शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

अन्नप्रक्रिया उद्योेग उभारणीत छत्रपती संभाजीनगरचे शेतकरी राज्यात अग्रेसर

By बापू सोळुंके | Updated: March 18, 2023 15:25 IST

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोबत जोडधंदा करून आत्मनिर्भर व्हावे, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणलेली आहे.

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोबत कृषी मालावर अन्न प्रक्रिया उद्योग उभारून आत्मनिर्भर व्हावे, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात प्रथम असल्याचे समोर आले आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५९० कंपन्यांनी लघु आणि सूक्ष्म उद्योग सुरू केले आहेत. संस्थांना उद्योग सुरू करण्यासाठी विविध बॅंकांनी तब्बल १६ कोटी ३४ लाख रुपये कर्ज वाटप केले आहे.

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोबत जोडधंदा करून आत्मनिर्भर व्हावे, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणलेली आहे. या योजनेंतर्गत डाळींब, ऊस, टोमॅटो, भाजीपाला आणि दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग आणि फळ प्रक्रिया उद्योग या योजनेंतर्गत करता येतो. यासाठी शासनाकडून जास्तीत जास्त दहा लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना कर्ज देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, नवउद्योजक या योजनेंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी पुढे येत आहे.

१३५ जणांना नकार, ४१४ प्रस्ताव अजूनही पडूनप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत उद्योग सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील १ हजार १३९ जणांनी राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खाजगी बँकांकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. यापैकी ५९० उद्योगांना विविध बँकांनी तब्बल १६ कोटी ३४ लाख रुपये कर्ज देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १३५ अर्जदारांना वेगवेगळ्या कारणामुळे बँकांनी कर्ज नाकारले आहेत. उद्योग करु इच्छिणाऱ्या शेतकरी आणि सहकारी संस्थाचे ४१४ प्रस्ताव विविध बँकांकडे अनेक महिन्यापासून पडून आहेत.

बँकांचा शेतकऱ्यांना आधारप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या ग्रामीण मधील विविध शाखांनी ३२३ उद्योगांना आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या विविध ठिकाणच्या शाखांनी २१९ उद्योगांना कर्ज वाटप केले. या योजनेंतर्गत शहरी बँकांकडून कर्ज देण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे कृषी विभागाचे उपसंचालक डी. डी. तायडे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagricultureशेती