शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

कृषी आढावा बैठकीत शेतक-यांनी कपाशीच्या नुकसान भरपाईसाठी केला आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 18:10 IST

बोंड अळीबाधीत कपाशीची  हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई  देण्यात यावी, या मागणीकरीत संतप्त शेतक-यांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत अचानक शिरकावा करुन आत्मदहनाचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देराज्याचे फलोत्पादन संचालक व येथील पालक संचालक प्रल्हाद पोकळे  यांच्या मार्गदर्शनाखाली शहानुरमिया दर्गा परिसरातील कार्यालयात आढावा बैठक सुरु होती. गंगापूर तालुक्यातील वजनापूर या गावातील सात ते आठ शेतक-यांनी बाटलीत आणलेले रॉकेल अंगावर टाकल्याने एकच गोंधळ उडाला.शेतक-यांच्या हातात बोंडआळी लागलेली कपाशीच परदड होते. काही शेतक-यांनी कपाशीच्या बोंडाचे तोरण कार्यालयाला बांधले.

औरंगाबाद : बोंड अळीबाधीत कपाशीची  हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई  देण्यात यावी, या मागणीकरीत संतप्त शेतक-यांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत अचानक शिरकावा करुन आत्मदहनाचा प्रयत्न केला. गंगापूर तालुक्यातील वजनापूर या गावातील सात ते आठ शेतक-यांनी बाटलीत आणलेले रॉकेल अंगावर टाकल्याने एकच गोंधळ उडाला. 

राज्याचे फलोत्पादन संचालक व येथील पालक संचालक प्रल्हाद पोकळे  यांच्या मार्गदर्शनाखाली शहानुरमिया दर्गा परिसरातील कार्यालयात आढावा बैठक सुरु होती. विभागातील सर्व अधिकारी बैठकीला हजर होते. सकाळी ११.३० ते दुपारी १२ वाजे दरम्यान जि.प.चे माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली १५ ते २० शेतकरी घोषणा देत अचानक कार्यालयात आले. शेतक-यांच्या हातात बोंडआळी लागलेली कपाशीच परदड होते. काही शेतक-यांनी कपाशीच्या बोंडाचे तोरण कार्यालयाला बांधले. ‘ सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’ असा घोषणा देत सर्वजण थेट बैठकीमध्ये शिरले.  

आत येताच संचालक प्रल्हाद पोकळे सोबत विभागीय कृषी सहसंचालक प्रताप कदम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांच्या समोर संतापलेल्या शेतक-यांनी बाटलीतून आणलेले रॉकले अंगावर टाकून घेतले. यामुळे एकच गोंधळ उडाला. अधिका-यांमध्ये धावपळ माजली. यावेळी काही मिनीटातच पोलीसफाटा घटनास्थळी पोहोचला. तोपर्यंत शेतक-यांना शांत करण्यात अधिका-यांना यश आले होते. कपाशीवरील बोंडअळी बांधीत शेतक-यांच्या शेताचे सरसकट पंचनामे करुन हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी आंदोलनकर्तांच्यावतीने संतोष जाधव यांनी मागणी केली. 

शेतक-यांचा संतापदूर करण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी लगेच  कृषी आयुक्तांच्या नावे एक पत्र टाईप केले व त्यातील येथील शेतक-यांच्या मागण्यां मांडण्यात आल्या. या पत्राची एक प्रत आंदोलनकर्त्या शेतक-यांना देण्यात आली. लेखीपत्र घेऊनच शेतकरी कार्यालयाबाहेर पडले. 

येत्या आठवडाभरात पंचनामे होणार कपाशीवरील बोंडअळीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात कृषी विभागातर्फे शेतकºयांचे तक्रार अर्ज भरुन घेतले जात आहे. पुढील आठवडाभरात पंचनामेही पूर्ण करण्यात येतील व शासनाला त्याचा अहवाल पाठविण्यात येईल. - प्रल्हाद पोकळे, फलोत्पादन संचालक तथा पालक संचालक चौकट 

हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावीजिल्ह्यात सुमारे ७५ टक्के कपाशीची लागवड झाली. संपूर्ण कपाशीवर बोंडअळी लागल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. शेताचे सरसकट पंचनामे करुन हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी.- संतोष जाधव, माजी सभापती अर्थ व बांधकाम (जि.प.)

शेतकरी आत्महत्या करणार नाहीतर काय करणार१० एकरात कपाशी लावली होती. अवघे १० क्विंटल कपाशी हातात आली. जिथे ७० ते ८० क्विंटल अपेक्षीत होती. बाजारात विक्रीला आणेपर्यंत ६० ते ८० हजारापर्यंत खर्च आला. ६ हजार भाव पाहिजे होता पण ४ हजार ते ४२०० रुपये क्विंटल कपाशी विक्री होत आहे.    बोंडअळीने मोठे नुकसान झाले, कपाशीला भाव नाही सततच्या नुकसानीमुळे शेतकरी आत्महत्या करणार नाहीतर काय करणार.- राजेंद्र चव्हाण, वजनापूर, तालुका गंगापूर

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस