शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची मालमत्ता उघड्यावर

By admin | Updated: May 16, 2016 23:50 IST

उस्मानाबाद : बंद पडलेल्या ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात कारखान्याची म्हणजेच शेतकरी सभासदांची कोट्यवधीची मालमत्ता पडून आहे.

तेरणा साखर कारखाना : पदभार घेण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोपउस्मानाबाद : बंद पडलेल्या ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात कारखान्याची म्हणजेच शेतकरी सभासदांची कोट्यवधीची मालमत्ता पडून आहे. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही जिल्हा उपनिबंधक तथा कारखान्याच्या प्रशासकांनी पदभार घेतलेला नाही. या प्रकाराबाबत ढोकी परिसरातील शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांची मालमत्ता सहीसलामत ठेवण्यासाठी प्रशासकांनी तात्काळ पदभार स्वीकारावा, अशी आग्रही मागणी जोर धरत आहे.थकित ऊस बिल अदा न करणे, संचालक मंडळाने गाळप क्षमतेचा पूर्ण वापर न करणे, गाळपास परवाना घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही न करणे यासह इतर कारणावरून तेरणा शेतकरी सहकारी कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या या निर्णयाविरुद्ध संचालकांनी अपिल दाखल केले होते. सुनावणी अंती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अपिल नामंजूर करीत प्रादेशिक सहसंचालकांचा निर्णय कायम ठेवत, तेरणा कारखान्याच्या प्रशासकपदी जिल्हा उपनिबंधक एस. पी. बडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नियुक्ती जाहीर होऊन एक महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही बडे यांनी कारखान्याचा पदभार स्वीकारलेला नाही. एकेकाळी मराठवाड्यातील सर्वात मोठा साखर कारखाना अशी ओळख असलेली ही संस्था आज बंद पडल्याने शेकडो कर्मचाऱ्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे. कारखाना बंद पडल्याने तसेच मागील अनेक दिवसापासून कारखान्यामध्ये सुरक्षा कर्मचारी नसल्याने परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. विशेष म्हणजे कारखान्याचा वीजपुरवठाही सध्या बंद आहे. त्यामुळे उपनिबंधक बडे यांनी कारखान्याचा पदभार तातडीने स्वीकारावा, अशी मागणी सभासद शेतकऱ्यांतून होत आहे. याबाबत तेथील शेतकरी अब्दुलबारी काझी, बबनराव कावळे, झुंबर बोडके, सय्यद जावेद, विलास रसाळ, संजय घनगावे, राजीव रसाळ आदींनी जिल्हा उपनिबंधकांकडे तातडीने पदभार स्वीकारण्याची विनंती केली आहे. सद्यस्थितीत कारखान्याच्या शेतकरी सभासद व कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सुरक्षा कर्मचारी नसल्याने कारखान्यातील अनेक मौल्यवान वस्तू उघड्यावर आहेत. सदर वस्तूंची चोरी झाल्यास शेतकरी सभासदांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी आणि राहिलेली मालमत्ता सहीसलामत ठेवण्यासाठी कारखान्याचा पदभार घ्या, अशी विनंती या शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक बडे यांच्याकडे चार दिवसापूर्वी केली आहे. मात्र त्यानंतरही कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.