शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या, पिकावंरील कीड नियंत्रणासाठी शासनाकडून मिळवा मोफत औषधे

By बापू सोळुंके | Updated: December 1, 2023 16:26 IST

रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे आणि कीटकनाशक, बीज प्रक्रिया औषधांचा पुरवठा केला जातो.

छत्रपती संभाजीनगर : एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनांतर्गत पीक सरंक्षण औषधे, तणनाशके, जैविक खते आणि जैविक कीड नियंत्रणासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानित औषधे दिली जातात. बियाणे आणि रासायनिक औषधांचा यात समावेश आहे.

कशासाठी मिळते शासनाकडून अनुदानरब्बी हंगामातील हरभरा आणि ज्वारी पिकासाठी शासनाची ही योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे आणि रासायनिक आणि जैविक किटकनाशके शासनाकडून उपलब्ध करण्यात आली आहेत.

हरभरा बियाण्यासाठी हेक्टरी ५ हजार १०० रुपयेकृषी विभागातर्फे हरभरा बियाण्यासाठी शासनाने हेक्टरी ५ हजार १०० रुपये अनुदान दिले आहे. कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याची लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर त्यांना अनुदानित बियाणे दिले जाते.

मोफत तणनाशकेपिकाची पेरणी करताच शेतात तण उगवू नये, यासाठी तणनाशकाची फवारणी शेतात करावी लागते. तणनाशकासाठी शेतकऱ्याने महिनाभर आधीच अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याची लॉटरीमधून निवड झाल्यानंतर त्यांना या योजनेंतर्गत तणनाशक औषधांचा पुरवठा केला जातो.

मोफत जैविक कीड नियंत्रण औषधेपिकांचे सरंक्षण करताना जास्तीत जास्त जैविक औषधांचा वापर शेतकऱ्यांनी करावा, यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोफत जैविक कीड नियंत्रण औषधांचा पुरवठा करण्यात येतो. कृषी विभागाच्या शिफारशीनुसार निंबोळी अर्क, सूक्ष्म, जैविक संघ, (कॉसॉरशिया), फेरोमेन ट्रॅप्स, लुर्सहेलीकोव्हपी, स्टेम बोअरर, अझाडीरेकटीन १५०० पीपीएम, रासायनिक कीटकनाशक आदी प्रकारच्या औषधांचा पुरवठा करण्यात येतो.

कोणाला, किती मिळते अनुदान? (बॉक्स)हरभरा बियाणे - ५१०० रुपयेबीज प्रक्रिया - ११० रुपयेसूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड १ - ९९० रुपयेसूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड २ - ५१७ रुपयेएकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी एकूण - १४३५ रुपये

रब्बी आणि खरीप हंगामासाठी ऑनलाइन अर्ज बंधनकारकरब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे आणि कीटकनाशक, बीज प्रक्रिया औषधांचा पुरवठा केला जातो. यासाठी कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे शेतकऱ्यांना बंधनकारक आहे. वर्षभर हे अर्ज स्वीकारले जातात. शिवाय प्राप्त अर्जांमधून खरीप आणि रब्बी हंगामाची पेरणी सुरू होण्यापूर्वी लॉटरी पद्धतीने लाभार्थी शेतकऱ्यांची निवड केली जाते.- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद