शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

जमीन नावावर न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; तलाठी,मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 16:02 IST

दोन वर्षांपूर्वी न्यायालयाने शेत जमिनीचा निकाल दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात ताब्यात मिळालेली जमीन नावावर होत नव्हती

करमाड : तालुक्यातील मलकापूर (पिंप्रीराजा जवळ) शिवारात एका शेतकऱ्याने सोमवारी रात्री आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. संतोष रामचंद्र जाधव (३२, रा. हर्सूल, औरंगाबाद ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. जाधव यांनी न्यायालयाच्या आदेशानंतरही जमीन नावावर होत नसल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

संतोष रामचंद्र जाधव यांनी सोमवारी रात्री (मलकापूर शीवारातील गट नं ४३, सजा पिंप्रीराजा ता.औरंगाबाद. अंतर्गत ) लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोषने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिट्ठीनुसार तलाठी एम.एस.कदम व मंडळ अधिकारी के.डी.वाघ. यांनी दिलेल्या मानसिक त्रासापोटी आत्महत्या करत असल्याचे नमूद केलेले आहे .वरील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर आत्महतेस कारणीभूत ठरल्या प्रकरणी करमाड पोलीस ठण्यात मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. 

दोन वर्षांपूर्वी न्यायालयाने शेत जमिनीचा निकाल दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात ताब्यात मिळालेली जमीन नावावर होत नाही म्हणून आत्महत्या केल्याची तक्रार आहे. सदर जमिन महसूल दरबारी नावावर झाली नसल्याचे (7/12 त नाव न आल्याने) मानसिक त्रासातून संतोष ने आत्महत्या केली आहे. संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांनी वारंवार पैश्याची मागणी केली असे मयतचे बंधू दीपक रामचंद्र जाधव यांनी फिर्यादीत म्हटलेले आहे.  पुढील तपास करमाड पोलीस ठाण्याचे पो.निरीक्षक अजिनाथ रायकर करत आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभागAgriculture Sectorशेती क्षेत्र