शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

शेतकरी संपाची धग कायम

By admin | Updated: June 4, 2017 00:34 IST

जालना : शेतकरी संपाची धग तिसऱ्या दिवशीही कायम असल्याचे चित्र शनिवारी जिल्ह्यात पाहायला मिळाले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकरी संपाची धग तिसऱ्या दिवशीही कायम असल्याचे चित्र शनिवारी जिल्ह्यात पाहायला मिळाले. परतुरातील दोन्ही आठवडी बाजार बंद ठेवण्यात आल्याने बाजारातील लाखो रुपयांची उलाढाल ठप्प होती. जालना बाजार समितीमधील भाजीमार्केटमध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीस आणला नाही. तालुक्यातील रामनगर येथे बैलगाडीसह रास्तारोको करण्यात आला.जालना बाजार समितीमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी सकाळी भाजीपाला विक्रीस आणला नाही. त्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली.याचा परिणाम भाजीपाल्याच्या भावावरही जाणवला. भाजीबाजारात ऐरवी २५० रुपयांना विकणारे एक कॅरेट आज पाचेश रुपयाला विकले गेले. किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाल्याचे दर वाढविल्याचे दिसून आले.परतूरमध्ये शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात सहभागी होत शेतकरी व व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला. किसान क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी या बंदचे आवाहन करण्यात आले होते. परिणामी फळ, भाजीपाला व दुध विक्रे त्यांनी विक्री बंद ठेवत शनिवारी गाव व मोंढा भागातील बाजारात भाजीपाला, दूध विक्रीस आणले नाही. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत गाव व मोंढा भागातील इतर सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली. परतूर मोंढा भागात सकाळी ७ वाजताच बाजार भरतो. परिसरातील खेड्यापाड्यांतून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीस येतो. बाजारात दिवसभर प्रचंड गर्दी असते. मात्र, आज ही बाजाराची जागा खेळाचे मोकळे मैदान वाटत होते. एकही भाजीपाला व फळ विके्रता बाजाराकडे फिरकलाच नाही. परतूर गावालगत भरणाऱ्या बाजारात दुपारी तीन वाजेपर्यंत एकही विके्रता नव्हता. संप मागे घेण्यात आल्याच्या चर्चेमुळे दुपारी चारच्या सुमारास शहरातील खेड्यातील काही भाजीपाला विक्रते आले होते. मात्र, गाव भागातील बाजार एक तास भरला.या आठवडी बाजारासाठी खेडयापाडयातून येणारे ग्रामस्थ आज या बाजाराकडे फिरकलेच नाहीत. कडकडीत बंदमुळे शेतक ऱ्यांचा संप यशस्वी होण्याबरोबरच लाखोंची उलाढालही ठप्प झाली. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे, अशी भूमिका घेत जिल्हा हमाल मापाडी मजदूर युनियनने शनिवारी काम बंद ठेवून शेतकऱ्यांचा संपास पाठिंबा दिला. या संदर्भात युनियच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपास युनियचे पदाधिकारी, सदस्य व मजुरांचे समर्थन आहे. त्यामुळे मोंढ्यातील कामकाज सोमवारपर्यंत बंद राहील. शेतात मशागतीची कामे करणाऱ्या पुरुष व महिला शेतकऱ्यांना रोजगारी हमी योजनेतून किमान ५० दिवसाची मजुरी द्यावी, ५८ वर्षे झालेल्या शेतकऱ्यांना महिना पाच हजारांची पेंशन देण्याची मागणी करण्यात आली. निवेदनावर हसनखाँ पठाण, लक्ष्मण करपे, अकबर सय्यद, हफिजखाँ नन्हेखान, ब्रम्हानंद जागडे, वैजिनाथ भारतीय, विलास केशरी, सुरेश गिरी, विलास हिवाळे, संतोष जगधने, राहुल करपे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.