शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांची थट्टा !

By admin | Updated: May 10, 2014 18:43 IST

उस्मानाबाद : पाण्याची बचत व्हावी, पर्यायाने सिंचनाखालील क्षेत्र वाढावे या उद्देशाने सूक्ष्म सिंचन पद्धतीवर भर दिला जात आहे.

 उस्मानाबाद : पाण्याची बचत व्हावी, पर्यायाने सिंचनाखालील क्षेत्र वाढावे या उद्देशाने सूक्ष्म सिंचन पद्धतीवर भर दिला जात आहे. ठिबक, तुषार या सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी शासन स्तरावर अनुदानही दिले जात आहे. त्यामुळे सिंचनाच्या या पद्धतींचा अवलंब करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. असे असतानाच दुसरीकडे शासनाकडून शेतकर्‍यांना प्रोत्साहन मिळण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम होताना दिसून येत आहे. २०११-१२ आणि २०१२-१३ या आर्थिक वर्षातील लाभार्थी शेतकर्‍यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. तब्बल १४ कोटी रुपये शासनाकडे अडकले आहेत. राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना अनुदान तत्त्वावर ठिबक, तुषार संच पुरविले जातात. या योजनेचा अधिकाधिक शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, यासाठी हे अनुदान दिले जात आहे. ही योजना शेतकर्‍यांच्या दृष्टिकोनातून चांगली असली तरी वेळेवर अनुदान उपलब्ध होत नसल्याने लाभार्थी शेतकरी चांगेलच अडचणीत सापडले आहेत. २०११-१२ या आर्थिक वर्षामध्ये १ हजार ४३७ शेतकर्‍यांनी अनुदानासाठी आॅनलाईन प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर संबंधित शेतकर्‍यांच्या प्रस्तावांना मंजुरीही मिळाली. विशेष म्हणजे यापैकी सर्वच्या सर्व शेतकर्‍यांनी आपापल्या शेतात ठिबक, तुषार संचही बसविले. त्यानंतर अनुदानाची मागणी केली. मात्र तीन वर्ष लोटले तरी या शेतकर्‍यांना अनुदानाचा एक छदामही मिळालेला नाही. शेतकर्‍यांकडून वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र अधीक्षक कृषी कार्यालयाकडूनही ‘वाट बघा’ असा सल्ला दिला जात आहे. उपरोक्त लाभार्थी शेतकर्‍यांच्या अनुदानापोटी ३ कोटी ३५ लाख ८२ हजार रुपये इतकी रक्कम गरजेची आहे. पाण्याचा प्रश्न लक्षात घेवून २०१२-१३ मध्ये या योजनेकडे शेतकर्‍यांचा अधिक कल वाढला. थोडे थोडके नव्हे तर चारपटीने लाभार्थी वाढले. लाभार्थी शेतकर्‍यांचा आकडा ६ हजार २३ वर जावून ठेपला. या माध्यमातून सुमारे ५ हजार ४५८.२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. या शेतकर्‍यांना अनुदानापोटी १७ कोटी ९३ लाख १२ हजार इतकी रक्कम देणे अपेक्षित आहे. आज अखेर केवळ ७ कोटी २६ लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार ते वितरितही केले. मात्र आणखी ५० टक्क्यावर शेतकरी अनुदानाकडे डोळे लावून बसले आहेत. ३ हजार ६०० शेतकर्‍यांसाठी १० कोटी ६६ लाख रुपये लागणार आहेत. ही रक्कम शासनाकडून अद्याप मिळालेली नाही. दोन वर्ष लोटली तरी अनुदान मिळत नसल्याने लाभार्र्थी शेतकर्‍यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी) पत्रावर पत्र सूक्ष्म सिंचन अनुदानाचे तब्बल १४ कोटी रुपये शासनाकडे अडकले असल्यामुळे शेतकर्‍यांचा या योजनेकडील कल कमी होऊ लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन अधीक्षक कृषी कार्यालयाकडून थकित १४ कोटी रुपयांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरु असल्याचे सूत्रांकडून सांगितले. यासाठी वेळोवेळी स्मरण पत्र पाठविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. उस्मानाबाद आघाडीवर राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानांतर्गत २०१२-१३ या वर्षात उस्मानाबाद तालुक्यातील १ हजार ५८६ शेतकर्‍यांनी ठिबक आणि तुषार संच बसविले. त्याचप्रमाणे परंडा तालुक्यातील ९००, कळंब तालुक्यातील ९०३, तुळजापूर ७५९, उमरगा ५२९, भूम ५६९, लोहारा ४२१ आणि वाशी तालुक्यातील ३५४ शेतकर्‍यांनी सदरील संच बसविले आहेत. या माध्यमातून किमान ५ हजार ४५८ हेक्टर क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आल्याचे कृषी विभागाने सांगितले.