शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या, पिकावंरील कीड नियंत्रणासाठी शासनाकडून मिळवा मोफत औषधे

By बापू सोळुंके | Updated: December 1, 2023 16:26 IST

रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे आणि कीटकनाशक, बीज प्रक्रिया औषधांचा पुरवठा केला जातो.

छत्रपती संभाजीनगर : एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनांतर्गत पीक सरंक्षण औषधे, तणनाशके, जैविक खते आणि जैविक कीड नियंत्रणासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानित औषधे दिली जातात. बियाणे आणि रासायनिक औषधांचा यात समावेश आहे.

कशासाठी मिळते शासनाकडून अनुदानरब्बी हंगामातील हरभरा आणि ज्वारी पिकासाठी शासनाची ही योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे आणि रासायनिक आणि जैविक किटकनाशके शासनाकडून उपलब्ध करण्यात आली आहेत.

हरभरा बियाण्यासाठी हेक्टरी ५ हजार १०० रुपयेकृषी विभागातर्फे हरभरा बियाण्यासाठी शासनाने हेक्टरी ५ हजार १०० रुपये अनुदान दिले आहे. कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याची लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर त्यांना अनुदानित बियाणे दिले जाते.

मोफत तणनाशकेपिकाची पेरणी करताच शेतात तण उगवू नये, यासाठी तणनाशकाची फवारणी शेतात करावी लागते. तणनाशकासाठी शेतकऱ्याने महिनाभर आधीच अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याची लॉटरीमधून निवड झाल्यानंतर त्यांना या योजनेंतर्गत तणनाशक औषधांचा पुरवठा केला जातो.

मोफत जैविक कीड नियंत्रण औषधेपिकांचे सरंक्षण करताना जास्तीत जास्त जैविक औषधांचा वापर शेतकऱ्यांनी करावा, यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोफत जैविक कीड नियंत्रण औषधांचा पुरवठा करण्यात येतो. कृषी विभागाच्या शिफारशीनुसार निंबोळी अर्क, सूक्ष्म, जैविक संघ, (कॉसॉरशिया), फेरोमेन ट्रॅप्स, लुर्सहेलीकोव्हपी, स्टेम बोअरर, अझाडीरेकटीन १५०० पीपीएम, रासायनिक कीटकनाशक आदी प्रकारच्या औषधांचा पुरवठा करण्यात येतो.

कोणाला, किती मिळते अनुदान? (बॉक्स)हरभरा बियाणे - ५१०० रुपयेबीज प्रक्रिया - ११० रुपयेसूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड १ - ९९० रुपयेसूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड २ - ५१७ रुपयेएकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी एकूण - १४३५ रुपये

रब्बी आणि खरीप हंगामासाठी ऑनलाइन अर्ज बंधनकारकरब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे आणि कीटकनाशक, बीज प्रक्रिया औषधांचा पुरवठा केला जातो. यासाठी कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे शेतकऱ्यांना बंधनकारक आहे. वर्षभर हे अर्ज स्वीकारले जातात. शिवाय प्राप्त अर्जांमधून खरीप आणि रब्बी हंगामाची पेरणी सुरू होण्यापूर्वी लॉटरी पद्धतीने लाभार्थी शेतकऱ्यांची निवड केली जाते.- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद