरेदी-विक्रीचे व्यवहार रखडल्यामुळे तुकडाबंदीच्या नियमांत शिथिलता आणण्याची गरज व्यक्त होत आहे. कर्जबाजारी होऊन अनेकांना कुटुंबातील मंगल कार्य उरकावे लागले आहे. तुकडाबंदीमुळे सावकारांकडे जमिनी गहाण टाकण्याची वेळ येत आहे.

एनए-४४ वगळता इतर सर्व घरे, जागा, प्लॉटची रजिस्ट्री १५ महिन्यांपासून बंद असली तरी मुद्रांक विभागात दलालांच्या मध्यस्थीने तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे मध्यंतरी उघडकीस आले होते. १५ महिन्यांपासून अर्धा एकरपेक्षा कमी जागा विक्री होत नसल्याने अल्पभूधारकांची कोंडी होत आहे.

सध्या या व्यवहारांना परवानगी८० आर जिरायती, २० आर बागायती जमिनीवरच खरेदी-विक्रीच्या व्यवहारास सध्या परवानगी आहे. एखाद्या सर्व्हे नंबरचे क्षेत्र दोन एकर असेल, तर त्यातील एक, दोन किंवा तीन गुंठे जागा विकत घेता येत नाही. त्यांची रजिस्ट्री होत नाही. जमिनीचे अधिकृत ले-आऊट करून घेतले तरच रजिस्ट्री होईल. प्रमाणापेक्षा कमी क्षेत्र असेल तर त्याच्या खरेदी-विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागते. एखाद्या जागेच्या तुकड्याचा भूमी अभिलेख विभागाकडून स्वतंत्र मोजणीचा नकाशा असेल, तर त्याच्या विक्रीसाठी परवानगीची गरज नाही. मात्र, त्याचे विभाजन करण्यासाठी तुकडाबंदीचे नियम लागू असतील.

काहीही निर्णय नाहीयाबाबत औरंगाबाद खंडपीठात नागरिकांनी याचिका दाखल केली होती. मे २०२२ मध्ये सुनावणीअंती तुकडाबंदी मागे घेतली जाईल, अशी शक्यता होती. परंतु पुण्यातील महानिरीक्षक कार्यालयाने सात महिन्यांपासून त्याबाबत काहीही निर्णय घेतला नाही. या विरोधात गेल्या महिन्यात संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.

मुद्रांक विभागाचे मुख्यालयाकडे बोटजिल्हा मुद्रांक विभागाच्या मते, १२ जुलैचे परिपत्रक एका जनहित याचिकेच्या निकालानुसार काढलेले आहे. त्यामुळे महानिरीक्षक कार्यालयाकडूनच याबाबत कायदेशीर स्पष्टीकरण देण्यात येईल. असे सांगून मुख्यालयाकडे सहा महिन्यांपासून बोट दाखविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांसाठी जाचक नियमतुकडाबंदी शेतकऱ्यांसाठी जाचक आहे. खरेदी-विक्री बंद असल्यामुळे अल्पभूधारक शेतकरी भरडला जात आहे.-भारत आहेर, प्रगतीशील शेतकरी, टोणगाव, औरंगाबाद

अन्यथा सावकारी फोफावेलनोकरदार व व्यापाऱ्यांना पैसा उभारता येतो. शेतकऱ्यांना मात्र जमीन हेच एक साधन आहे. या कायद्याच्या बंधनांमुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे या कायद्याच्या प्रमाणभूत क्षेत्रात बदल होणे गरजेचे आहे, अन्यथा सावकारी फोफावण्याचा धोका आहे.-सतीश तुपे, नायब तहसीलदार (से.नि.)

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRevenue Departmentमहसूल विभाग