शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

जमीन नावावर न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; तलाठी,मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 16:02 IST

दोन वर्षांपूर्वी न्यायालयाने शेत जमिनीचा निकाल दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात ताब्यात मिळालेली जमीन नावावर होत नव्हती

करमाड : तालुक्यातील मलकापूर (पिंप्रीराजा जवळ) शिवारात एका शेतकऱ्याने सोमवारी रात्री आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. संतोष रामचंद्र जाधव (३२, रा. हर्सूल, औरंगाबाद ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. जाधव यांनी न्यायालयाच्या आदेशानंतरही जमीन नावावर होत नसल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

संतोष रामचंद्र जाधव यांनी सोमवारी रात्री (मलकापूर शीवारातील गट नं ४३, सजा पिंप्रीराजा ता.औरंगाबाद. अंतर्गत ) लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोषने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिट्ठीनुसार तलाठी एम.एस.कदम व मंडळ अधिकारी के.डी.वाघ. यांनी दिलेल्या मानसिक त्रासापोटी आत्महत्या करत असल्याचे नमूद केलेले आहे .वरील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर आत्महतेस कारणीभूत ठरल्या प्रकरणी करमाड पोलीस ठण्यात मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. 

दोन वर्षांपूर्वी न्यायालयाने शेत जमिनीचा निकाल दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात ताब्यात मिळालेली जमीन नावावर होत नाही म्हणून आत्महत्या केल्याची तक्रार आहे. सदर जमिन महसूल दरबारी नावावर झाली नसल्याचे (7/12 त नाव न आल्याने) मानसिक त्रासातून संतोष ने आत्महत्या केली आहे. संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांनी वारंवार पैश्याची मागणी केली असे मयतचे बंधू दीपक रामचंद्र जाधव यांनी फिर्यादीत म्हटलेले आहे.  पुढील तपास करमाड पोलीस ठाण्याचे पो.निरीक्षक अजिनाथ रायकर करत आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभागAgriculture Sectorशेती क्षेत्र