शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या, पिकावंरील कीड नियंत्रणासाठी शासनाकडून मिळवा मोफत औषधे

By बापू सोळुंके | Updated: December 1, 2023 16:26 IST

रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे आणि कीटकनाशक, बीज प्रक्रिया औषधांचा पुरवठा केला जातो.

छत्रपती संभाजीनगर : एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनांतर्गत पीक सरंक्षण औषधे, तणनाशके, जैविक खते आणि जैविक कीड नियंत्रणासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानित औषधे दिली जातात. बियाणे आणि रासायनिक औषधांचा यात समावेश आहे.

कशासाठी मिळते शासनाकडून अनुदानरब्बी हंगामातील हरभरा आणि ज्वारी पिकासाठी शासनाची ही योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे आणि रासायनिक आणि जैविक किटकनाशके शासनाकडून उपलब्ध करण्यात आली आहेत.

हरभरा बियाण्यासाठी हेक्टरी ५ हजार १०० रुपयेकृषी विभागातर्फे हरभरा बियाण्यासाठी शासनाने हेक्टरी ५ हजार १०० रुपये अनुदान दिले आहे. कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याची लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर त्यांना अनुदानित बियाणे दिले जाते.

मोफत तणनाशकेपिकाची पेरणी करताच शेतात तण उगवू नये, यासाठी तणनाशकाची फवारणी शेतात करावी लागते. तणनाशकासाठी शेतकऱ्याने महिनाभर आधीच अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याची लॉटरीमधून निवड झाल्यानंतर त्यांना या योजनेंतर्गत तणनाशक औषधांचा पुरवठा केला जातो.

मोफत जैविक कीड नियंत्रण औषधेपिकांचे सरंक्षण करताना जास्तीत जास्त जैविक औषधांचा वापर शेतकऱ्यांनी करावा, यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोफत जैविक कीड नियंत्रण औषधांचा पुरवठा करण्यात येतो. कृषी विभागाच्या शिफारशीनुसार निंबोळी अर्क, सूक्ष्म, जैविक संघ, (कॉसॉरशिया), फेरोमेन ट्रॅप्स, लुर्सहेलीकोव्हपी, स्टेम बोअरर, अझाडीरेकटीन १५०० पीपीएम, रासायनिक कीटकनाशक आदी प्रकारच्या औषधांचा पुरवठा करण्यात येतो.

कोणाला, किती मिळते अनुदान? (बॉक्स)हरभरा बियाणे - ५१०० रुपयेबीज प्रक्रिया - ११० रुपयेसूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड १ - ९९० रुपयेसूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड २ - ५१७ रुपयेएकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी एकूण - १४३५ रुपये

रब्बी आणि खरीप हंगामासाठी ऑनलाइन अर्ज बंधनकारकरब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे आणि कीटकनाशक, बीज प्रक्रिया औषधांचा पुरवठा केला जातो. यासाठी कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे शेतकऱ्यांना बंधनकारक आहे. वर्षभर हे अर्ज स्वीकारले जातात. शिवाय प्राप्त अर्जांमधून खरीप आणि रब्बी हंगामाची पेरणी सुरू होण्यापूर्वी लॉटरी पद्धतीने लाभार्थी शेतकऱ्यांची निवड केली जाते.- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद