शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शेतकरी संघटनांचा नवा राजकीय पक्ष - रघुनाथ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:03 IST

प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय निर्माण करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटना एकत्र येऊन नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.

औरंगाबाद : प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय निर्माण करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटना एकत्र येऊन नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.काँग्रेसने शेतीमालाला भाव दिला नाही म्हणून भाजपाला निवडून आणले; मात्र सत्तेत आल्यावर त्यांनी स्वामीनाथन आयोग लागू करता येणार नाही, असे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले. सरकारचे धोरण शेतक-यांचे मरण असेल, तर या प्रस्थापितांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करण्याशिवाय आमच्यासमोर गत्यंतर नाही. देशभरातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन शेतकºयांचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही देशभरात उमेदवार उभे करणार आहोत, असे पाटील यांनी सांगितले.अजून नवीन पक्षाचे नाव निश्चित केले नाही. पुढील आठवड्यात अलाहाबाद येथे देशभरातील शेतकरी संघटनांची बैठक आहे. तीत राजकीय पक्षाच्या नावासंदर्भात चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.शरद जोशी ते राजू शेट्टीशेतकरी नेत्यांनी राजकीय पक्ष काढण्याचा प्रयोग यापूर्वीही झालेला आहे. शेतकºयांचे नेते शरद जोशी यांनी ‘स्वतंत्र भारत पक्ष’ स्थापन करून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. ते स्वत:ही नांदेडमधून निवडणूक लढले. मात्र पराभूत झाले. त्यानंतर राजू श्ोट्टी यांनी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ स्थापन करून लोकसभेची निवडणूक लढविली आणि दुसºयांदा ते विजयी झाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र