शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

शेतकर्‍यांची थट्टा !

By admin | Updated: May 10, 2014 18:43 IST

उस्मानाबाद : पाण्याची बचत व्हावी, पर्यायाने सिंचनाखालील क्षेत्र वाढावे या उद्देशाने सूक्ष्म सिंचन पद्धतीवर भर दिला जात आहे.

 उस्मानाबाद : पाण्याची बचत व्हावी, पर्यायाने सिंचनाखालील क्षेत्र वाढावे या उद्देशाने सूक्ष्म सिंचन पद्धतीवर भर दिला जात आहे. ठिबक, तुषार या सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी शासन स्तरावर अनुदानही दिले जात आहे. त्यामुळे सिंचनाच्या या पद्धतींचा अवलंब करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. असे असतानाच दुसरीकडे शासनाकडून शेतकर्‍यांना प्रोत्साहन मिळण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम होताना दिसून येत आहे. २०११-१२ आणि २०१२-१३ या आर्थिक वर्षातील लाभार्थी शेतकर्‍यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. तब्बल १४ कोटी रुपये शासनाकडे अडकले आहेत. राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना अनुदान तत्त्वावर ठिबक, तुषार संच पुरविले जातात. या योजनेचा अधिकाधिक शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, यासाठी हे अनुदान दिले जात आहे. ही योजना शेतकर्‍यांच्या दृष्टिकोनातून चांगली असली तरी वेळेवर अनुदान उपलब्ध होत नसल्याने लाभार्थी शेतकरी चांगेलच अडचणीत सापडले आहेत. २०११-१२ या आर्थिक वर्षामध्ये १ हजार ४३७ शेतकर्‍यांनी अनुदानासाठी आॅनलाईन प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर संबंधित शेतकर्‍यांच्या प्रस्तावांना मंजुरीही मिळाली. विशेष म्हणजे यापैकी सर्वच्या सर्व शेतकर्‍यांनी आपापल्या शेतात ठिबक, तुषार संचही बसविले. त्यानंतर अनुदानाची मागणी केली. मात्र तीन वर्ष लोटले तरी या शेतकर्‍यांना अनुदानाचा एक छदामही मिळालेला नाही. शेतकर्‍यांकडून वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र अधीक्षक कृषी कार्यालयाकडूनही ‘वाट बघा’ असा सल्ला दिला जात आहे. उपरोक्त लाभार्थी शेतकर्‍यांच्या अनुदानापोटी ३ कोटी ३५ लाख ८२ हजार रुपये इतकी रक्कम गरजेची आहे. पाण्याचा प्रश्न लक्षात घेवून २०१२-१३ मध्ये या योजनेकडे शेतकर्‍यांचा अधिक कल वाढला. थोडे थोडके नव्हे तर चारपटीने लाभार्थी वाढले. लाभार्थी शेतकर्‍यांचा आकडा ६ हजार २३ वर जावून ठेपला. या माध्यमातून सुमारे ५ हजार ४५८.२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. या शेतकर्‍यांना अनुदानापोटी १७ कोटी ९३ लाख १२ हजार इतकी रक्कम देणे अपेक्षित आहे. आज अखेर केवळ ७ कोटी २६ लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार ते वितरितही केले. मात्र आणखी ५० टक्क्यावर शेतकरी अनुदानाकडे डोळे लावून बसले आहेत. ३ हजार ६०० शेतकर्‍यांसाठी १० कोटी ६६ लाख रुपये लागणार आहेत. ही रक्कम शासनाकडून अद्याप मिळालेली नाही. दोन वर्ष लोटली तरी अनुदान मिळत नसल्याने लाभार्र्थी शेतकर्‍यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी) पत्रावर पत्र सूक्ष्म सिंचन अनुदानाचे तब्बल १४ कोटी रुपये शासनाकडे अडकले असल्यामुळे शेतकर्‍यांचा या योजनेकडील कल कमी होऊ लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन अधीक्षक कृषी कार्यालयाकडून थकित १४ कोटी रुपयांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरु असल्याचे सूत्रांकडून सांगितले. यासाठी वेळोवेळी स्मरण पत्र पाठविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. उस्मानाबाद आघाडीवर राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानांतर्गत २०१२-१३ या वर्षात उस्मानाबाद तालुक्यातील १ हजार ५८६ शेतकर्‍यांनी ठिबक आणि तुषार संच बसविले. त्याचप्रमाणे परंडा तालुक्यातील ९००, कळंब तालुक्यातील ९०३, तुळजापूर ७५९, उमरगा ५२९, भूम ५६९, लोहारा ४२१ आणि वाशी तालुक्यातील ३५४ शेतकर्‍यांनी सदरील संच बसविले आहेत. या माध्यमातून किमान ५ हजार ४५८ हेक्टर क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आल्याचे कृषी विभागाने सांगितले.