शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याने शेतक-याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 06:29 IST

समृद्धी महामार्गात गेलेली आपली जमीन चौघांनी तलाठ्यासोबत संगनमत करून परस्पर नावावर केल्याचे कळताच शेतकºयाने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली.

फुलंब्री (जि. औरंगाबाद) : समृद्धी महामार्गात गेलेली आपली जमीन चौघांनी तलाठ्यासोबत संगनमत करून परस्पर नावावर केल्याचे कळताच शेतकºयाने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी फुलंब्री पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घटनेला जबाबदार असलेल्या तलाठ्याची चौकशी सुरू केली आहे.पोलिसांनी सांगितले की, औरंगाबाद तालुक्यात कृष्णापूरवाडी येथील शेतकरी भावसिंग छगन सुंदर्डे (६५) यांच्या नावे दहा एकर २० आर. जमीन आहे. यातील १ हेक्टर १ आर जमीन समृद्धी महामार्गात जात आहे. याचा मोबदला मोठ्या प्रमाणात मिळणार म्हणून गावातील निहालसिंग सुंदर्डे, खुशालसिंग सुंदर्डे, महासिंग सुंदर्डे, परमजितसिंग धिल्लो या चौघांनी तलाठी पुंजाबा बिरारेसोबत संगनमत करून, भावसिंग यांची २ एकर ३ आर जमीन परस्पर नावावर केली. वास्तविक पाहता, भावसिंग सुंदर्डे यांची ज्या गट नं. ६ मध्ये जमीन आहे, त्या गटात वरील लोकांची जमीन नसताना त्यांच्या नावावर जमीन असल्याचे सातबारामध्ये दाखविण्यात आल्याने भावसिंग यांना धक्काच बसला. २३ नोव्हेंबर रोजी भावसिंग शेतात असताना चौघे तेथे आले. त्यांनी हुज्जत घातली. ही जमीन आमची आहे, अशी धमकी दिली. यामुळे भावसिंग यांनी २५ नोव्हेंबर रोजी अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शेतकºयाच्या मुलाने लगेच तक्रार देताच, फुलंब्री पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून निहालसिंगला अटक केली. उर्वरित तीन आरोपी फरार आहेत.>आत्महत्येस तलाठीच जबाबदारतलाठी पुंजाबा हे माझ्या वडिलांच्या आत्महत्येस जबाबदार असून, त्यांनी आमची जमीन दुसºयाच्या नावावर केली नसती, तर हे प्रकरण घडले नसते, असा आरोप मुलगा धरमसिंग यांनी केला आहे.